शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

ट्रॅव्हल्समधील मालवाहतूक ठरतेय जीवघेणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2020 1:09 AM

नियमांना बगल

नवी मुंबई : खासगी ट्रॅव्हल्समधून अवैधरीत्या होत असलेल्या मालवाहतुकीमुळे प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण होत आहे. यानंतरही उघडपणे ट्रॅव्हल्समधून ज्वलनशील पदार्थांची वाहतूक होत आहे. अशा ट्रॅव्हल्सवरील कारवाईकडे आरटीओ तसेच वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.

राज्याच्या अनेक भागांतील प्रवाशांसाठी चालविल्या जाणाऱ्या खासगी ट्रॅव्हल्सचे जाळे मुंबईसह ठाणे व नवी मुंबईला जोडले गेलेले आहे. त्यानुसार नवी मुंबईतून दररोज शेकडो ट्रॅव्हल्स ये-जा करतात. लॉकडाऊनमध्ये ट्रॅव्हल्सला लागलेला ब्रेक आता अनलॉकमध्ये हटला आहे. परंतु प्रवासी वाहतुकीला परवानगी असताना बहुतांश ट्रॅव्हल्स कुरियरच्या सामानाची वाहतूक करण्यासाठी वापरल्या जात आहेत. ट्रान्सपोर्ट कंपनीमार्फत होणारा खर्च टाळण्यासाठी स्वस्तात ट्रॅव्हल्समधून एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणापर्यंत मालवाहतूक करण्यात येत आहे. मात्र त्यामुळे अपघातांच्या घटना घडत आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन वर्षांपूर्वी खासगी ट्रॅव्हल्समधून मालवाहतुकीवर बंदी घालण्यात आली आहे. परंतु ही बंदी केवळ कागदावरच असल्याचे प्रत्यक्षात पाहायला मिळत आहे. परिणामी, प्रवाशांवर मृत्यूची टांगती तलवार लटकत आहे. अशाच प्रकरणातून शनिवारी ३५ प्रवाशांच्या जीविताला धोका निर्माण झाला होता. आकांक्षा ट्रॅव्हल्सची बस मुंबईकडे येत असताना सानपाडा येथे बसला आग लागली. बसमधील कुरियरचे साहित्य उतरविले जात असताना ही दुर्घटना घडली. घटनेवेळी बसमध्ये ३५ प्रवासी होते, त्यापैकी एकाला दुखापत झाली आहे. तर बस थांबलेली असल्याने प्रवाशांनी तत्काळ बाहेर पळ काढल्याने त्यांचे प्राण वाचले.बसला लागलेली आग विझविताना बसच्या डिक्कीत औषधे व इतर सामान असल्याचे आढळून आले. त्यात सॅनिटायझरचादेखील साठा होता असे समजते. त्यामुळेच क्षणांत संपूर्ण बस जळून खाक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTravel Tipsट्रॅव्हल टिप्स