शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांची बुद्धी चांगली होती, आता गंज लागलाय कारण..."; संदीप देशपांडेंचे दुबार मतदारांवरून उलट सवाल
2
रझा अकादमीविरोधात लाखोंचा मोर्चा राज ठाकरेंनी काढला, तेव्हा भाजपावाले कुठे होते?; मनसेचा पलटवार
3
डंपर बनला काळ! कारला धडक देत ५ वाहनांना उडवले, ५० जणांना चिरडले, १० जणांचा मृत्यू   
4
प्रसिद्ध वकील असिम सरोदे यांची सनद तीन महिन्यांसाठी रद्द, समोर आलं असं कारण
5
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
6
‘हर-मन-की बात’... कुशीत ट्रॉफी, आणि टी-शर्टवरील खोडलेला ‘A Gentleman’s’ शब्दासह दिलेला मेसेज चर्चेत
7
टेक फंडांचा एका वर्षात निगेटिव्ह परतावा! 'या' ५ योजनांमध्ये सर्वाधिक नुकसान, गुंतवणूकदारांनी काय करावे?
8
"तेव्हा वाचलो पण आता प्रत्येक दिवस..."; अहमदाबाद विमान दुर्घटनेतून बचावलेल्या एकमेव व्यक्तीला 'या' गोष्टीचं दुःख!
9
आलिया भटच्या 'अल्फा' सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलली, 'या' कारणामुळे घेतला निर्णय
10
खळबळजनक! बायकोची हत्या; मृतदेहासह दीड वर्षांच्या लेकाला खोलीत बंद करून पळाला नवरा
11
IAS बनण्याचं स्वप्न अपूर्ण राहिलं...; UPSC तयारी करणाऱ्या युवतीने का उचललं टोकाचं पाऊल?
12
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
13
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
14
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
15
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
16
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
17
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
18
Tulsi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
19
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
20
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास

मित्रानेच मित्राच्या दहा वर्षांच्या मुलाचा गळा कापला

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2024 21:08 IST

उरण येथील दुदैवी घटना

मधुकर ठाकूर ,उरण: घरी पोहचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने ओळखीच्या मित्राकडे सोपविलेल्या दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव यांचे अपहरण करून  मित्रांनेच गळा चिरून हत्या केली. हत्येनंतर मृतदेह खोपटा खाडीत टाकून पलायनाच्या तयारीत असलेल्या आरोपीच्या उरण पोलिसांनी दिड तासातच मुसक्या आवळल्या आहेत.

उरण तालुक्यातील चिर्ले गावात बिंदू राम अजोर (३३) हे गृहस्थ पत्नी आणि एकुलत्या एक असलेल्या दहा वर्षे वयाच्या हर्षसह मढवी यांच्या चाळीत भाड्याने राहत आहेत.पत्नी गावी गेल्यावर मुलगा आणि वडील घरी एकटेच आहेत.बिंदू हे वाहनचालक असल्याने त्यांच्या घरी येण्याच्या वेळा ठरलेल्या नाहीत.त्यामुळे कामासाठी बाहेर पडल्यावर  घरात मुलगा एकटाच राहात असल्याने वडिलांना काळजी लागून राहते. यामुळे बिंदू यांनी मंगळवारी मुलाला सोबतच घेऊन कामावर निघाले होते.मात्र वाहनातून मालाची डिलिव्हरी करण्यासाठी ग्लोबल लॉजिस्टिक्स टर्मिनलमध्ये लहान मुलाला प्रवेश देण्यास सुरक्षा रक्षकांनी नकार दिला.यामुळे मुलाला कुठे ठेवायचे या विवंचनेत असतानाच त्यांच्या शेजारीच राहणाऱ्या आरोपी कांताराम सिताराम यादव त्याठिकाणी आलेला दिसला. कंपनीत माल उतरविण्यात उशीर होणार असल्याने बिंदू यांनी मुलगा हर्ष याला चिरडले येथील घरी घेऊन जाण्यासाठी आरोपी कांताराम यादव याच्याकडे स्वाधीन केले.

मात्र मालाची डिलिव्हरी झाल्यानंतर हर्ष घरी पोहचला की नाही याची माहिती घेण्यासाठी मोबाईलवरून संपर्क साधला.मात्र आरोपींकडून काही एक प्रतिसाद मिळाला नसल्याने बिंदू राम यांनी रात्री घर गाठले.मात्र घरी ना मुलगा सापडला ना कांताराम.

यामुळे बिंदू राम यांनी कांताराम व मुलाचा रात्रभर परिसरात शोध घेतला.मात्र दोघांचाही ठावठिकाणा लागला नाही.दरम्यान सकाळी खोपटा -पोगोटे रिलायन्स या कोस्टल रोड वरील खाडीत येथील सुरक्षा रक्षकाला आढळून आला.त्यांनी वेळ न दवडता तत्काळ उरण पोलिसांना खबर दिली.

खबर मिळताच उरण पोलीस पथकानेही घटनास्थळी धाव घेतली.खाडीत धारदार शस्त्राने हर्ष याचा गळा चिरून हत्या करून टाकलेले मृतदेह आढळला. एव्हाना वडिल पोलिस ठाण्यात फिर्यादीसाठी पोहचले होते.तांत्रिक मदतीने पोलिसांनीही शिताफीने संशयित आरोपी कांतारामला पलायनाच्या तयारीत असतानाच ताब्यात घेतले.पोलिसी खाक्या दाखविताच जुन्या भांडणाचा राग धरून हर्षची हत्या केली असल्याची कबुली आरोपींनी दिली असल्याची माहिती उरण पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सतीश निकम यांनी दिली.

दरम्यान घरी पोहचविण्यासाठी मोठ्या विश्वासाने ओळखीच्या मित्राकडे सोपविलेले.मात्र दहा वर्षीय निष्पाप हर्ष बिंदू यादव यांचे अपहरण करून  निष्पाप जीवाची गळा चिरून हत्या केली.मित्रांनेच एकुलत्या एक असलेल्या मित्राच्या मुलांची गळा चिरून हत्येच्या दुदैवी प्रकारामुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.एकुलत्या एक मुलांची झालेल्या अमानुष हत्येमुळे वडीलही पार कोलमडून गेले आहेत. एकुलत्या एक मुलाला उच्च शिक्षण देण्यासाठी दुसरे मुल होण्यापूर्वीच नसबंदी शस्त्रक्रिया करून घेतली असल्याचे दुदैवी पित्याने सांगितले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीuran-acउरण