शहरं
Join us  
Trending Stories
1
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
2
पाकिस्तानी ओसामा...! आधार कार्ड, रेशन कार्ड, मतदानही केले, आता सरकारी नोकरीची तयारी करतोय
3
IPS देवेन भारती मुंबईचे नवे पोलीस आयुक्त; २६/११ हल्ल्याच्या तपासाचे केले होते नेतृत्व
4
पाकिस्तानने तुमच्यासाठी दहशतवाद पोसला का, यावर अमेरिका चिडीचूप; म्हणे भारताला फोन करणार...
5
२३ वर्षांची शिक्षिका ११ वर्षाच्या विद्यार्थ्याला घेऊन फरार; पोलिसांना मिळाला पळून जातानाच व्हिडीओ
6
घरबसल्या सोनं खरं आहे खोटं चेक करा, मिनिटांत ओळखू शकाल; 'या' आहेत ५ पद्धती
7
"मला वाचवा, हे लोक माझं लग्न लावतील"; किडनॅप झालेल्या बायकोचा मेसेज; नवऱ्याची शोधाशोध
8
अखिलेश यादव यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची तुलना; फोटो पाहून मायावती संतापल्या
9
२ महिन्यांपूर्वी CRPF जवानासोबत ऑनलाईन निकाह; पाकिस्तानात परतताना 'ती' झाली भावुक
10
"परत दिसला तर मारून टाकेन"; मारहाणीनंतर काश्मिरी दुकानदारांनी सोडले मसुरी, म्हणाले, "कोणीच मदत केली नाही"
11
अक्षय्य तृतीयेच्या दिवशी सोने अचानक स्वस्त का झाले? २४ कॅरेट सोन्याचा १० ग्रॅमचा 'हा' आहे नवीन दर
12
पहलगाम हल्ल्याचा म्होरक्या हाशिम मुसा! कुठे घेतलं ट्रेनिंग, काश्मीरपर्यंत कसा पोहोचला?
13
शौर्य चक्राने सन्मानित शहीद काँस्टेबलची आई पीओकेमधील; पाकिस्तानला जातेय समजताच...
14
बाबरी मस्जिदची पहिली वीट पाकिस्तानी सैनिक रचेल; पाक नेत्यांची हास्यास्पद विधाने सुरूच
15
हायकोर्टाची नाराजी, IAS, IPS अन् धनाढ्य लोकांच्या मुलांना फटका बसणार; काय आहे प्रकरण?
16
कोणाचे काय, तर कोणाचे काय...! भारतीय चाहत्याला आले पाकिस्तानी अभिनेत्रीच्या पाण्याचे टेन्शन; पाठवले बॉक्स
17
गुगल पे देणार १० लाख रुपयांपर्यंत पर्सनल लोन? व्याजदर किती? कसा करायचा अर्ज?
18
स्विस बँकेत प्रचंड पैसा, ४० अब्ज डॉलर्सचा बिझनेस; पाकिस्तानचं सैन्यच आहे देशाचा खरा 'मालक'
19
Bhushan Gavai: महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ
20
Akashaya Tritiya 2025: अक्षय्य तृतीयेला पितरांना करा जलदान, कुंभ देऊन व्हा पुण्यवान!

गणरायाचे आगमन होणार खड्ड्यांतूनच!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 12, 2018 02:34 IST

गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे.

नवी मुंबई : गणरायाचे आगमन दोन दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यानुसार बाप्पाच्या स्वागतासाठी नवी मुंबईकरांची लगबग सुरू झाली आहे. मात्र, नादुरुस्त रस्त्यांचा ताप भाविकांना जाणवत आहे. गणेशोत्सवाअगोदर शहरातील रस्त्यांची डागडुजी होणे आवश्यक होते; परंतु महापालिकेने या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने गणरायाचे स्वागत खड्ड्यांतूनच करण्याची वेळ शहरवासीयांवर ओढावली आहे.शहरातील प्रमुख मार्गासह अंतर्गत रस्त्यांची चाळण झाली आहे. ठिकठिकाणी खड्डे पडल्याने वाहनधारकांची कसरत होत आहे. शहराच्या मध्यभागातून जाणाऱ्या सायन-पनवेल महामार्गाची तर अक्षरश: चाळण झाली आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर काही दिवसांपूर्वी या मार्गावरील खड्डे बुजविण्याचा सोपस्कार पूर्ण करण्यात आला; परंतु अवघ्या २४ तासांत या कामाचे पितळ उघडे पडले. महामार्गापेक्षा शहरवासीयांना अंतर्गत रस्त्यांचा प्रश्न सतावत आहे. कारण बहुतांशी रस्ते उखडले आहेत. वसाहतीअंतर्गतच्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पादचाºयांनाही त्रास होत आहे. वाहनधारकांना तर कसरत करावी लागत आहे. कोपरी सिग्नलपासून ब्ल्यू डायमंड चौकाकडे जाणाºया अंतर्गत रस्त्याची वाताहत झाली आहे. रस्त्याच्या मध्यभागी असलेले मलनि:सारणाच्या चेंबरचे झाकण उखडले आहे. हा संपूर्ण रस्ता खड्डेमय झाला आहे. विशेष म्हणजे अनेकदा या मार्गावरील पथदिवे बंद असतात. त्यामुळे रात्रीच्या वेळी सुसाट धावणाºया दुचाकी व रिक्षांच्या अपघाताची शक्यता वाढली आहे. कोपरखैरणेच्या काही भागात मध्यंतरी डांबराचा भराव टाकून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले; परंतु हे कामसुद्धा निकृष्ट दर्जाचे ठरले आहे. ऐन गणेशोत्सवाच्या तोंडावर हे खड्डे पुन्हा उघडे पडले आहेत. कोपरखैरणेप्रमाणेच वाशी, घणसोली, ऐरोली, तुर्भे, सानपाडा, नेरूळ व बेलापूर विभागातील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था झाली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची चिंता वाढली आहे. १३ सप्टेंबर रोजी गणेशाचे आगमन होत आहे. त्याधर्तीवर शहरवासीयांची लगबग सुरू झाली आहे; परंतु लाडक्या बाप्पाच्या स्वागतात खड्ड्यांचे विघ्न घोंगावू लागल्याने रहिवाशांनी संताप व्यक्त केला आहे.>सार्वजनिक गणेश मंडळांना चिंताशहरात सार्वजनिक गणेशोत्सवाचा वेगळाच थाट असतो. मागील काही वर्षांत आकर्षक व मोठ्या गणेशमूर्तींवर मंडळांनी भर दिला आहे.काही गणेशोत्सवाला ३० ते ४० वर्षांची परंपरा आहे. त्यामुळे गणेश चतुर्थीअगोदर थाटामाटात श्रींची मूर्ती आणली जाते.यावर्षी रस्त्यावरील खड्ड्यांमुळे गणेशमूर्ती आणताना मंडळांची तारांबळ उडाली. काही मंडळांच्या गणेशमूर्ती आदल्या दिवशी आणल्या जातात.खडतर रस्त्यातून मंगलमूर्ती आणण्याचे चिंताजनक आव्हान गणेशमंडळांसमोर उभे ठाकले आहे.>लोकप्रतिनिधींची चुप्पीस्वच्छ सर्वेक्षण अभियानाअंतर्गत घनकचरा व्यवस्थापनात देशात अव्वल ठरलेल्या नवी मुंबईत रस्त्यांची समस्या गंभीर बनली आहे. सायन-पनवेल महामार्गाच्या दुरवस्थेचा फटका शहराच्या लौकिकाला बसलाच आहे. यात आता अंतर्गत रस्त्यांच्या समस्येचीही भर पडू लागली आहे. या प्रश्नावर लोकप्रतिनिधींनीही चुप्पी साधल्याने गणेशभक्तांनी नाराजी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Ganesh Chaturthi 2018गणेश चतुर्थी २०१८Potholeखड्डेGanpati Festivalगणेशोत्सव