शहरं
Join us  
Trending Stories
1
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
2
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
3
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
4
हरियाणातील BJP सरकार अल्पमतात; 3 अपक्ष आमदारांनी साथ सोडली, काँग्रेसला दिला पाठिंबा
5
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
6
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
7
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
8
"माझ्या वडिलांना कोणत्या आजारवर उपचार करायला नेलं होतं?", अजित पवारांचा शरद पवारांना सवाल
9
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
10
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
11
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
12
Mumbai Indians ने केलेल्या पराभवानंतर काव्या मारनच्या SRH ला सतावत आहेत 'या' 3 चिंता
13
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
14
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
15
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."
16
इंडिया आघाडी घटनेत बदल करून मुस्लिमांना आरक्षण देणार? लालूप्रसाद यादव यांच्या विधानावर भाजपाचा पलटवार
17
दीपिकाच्या प्रेग्नंसीदरम्यान रणवीर सिंहने डिलीट केले लग्नाचे Photos, चाहते संभ्रमात
18
Narendra Modi : "इंडिया आघाडीच्या नेत्याने जनावरांचा चारा खाल्ला"; मोदींचा लालू प्रसाद यादवांना खोचक टोला
19
“महाराष्ट्रात भाजपाचे मोदी कार्ड फोल ठरले, कर्मठ ठाकरे सैनिक हद्दपार करतील”: रमेश चेन्निथला
20
धक्कादायक! धाराशिव जिल्ह्यात मतदान केंद्राबाहेर तरुणांचा राडा, वादातून एकाचा खून

घणसोलीत पदपथांवर कचरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 22, 2018 4:07 AM

स्वच्छतेचा बोजवारा : नागरी आरोग्याकडे अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष; रस्त्यांवर कचºयाचे ढीग

नवी मुंबई : सर्वेक्षण संपल्यानंतर शहरातील स्वच्छतेकडे अधिकारी कर्मचारी यांचे दुर्लक्ष होताना दिसत आहे. शहरात अनेक ठिकाणी कचºयाचे ढीग पाहायला मिळत असून, पालिकेनेच छाटलेल्या झाडांच्या फांद्या पदपथांवर पडून आहेत. यामुळे स्वच्छतेचा बोजवारा उडाला असून, पदपथांवर पादचाºयांची अडवणूक होत आहे.स्वच्छतेच्या बाबतीत शहर देशात अव्वल ठरावे, यासाठी मागील महिन्यात प्रशासनाकडून अनेक प्रयत्न झाले. मात्र, समितीकडून शहराची पाहणी झाल्यानंतर परिस्थिती पुन्हा जैसे थे असल्याचे पाहायला मिळत आहे. यावरून केवळ सर्वेक्षणाला सामोरे जाण्यासाठी पालिकेकडून शहरात स्वच्छतेचा दिखावा झाल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. घणसोली नोडमध्ये अनेक दिवसांपासून जागोजागी कचºयाचे ढीग पाहायला मिळत आहेत. काही सोसायटींच्या बाहेरच उघड्यावर कचरा साठवला जात आहे. तर ज्या ठिकाणी घनकचरा वाहतूक करणारे वाहन थांबवले जाते, त्या ठिकाणी वाहनातून सांडणारे घाण पाणी साचत आहे. यामुळे परिसरात दुर्गंधी पसरत आहे. अशाच प्रकारे ए.एस.पी. शाळेसमोर घरोंदा वसाहतीमध्ये पालिकेनेच पदपथ अडवून ठेवले आहेत. परिसरातील वृक्षांच्या छाटलेल्या फांद्या पदपथावर साठवल्या आहेत. मागील कित्येक दिवसांपासून हा कचरा ठिकठिकाणी साचलेला आहे; परंतु रस्ते सफाई करताना सफाई कामगारांकडून तो उचलला जात नाही. यामुळे नागरिकांना पदपथावरून चालता येत नसल्याने गैरसोय होत आहे. कचरा कुजत चालल्याने दुर्गंधी पसरत असून, आरोग्याचा प्रश्न निर्माण झाल्याचा संताप सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केला.तक्रारींची दखल नाहीपाल्यांना शाळेत सोडण्यासाठी येणाºया पालकांनाही याचा त्रास होत आहे. यासंदर्भात त्यांनी पालिकेच्या अधिकाºयांकडे अनेकदा तक्रार केली; परंतु केवळ ठरावीकच बाबींना प्राधान्य देणारे प्रशासन घणसोलीत नागरी समस्या सोडवण्याकडे फारसे लक्ष देत नसल्याचीही खंत सामाजिक कार्यकर्ते अ‍ॅड. स्वप्निल जगताप यांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई