शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
2
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
3
UPSC Result : वडिलांचे छत्र हरपले तरी साेडली नाही जिद्द; पुण्यात राहून घेतली ‘यूपीएससी’त झेप
4
भाजपाच्या केंद्रीय नेतृत्वानं टाकला नवा बॉम्ब; आजी-माजी आमदार, खासदारांना दणका
5
UPSC Result : निरक्षर आईने दाखविला यूपीएससीचा मार्ग;डाॅ. अक्षय मुंडे याची यशाला गवसणी
6
अहिल्यानगरमधील चोंडीतील मंत्रिमंडळ बैठक पुढे ढकलली; नवी तारीख कोणती?
7
Todays Horoscope : आज आर्थिक गुंतवणूक विचारपूर्वक करा; जाणून घ्या तुमचे राशीभविष्य
8
वाह रे पठ्ठया...! २२ व्या वर्षीच झाला आयएएस; पुण्याच्या शिवांशचं पहिल्याच प्रयत्नात यश
9
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
10
जम्मू- काश्मीरच्या पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात पुण्यातील दोघे जखमी
11
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
12
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
13
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
14
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
15
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
16
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
17
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
18
महानगरांमध्ये अघोषित पाणीबाणी लागू; तहान भागत नाही?, निमूट पैसे मोजा, टँकर मागवा!
19
अवघ्या ७७ चौरस फुटाच्या घरात राहते युवती; इवल्याशा खोलीनं संपवला जीवनातील संघर्ष
20
आदिवासी भागातून UPSC परीक्षेत यश मिळवणारे पहिलेच युवक; इंटरनेटवरील व्हिडीओद्वारे केला अभ्यास

मुख्यमंत्र्यांच्या समक्ष गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले- नवी मुंबईत माजली हाेती अनागोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:08 IST

पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईत अनागोंदी कारभार माजल्याची खंत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या. त्या सहन करून आपण वेळ मारून नेल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सांगितले, तर काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टी आपण वेळोवेळी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निदर्शनात आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या. मोठा एक्सल ज्या दिशेला जाईल, त्याच दिशेला छोटा एक्सल जातो असे उदाहरण देऊन त्यांनी त्या काळात काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या असल्याचे म्हणाले.  

गतकाळातील पोलिस अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष हल्ला

भविष्यात महाराष्ट्राचे अर्थकारण, औद्योगिकरण, शिक्षण व आरोग्य यात महाराष्ट्र अग्रेसर राहील असेही ते म्हणाले. सगळेच आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीत, उडदामागे काळे गोरे असतात, अशांना नजरेत ठेवून आयुक्त मिलिंद भारंबे यांना तुमच्या घटकाचे काहीतरी चुकीचे चालले असल्याचे निदर्शनात आणून दिल्याचेही ते म्हणाले. वनमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस