शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

खाद्यपदार्थ विक्रेत्यांमुळे शहराची सुरक्षा ‘गॅसवर’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2020 11:29 PM

आगीचा धोका । वडापाव, चायनीसविक्रेत्यांवरील कारवाईत पालिका उदासीन

सूर्यकांत वाघमारे ।लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : उघड्यावर खाद्यपदार्थ विक्रेत्यांवरील कारवाईकडे पालिका अधिकारी दुर्लक्ष करताना दिसत आहेत. परिणामी, शहरातील महत्त्वाचे नाके, चौक गॅसवर असून, त्या ठिकाणी आगीचा धोका सतावत आहे. भविष्यात अशा प्रकारची दुर्घटना घडल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते.प्रशासनाच्या उदासीनतेमुळे दिवसेंदिवस शहरातील अनधिकृत फेरीवाले वाढत चालले आहेत. त्यात शहराबाहेरून येणाऱ्यांचा सर्वाधिक समावेश आहे. काही ठिकाणी अर्थपूर्ण संबंध जोपासून आठवडे बाजारही भरवले जात आहेत. तर अनेक नोडमधील रस्ते, पदपथ पूर्णपणे फेरीवाल्यांनी बळकावले आहेत, त्यात उघड्यावरचे अन्नपदार्थ शिजवणाºया विक्रेत्यांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून रहदारीच्या ठिकाणीच गॅस सिलिंडरचा वापर करून अन्नपदार्थ शिजवले जात आहेत. याकरिता घरगुती तसेच व्यावसायिक वापराचे सिलिंडर वापरले जात आहेत. अशा वेळी एखाद्या चुकीमुळे आग लागल्यास सिलिंडरचा स्फोटही होऊ शकतो, असे बहुतांश खाद्यपदार्थविक्रेते महत्त्वाचे चौक व रदहारीच्या रस्त्यांलगतच बसलेले असतात. यामुळे त्यांच्याकडील सिलिंडरचा स्फोट झाल्यास त्यामध्ये मोठी जीवितहानी होऊ शकते. अथवा खाद्यपदार्थ तळण्यासाठी वापरले जाणारे तेलही पादचारी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. तर त्यांच्याकडून विकले जाणारे पदार्थ आरोग्याच्या दृष्टीनेही हानिकारक असताना पालिकेच्या आरोग्य विभागासह अतिक्रमण विभागाकडून अर्थपूर्ण दुर्लक्ष होताना दिसत आहे. बारच्या मार्गावर, मद्यविक्री केंद्राबाहेर, रेल्वेस्थानकसमोरील चौक, जास्त वर्दळ असलेले चौक याशिवाय अनेक विभाग कार्यालयाजवळही असे खाद्यपदार्थविक्रेते दिसून येत आहेत. त्यांच्याविरोधात अनेकांनी पालिका अधिकाऱ्यांकडे तक्रारीही केलेल्या आहेत. यानंतरही उघड्यावर गॅस सिलिंडरचा वापर करून खाद्यपदार्थ शिजवणाºयांवर कारवाईकडे दुर्लक्ष होत आहे, त्यामुळे प्रशासनाच्या भूमिकेविषयी नागरिकांकडून नाराजी व्यक्त होत आहे.नागरिकांच्या सुरक्षाप्रकरणी पोलिसांकडून मोहीम१अखेर उघड्यावर ज्वलनशील वस्तूंचा वापर करून नागरिकांचा जीव धोक्यात घातल्याप्रकरणी पोलिसांकडून कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. त्यानुसार मागील काही दिवसांत सीबीडी, रबाळे, एनआरआय पोलिसांकडून संबंधितांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.२सार्वजनिक ठिकाणी गॅस सिलिंडरचा वापर करून नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण केला जात असल्याने पोलिसांकडून ही मोहीम हाती घेण्यात आली आहे.३परिमंडळ उपायुक्त पंकज डहाणे यांनी तशा प्रकारच्या सूचना सर्व पोलीस ठाण्यांना दिल्या आहेत; परंतु पालिकेकडून मात्र अशा प्रकारची मोहीम हाती घेतली जात नसल्याची नाराजी नागरिकांकडून व्यक्त होत आहे, त्यामुळे अद्यापही अनेक ठिकाणी मध्यरात्रीपर्यंत वडापाव, भुर्जीपाव व चायनीसच्या गाड्या दिसून येत आहेत.उघड्यावर अन्नपदार्थ शिजवणाºयांकडून नागरिकांच्या जीविताला धोका उद्भवत आहे. त्या ठिकाणी एखादी दुर्घटना घडल्यास मोठी हानी होऊ शकते, त्यामुळे पदपथांवर, सार्वजनिक ठिकाणी अन्नपदार्थ शिजवणाºया फेरीवाल्यांवर कारवाईची मोहीम हाती घेतली आहे.- पंकज डहाणे,पोलीस उपायुक्त