शहरं
Join us  
Trending Stories
1
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
2
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
3
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
4
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
5
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
6
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
7
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
8
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
9
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
10
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
11
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
12
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा
13
लग्नासाठी गोव्याला घेऊन गेला, पण तिथेच नेऊन खेळ संपवला! माथेफिरू प्रियकराला अटक
14
आतापर्यंत इस्रायलच्या हल्ल्यात इराणचे किती लोक मारले गेले? आकडा पाहून धक्का बसेल; तेहरान सोडून पळ काढणाऱ्यांचीही लागली रांग
15
इतिहासाची पुनरावृत्ती... तारीख, दिवस अन् घटनाही त्याच; ८४ वर्षापूर्वी घडलेले, सेम टू सेम...
16
एका दिवसांत किती वेळाही Toll क्रॉस करा; वार्षिक पासमुळे सामान्यांना काय होणार फायदा?
17
१९९५पासूनचा बालेकिल्ला ढासळला, कोकणात ठाकरे गटाला धक्का; माजी आमदार, नेते NCP अजित पवार गटात
18
महापालिका निवडणुकीचे वारे वाहताच, उल्हासनगरात ठाकरेसेनेच्या पदाधिकाऱ्याच्या घरावर पेट्रोल टाकून पेटविण्याचा प्रयत्न
19
पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याने चर्चेत आलाय 'हा' छोटासा देश, तुम्हीही बनवू शकता फिरायचा प्लान!

मुख्यमंत्र्यांच्या समक्ष गणेश नाईकांची एकनाथ शिंदेंवर टीका, म्हणाले- नवी मुंबईत माजली हाेती अनागोंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 9, 2025 06:08 IST

पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या

लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई : माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यकाळात नवी मुंबईत अनागोंदी कारभार माजल्याची खंत वनमंत्री गणेश नाईक यांनी व्यक्त केली. शिंदेंची इच्छा नसतानाही काही गोष्टी चुकीच्या घडल्या. त्या सहन करून आपण वेळ मारून नेल्याचेही त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमोरच सांगितले, तर काही अधिकाऱ्यांच्या चुकीच्या गोष्टी आपण वेळोवेळी पोलिस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या निदर्शनात आणून दिल्याचेही त्यांनी सांगितले. 

पोलिसांतर्फे वाशी येथे आयोजित कार्यक्रमात मुख्यमंत्री फडणवीस यांच्यासमोर नाईक यांनी भावना व्यक्त केल्या. मोठा एक्सल ज्या दिशेला जाईल, त्याच दिशेला छोटा एक्सल जातो असे उदाहरण देऊन त्यांनी त्या काळात काही गोष्टी आपल्याला सहन कराव्या लागल्या असल्याचे म्हणाले.  

गतकाळातील पोलिस अधिकाऱ्यांवर अप्रत्यक्ष हल्ला

भविष्यात महाराष्ट्राचे अर्थकारण, औद्योगिकरण, शिक्षण व आरोग्य यात महाराष्ट्र अग्रेसर राहील असेही ते म्हणाले. सगळेच आपल्या इच्छेनुसार काम करणार नाहीत, उडदामागे काळे गोरे असतात, अशांना नजरेत ठेवून आयुक्त मिलिंद भारंबे यांना तुमच्या घटकाचे काहीतरी चुकीचे चालले असल्याचे निदर्शनात आणून दिल्याचेही ते म्हणाले. वनमंत्रिपदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर गणेश नाईक प्रथमच नवी मुंबईतील कार्यक्रमात बोलत होते.

टॅग्स :Ganesh Naikगणेश नाईकEknath Shindeएकनाथ शिंदेDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसNavi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस