शहरं
Join us  
Trending Stories
1
"खून का बदला चुकाने के लिए...!"; लंडनवरून परतताच तारिक रहमान यांनी स्पष्ट केला इरादा; काय म्हणाले?
2
‘परदेश दौऱ्यावर असताना राहुल गांधींवर पाळत ठेवली जातेय’, काँग्रेसचा केंद्र सरकारवर गंभीर आरोप
3
VIDEO: Hardik Pandya चं 'लेडी लव्ह'! गर्लफ्रेंड Mahieka Sharma ला सांभाळून कारमध्ये बसवलं...
4
Crime: आईला प्रियकरासोबत रंगेहाथ पकडलं; त्यानंतर मुलानं जे केलं त्यानं पोलीसही हादरले!
5
आधी तरुणीवर गोळ्या झाडल्या, मग स्वत:ही संपवलं जीवन, एकतर्फी प्रेमातून घडली भयंकर घटना
6
Shocking: पाळीव कुत्र्याचा आजार बरा होईना; नैराश्यातून २ सख्ख्या बहि‍णींनी संपवलं जीवन!
7
Sangli: जिच्यावर प्रेम केलं तिच्याशी विवाहाचं स्वप्न साकारलं, पण नियतीनं हिरावून घेतलं; तरुण प्राध्यापकाचा हार्ट अटॅकने मृत्यू
8
राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्टार प्रचारकांची यादी जाहीर! मुंडे, मलिकांची नावे; कोकाटेंना वगळले
9
ठाण्यात एकनाथ शिंदेंना मोठा धक्का! निष्ठावंतांना डावलताच माजी महापौरांकडून पदाचा राजीनामा
10
बिहारच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ; भाजपा मित्रपक्षालाच देणार धक्का?; आमदार फुटीची चर्चा
11
२०२६ मध्ये कोणाची साडेसातीतून मुक्तता होणार? ५ राशींवर शनि वक्री दृष्टी; सतर्क-सावध राहावे!
12
Devayani Farande: डोळ्यात पाणी, आवाजही गहिवरला...! नाशिकमधील पक्षप्रवेशानंतर भाजपा आमदार देवयानी फरांदे भावूक
13
"मूर्ती तोडण्यामागे धार्मिक हेतू नाही, तर...!"; भगवान विष्णू यांची मूर्ती पाडल्याबद्दल भारतानं व्यक्त केली होती चिंता, आता थायलंडनं दिलं असं स्पष्टीकरण
14
"चीन भारतासोबतचे संबंध विकसित करण्यावर भर देतो, कोणत्याही तिसऱ्या देशाला..."; अमेरिकेच्या अहवालावरून चीन भडकला
15
‘मी स्नेहाची हत्या केलेली नाही…’, पँटवर लिहून प्रियकरानं संपवलं जीवन, पोलिसांवर गंभीर आरोप
16
क्रिश का गाना सुनेगा..? अचानक २० वर्षांनी रंगली तुफान चर्चा, 'ले बेटा' वाला Video Viral
17
श्रीमंत व्हायचंय? 'रिच डॅड पुअर डॅड'च्या लेखकाचा गुंतवणुकीचा नवा 'मंत्र', चांदी विषयी केलं मोठं भाकित
18
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
19
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
20
“महानगरपालिकांमध्ये ‘वंचित’बरोबर आघाडी करण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न सुरू”: हर्षवर्धन सपकाळ
Daily Top 2Weekly Top 5

कामोठेवासीयांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 3, 2017 06:46 IST

कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये सुमारे २० जणांनी प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो जखमी झाले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामोठेवासीयांच्या रोजच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल-शीव महामार्ग सोमवारी रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन टळावे यासाठी नवी मुंबई पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकापच्या नेत्यांशी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली; परंतु कामोठे येथील शेकापचे कार्यकर्ते मोर्चावर ठाम आहेत. कामोठेवासीयांना वसाहतीमधून पनवेल-सायन महामार्ग गाठण्यासाठी दररोज दोन किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. अवघ्या पन्नास मीटर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने न केल्यामुळे हा घोळ झाला आहे. कामोठेवासीयांच्या या रोजच्या समस्येसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ३ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेकापच्या शिष्टमंडळासोबत शनिवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम सध्या मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबले असून, ही मंजुरी आल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, त्यानंतर निविदा पक्रिया पार पडण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल, त्यानंतर पुढील काम सुरू होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता अलगुट यांनी दिले. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कामोठेतील सर्व्हिस रोडचे रखडलेले काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.५० मीटरचे काम अपूर्णसाडेबाराशे कोटी रूपयांचा मार्ग बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वांवर बांधला. मात्र, यामधील अवघ्या पन्नास मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण न केल्यामुळे कामोठेवासीयांना कळंबोलीतील उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन मुंबईचा महामार्ग गाठावा लागतो.