शहरं
Join us  
Trending Stories
1
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
2
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
3
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
4
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
5
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट
6
Ather Energy IPOसह २ आयपीओ आजपासून गुंतवणूकीसाठी खुले, पाहा GMP सह अन्य डिटेल्स
7
"धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’’, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा सवाल  
8
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला साडे तीन मुहूर्तामध्ये स्थान का? जाणून घ्या विविध कारणं!
9
पुणे-पनवेल-पुणे प्रवास अन् सिट्रॉएन ईसी 3 ईव्ही, परतीच्या प्रवासात थोडी एन्झायटी होती...; किती रेंज दिली?...
10
डेटा संपल्यानंतर तुम्ही पब्लिक Wi-Fi वापरता? सावधगिरी बाळगा अन्यथा बँक खातं होईल रिकामं
11
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
12
अक्षय कुमार नव्हे तर इंडस्ट्रीतील हे तीन कलाकार आहेत परेश रावल यांचे खास मित्र, म्हणाले-
13
Akshaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना आठवणीने दाखवा आंब्यांचा नैवेद्य; कारण..
14
"तुमचे बजेट आमच्या लष्करी बजेटइतकेही नाही", ओवैसींनी पाकला सुनावलं, म्हणाले, "तुम्ही भारतापेक्षा अर्धा तास..."
15
सोलापूर बाजार समिती निवडणूक: आमदार सुभाष देशमुख गटाची विजयी सुरूवात
16
Samudra Shastra: तुमच्या बोटांच्या नखावर अर्धचंद्र किंवा पांढरा डाग आहे का? जाणून घ्या महत्त्व!
17
भारतासोबत युद्ध न झालेलेच बरे; युद्धाचा प्रस्ताव घेऊन गेलेल्या शाहबाज यांना नवाझ शरीफ यांचा सल्ला
18
पॅडी दादाने पाहिला सूरज चव्हाणचा 'झापूक झापुक'; कौतुक करत म्हणाले, "सुखद धक्का..."
19
भारतात कोणत्या बँकेचे क्रेडिट कार्ड सर्वाधिक लोकप्रिय?
20
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली

गणेश नाईक-जितेंद्र आव्हाड यांच्यात पुन्हा जुंपली; शरद पवारांवरील वक्तव्याचे पडसाद

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 06:52 IST

नवी मुंबई पालिका निवडणूक रंगणार

नवी मुंबई /ठाणे : नवी मुंबई महापालिकेची येऊ घातलेली सार्वत्रिक निवडणूकगणेश नाईक- जितेंद्र आव्हाड यांच्यामुळे चांगलीच रंगणार आहे. बाप बदलणाऱ्याची माझी औलाद नाही, माझा बाप एकच आहे, अशा शब्दांत आव्हाड यांनी गणेश नाईकांवर टीका केली होती. आव्हाडांच्या या टीकेला उत्तर देताना बुधवारी नाईक यांनी शरद पवार यांनीही पक्ष बदलले आहेत. मग त्यांचाही बाप काढणार का, असा सवाल केला आहे.

तर पक्षांतर करणाºया शरद पवारांची गणनाही बाप बदलणाºया औलादींमध्ये करणार का? या गणेश नाईक यांच्या वक्तव्याचा खरपूस समाचार घेताना, गृहनिर्माण मंत्री डॉ. जितेंद्र आव्हाड यांनी नाईक हे कृतघ्न असल्याचा आरोप बुधवारी केला आहे. गणेश नाईक यांनी राष्ट्रवादी सोडून अलीकडेच भाजपमध्ये प्रवेश केला. त्यांच्या या भूमिकेवर दर दहा वर्षांनी मला बाप बदलण्याची सवय नाही, असा टोला मंगळवारी आव्हाड यांनी लगावला होता. त्याला नाईक यांनी तितक्याच आक्रमकपणे उत्तर दिले आहे. एकाएकी कोण पक्ष बदलत नाही. जनतेसाठी, विकासकामांसाठी, स्वाभिमानासाठी आपण पक्ष बदलले आहेत. आपल्या आधी शरद पवार साहेबांनीही अनेक वेळा पक्षबदल केला आहे. मग पवार यांची गणनादेखील बाप बदलणाºया औलादीत करणार का, असा प्रतिप्रश्न नाईक यांनी उपस्थित केला आहे.

डॉ. आव्हाड यांनी म्हटले आहे की, शरद पवारांचा इतिहास गणेश नाईक यांना कितपत माहीत आहे, हे मला माहीत नाही. शरद पवार यांनी बाप नाही बदलला, तर ते स्वत:च बाप झालेत. १९७७ आणि १९९९ साली त्यांनी पक्ष काढून तुमच्यासारखे ६० ते ७० आमदार निवडून आणले. त्याला बाप बदलणे, नव्हे बाप होणे म्हणतात. तुम्ही कृतघ्न आहात, हेच मला नवी मुंबईकरांना दाखवायचे होते. ते मी पुराव्यानिशी दाखवून दिले, असे आव्हाड यांनी म्हटले आहे.

आगरी समाजाची घरे पाडत असताना नाईक कधी धावून गेले नाहीत, मी गेलो होतो, विटाव्याची घरे पाडत असताना जेव्हा जेव्हा आगरी समाजावर संकट आले, तेव्हा तेव्हा तुम्ही कायद्याची चौकट दाखवत निघून गेलात. पुन:सीमांकन झाले पाहिजे, हे दाखवून देण्याची ताकद आमच्यात आहे. ते आम्ही करून दाखवले, तुम्ही ते नाही केलेत. आपला राजकीय हेतू साध्य व्हावा, यासाठी आपल्या मुलाचा बळी दिलात. तेव्हा समाजाची काय बिशाद, असे आव्हाड यांनी म्हटले.

खाली कोण घसरले?तुमच्यावर केलेल्या उपकारांची तुम्हाला कधीही जाणीव नसते. आगरी समाजाने असो, नवी मुंबईकरांनी असो, बाळासाहेबांनी असो की, शरद पवारांनी; तुम्ही त्यांची जाण कधीच ठेवली नाही. महत्त्वाचे म्हणजे बाप काढण्याचे विधान तुमचे आहे, मी बाप काढला नाही. कुठल्या तरी फडतूस पिक्चरचा डायलॉग वापरून तुम्ही बाप काढला होता. त्यामुळे खाली घसरलात तुम्ही की मी, हे आठवले तर बरे, असेही आव्हाड यांनी म्हटले.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकJitendra Awhadजितेंद्र आव्हाडElectionनिवडणूक