शहरं
Join us  
Trending Stories
1
नरहरी झिरवाळ यांच्या 'त्या' फोटोमागचं सत्य भलेतच; खुद्द झिरवाळांनी केला खुलासा
2
"काँग्रेसनेही चुका केल्या, येत्या काळात राजकारणात..."; राहुल गांधींचं मोठं विधान
3
भारताची संरक्षण व्यवस्था अन् आर्थिक परिस्थिती मजबूत राहील; भेंडवळचं भाकीत
4
शिवाजी पार्कचे बुकिंग केले मनसेने, सभा मात्र मोदींची होणार, १७ मे रोजी महायुतीची रॅली
5
धक्कादायक! आई, पत्नीची केली हत्या, तीन मुलांना छतावरून फेकून केलं ठार, अखेरीस स्वत:ही संपवलं जीवन
6
"आम्ही बांगड्या घालून बसलो नाही"; गुन्हा दाखल होताच नवनीत राणांचा ओवीसींना इशारा
7
'फक्त तीन टक्के राजकारणी...'; ईडी कारवायांवरुन मोदींचे महत्त्वाचे विधान
8
आयर्लंडचा पाकिस्तानवर सनसनाटी विजय, टी-२० वर्ल्डकपआधी नोंदवला धक्कादायक निकाल
9
पोलीस बाजूला ठेवून जनतेत येऊन दाखवा; उद्धव ठाकरेंचं नरेंद्र मोदींना चॅलेंज
10
"मोदींना दिल्लीत पाठवायचं ठरवलंय अन्.."; मुरलीधर मोहोळ यांच्या प्रचारसभेत प्रवीण तरडेंचं भाषण गाजलं
11
चांगल्या पगाराची नोकरी सोडली, नारळाचं कवच हाती घेतलं अन् मुंबईची पोरगी कोट्यधीश बनली
12
Mutual Fund मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी; KYC स्टेटस त्वरित चेक करा 
13
IIT मधून शिक्षण, ओबामांच्याही टीमचा होते भाग; गुरुराज देशपांडेंनी ₹२०८ कोटींचं केलं दान; सुधा मूर्तींशी आहे कनेक्शन
14
Vinayak Chaturthi 2024: संकटमुक्तीसाठी हनुमान चालीसा म्हणता, तशी विनायकीनिमित्त गणेश चालीसा म्हणा!
15
भेंडवळच्या प्रसिद्ध घटमांडणीचा अंदाज जाहीर, पाऊस, पिकांबाबत केलं असं भाकित 
16
होणाऱ्या बायकोचा चेहरा लपवला, 'छोटा भाईजान' अब्दूने अखेर साखरपुडा केला
17
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२४; कोणत्याही अवैध कामापासून दूर राहा, नाहीतर...
18
डॉक्टर पत्नीला २ प्रियकरांसोबत हॉटेलमध्ये आक्षेपार्ह अवस्थेत पकडलं; पतीनं बेदम मारलं
19
Tarot Card: आगामी काळात यशप्राप्तीचे संकेत; पण अर्ध्या हळकुंडाने पिवळे होऊ नका; वाचा साप्ताहिक भविष्य!
20
पवार, ठाकरेंनी शिंदे आणि अजित पवार गटात यावे; पंतप्रधान मोदींचा नंदुरबारच्या सभेत सल्ला

मोबाइलच्या स्क्रीनवर फिरणाऱ्या बोटांना पडला लेखणीचा विसर, ऑनलाइन शिक्षणाचा दुष्परिणाम, हस्ताक्षराची लय, गती हरवली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2021 12:50 AM

side effects of online learning : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे.

- अरुणकुमार मेहत्रेकळंबोली : कोरोनामुळे शालेय शिक्षण ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येत आहे. यात लॅपटॉपसमोर किंवा मोबाइलवर ऑनलाइन तासिका ऐकायची असल्यामुळे पेन, वही यांचा संबंध जरा कमीच येऊ लागला. याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या लिखाणावर झाला आहे. मोबाइलवर फिरणाऱ्या बोटांना लेखणीचा विसर पडला आहे. परीक्षा जवळ आली आहे. बहुतांश विद्यार्थ्यांच्या हस्ताक्षराची लय व गती हरवल्याने पालक चिंताग्रस्त आहेत. (Fingers moving on mobile screen, forgetting to write, side effects of online learning, signature rhythm, lost speed)शैक्षणिक आयुष्यात सुंदर हस्ताक्षराला खूप महत्त्व आहे. मुलांचे अक्षर सुंदर आणि वळणदार असावे यासाठी शिक्षक आणि पालकांचा कटाक्ष असतो. तर त्यासाठी लहानपणापासून सराव करून घेतला जातो. अक्षर तसेच लिहिण्यासाठी लागणारा वेग हे दहावी, बारावीसाठी खूप महत्त्वाचे आहे. गेल्या वर्षभरापासून कोरोनाने धुमाकूळ घातला आहे. त्यामुळे शिक्षण प्रणालीवरदेखील याचा परिणाम झाला आहे. ऑनलाइन शिक्षणाचा पर्यायी वापर करण्यात येऊ लागल्याने मुलांचे लिखाण कमी झाले आहे. नुसते लेक्चर ऐकणे झाले आहे. शिकवताना रनिंग नोट्स काढण्याचे प्रमाण कमी झाल्याने हातांच्या बोटांना लेखणीचा सराव कमी होत गेला. त्यामुळे परीक्षेत मिळणाऱ्या वेळेत उत्तरपत्रिका सोडविणे मुश्कील होईल याची चिंता पालकांना सतावत आहे. मराठी विषयाचे तज्ज्ञ म्हणतात वार्षिक परीक्षा तोंडावर आल्या आहेत. कोरोना काळात मुलांचे बिघडलेले अक्षर तसेच लिखाणाची गती वाढविण्यासाठी नियमित शुद्धलेखनाचा सराव करणे खूप गरजेचे आहे. ऑनलाइनमुळे मुलांमध्ये शिथिलता आली आहे. ती घालविण्यासाठी लेखन सराव योग्य राहील. संजय खटके, शिक्षक लेखन हे एक कौशल्य आहे. ऑनलाइनमुळे कमी लिखाण झाले आहे हे खरं आहे. पण, यातूनही स्वाध्याय मुलांना दिला जातो. तो सोडवून घेण्यासाठी शिक्षक तसेच पालकांनीही लक्ष दिले पाहिजे. मुलांकडून सराव करून घेतल्याने हस्ताक्षर चांगले येते. आम्हीदेखील मुलांना लिहिण्याची आवड निर्माण करतो. खुशी सावर्डे, शिक्षिका विद्यार्थ्यांनो, हे करा!दररोज मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील वहीचे एक पान लेखन करावे. आठवड्यातून दोन वेळा घड्याळ लावून प्रश्नपेपर सोडवण्याचा सराव करावा. पर्यायी पद्धतीने गती मंदावली आहे. त्यासाठी पाठाखालील प्रश्न - उत्तरे सोडवावीत. म्हणजे गती वाढते.एकदम लिखाण न करता काही दिवस ठरावीक आणि मोजकेच लिखाण करावे, परंतु लिखाणात सातत्य ठेवणे खूप गरजेचे आहे.पालकांनी आपल्या पाल्याच्या लिखाणाकडे लक्ष देणे गरजेचे आहे. सराव खूप महत्त्वाचा आहे. त्यांना त्यासाठी मदत करावी. त्यामुळे मुलांचे लिखाण सुंदर असण्याबरोबरच लिहिण्याची गतीदेखील वाढेल. पालकांचे मत… ऑनलाइन शिक्षणामुळे गत वर्षापासून मुले केवळ ऐकत आहेत. लिखाणाकडे दुर्लक्ष झाल्याने सराव कमी झाला आहे. त्यामुळे मुले लिखाणाला कंटाळली आहेत. याचा परिणाम मुलांच्या हस्ताक्षरावर झाला आहे.- नीलम आंधळे, पालक मोबाइलमुळे लेखन थांबले आहे. शिक्षकांचा प्रत्यक्ष दबाव नसल्याने मुले निवांत अभ्यास करतात. त्यात लिखाण कमी झाल्याने हस्ताक्षर खराब येत आहे. घरीच सराव करून घेत असल्याने यात सुधारणा होत आहे.     - संजय पवार, पालक  

टॅग्स :Educationशिक्षणSchoolशाळा