शहरं
Join us  
Trending Stories
1
भयंकर थरार! इंडिगोचे विमान सापडले गारपिटीच्या तडाख्यात; प्रवाशांचा आक्रोश, विमानात प्रचंड गोंधळ
2
'तेच माझं चुकलं…’वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणाला नवे वळण देणारी ऑडिओ क्लिप व्हायरल
3
पुणे, छत्रपती संभाजीनगरला मिळाले नवे आयुक्त; सरकारकडून कोणत्या आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या?
4
'दहशतवादाला जन्म देणारा पाकिस्तान...', WHO च्या मंचावरुन भारताचा पाकवर निशाणा
5
IPL 2025 : कुलदीप यादवची 'सेंच्युरी'; मोडला हरभजन सिंगचा विक्रम
6
वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरण : पतीसह सासू, नणंदेच्या पोलीस कोठडीत वाढ
7
MI vs DC : ट्रिकी खेळपट्टीवर तळपली सूर्या भाऊची बॅट! ठोकली कडक फिफ्टी
8
Thane: रस्त्याच्या कडेला लघुशंका करताना विजेच्या तारेला स्पर्श, १७ वर्षीय मुलाचा दुर्देवी अंत
9
Yavatmal: पतीला ज्यूसमधून दिले विष, विद्यार्थ्यांच्या मदतीने जाळला मृतदेह; मुख्याध्यापिकेने बनवला होता 'यूपीएससी मिशन २०३०' ग्रुप
10
Mumbai: कधीही कोसळण्याची भीती! 'या' आहेत मुंबईतील अतिधोकायदायक इमारती, पहा संपूर्ण यादी
11
Mumbai: वाडिया रुग्णालयाला मोठं यश, झिपर स्टॉपर गिळलेल्या १० महिन्याच्या बाळाला वाचवलं!
12
'मुंबईचा राजा' नावासह छापलेल्या खास जर्सीसह रोहितचा सन्मान; MI नं चाहत्यांनाही केलं खुश
13
"माझ्या लेकीला जनावरासारखं मारलं, तिचं बाळ कुठे ठेवलंय माहिती नाही"; वैष्णवीच्या वडिलांचा आक्रोश
14
ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानपेक्षा अधिक बिथरला चीन; भारताविरोधात टाकले ४ नवे डाव
15
छत्तीसगडमध्ये 27 नक्षलवाद्यांचा खात्मा; पीएम नरेंद्र मोदींनी केले सुरक्षा दलांचे कौतुक; म्हणाले...
16
"१५ हजारांचा चायनिज ड्रोन पाडण्यासाठी १५ लाखांची मिसाईल वापरली’’,  विजय वडेट्टीवार यांची खोचक टीका 
17
'जगाची दिशाभूल करण्याचा पाकिस्तानचा प्रयत्न फसलाय', 'त्या' आरोपांवरून भारताने तिखट शब्दात सुनावले
18
MI vs DC : अक्षर पटेल का नाही?; फाफ म्हणाला. मागच्या दोन दिवसांपासून तो....
19
काळाचा घाला! साता जन्माचं नातं काही दिवसांत तुटलं; देवदर्शनावरुन परतणाऱ्या नवरा-नवरीचा मृत्यू
20
Vaishnavi Hagwane case : तुझ्या बापाला भीक लागली काय? मी तुला फुकट पोसणार काय?; शशांकने मागितले होते 2 कोटी रुपये

कामोठेवासीयांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 3, 2017 06:46 IST

कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये सुमारे २० जणांनी प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो जखमी झाले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामोठेवासीयांच्या रोजच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल-शीव महामार्ग सोमवारी रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन टळावे यासाठी नवी मुंबई पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकापच्या नेत्यांशी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली; परंतु कामोठे येथील शेकापचे कार्यकर्ते मोर्चावर ठाम आहेत. कामोठेवासीयांना वसाहतीमधून पनवेल-सायन महामार्ग गाठण्यासाठी दररोज दोन किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. अवघ्या पन्नास मीटर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने न केल्यामुळे हा घोळ झाला आहे. कामोठेवासीयांच्या या रोजच्या समस्येसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ३ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेकापच्या शिष्टमंडळासोबत शनिवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम सध्या मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबले असून, ही मंजुरी आल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, त्यानंतर निविदा पक्रिया पार पडण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल, त्यानंतर पुढील काम सुरू होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता अलगुट यांनी दिले. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कामोठेतील सर्व्हिस रोडचे रखडलेले काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.५० मीटरचे काम अपूर्णसाडेबाराशे कोटी रूपयांचा मार्ग बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वांवर बांधला. मात्र, यामधील अवघ्या पन्नास मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण न केल्यामुळे कामोठेवासीयांना कळंबोलीतील उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन मुंबईचा महामार्ग गाठावा लागतो.