शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

कामोठेवासीयांचा जीवघेणा प्रवास

By admin | Updated: July 3, 2017 06:46 IST

कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून

लोकमत न्यूज नेटवर्कपनवेल : कामोठे वसाहतीतील नागरिकांना मुंबईकडे जाण्यासाठी दररोज जीव मुठीत घेऊन बेकायदा मार्गाने प्रवास करावा लागतो. साडेतीन महिन्यांपासून हा जीवघेणा प्रकार सुरू आहे. या ठिकाणच्या अपघातांमध्ये सुमारे २० जणांनी प्राण गमवावे लागले आहेत, तर शेकडो जखमी झाले आहेत. याकडे संबंधित प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप परिसरातील नागरिकांकडून करण्यात येत आहे. कामोठेवासीयांच्या रोजच्या समस्येकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने पनवेल-शीव महामार्ग सोमवारी रोखण्याचा इशारा दिला आहे. आंदोलन टळावे यासाठी नवी मुंबई पोलीस व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी शेकापच्या नेत्यांशी शनिवारी भेट घेऊन चर्चा केली; परंतु कामोठे येथील शेकापचे कार्यकर्ते मोर्चावर ठाम आहेत. कामोठेवासीयांना वसाहतीमधून पनवेल-सायन महामार्ग गाठण्यासाठी दररोज दोन किलोमीटरचा वळसा घेऊन महामार्ग गाठावा लागतो. अवघ्या पन्नास मीटर रस्त्याचे काम बांधकाम विभागाने न केल्यामुळे हा घोळ झाला आहे. कामोठेवासीयांच्या या रोजच्या समस्येसाठी सरकारचे लक्ष वेधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाने ३ जुलै रोजी रास्ता रोकोचा इशारा दिला आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिसांनी पुढाकार घेऊन शेकापच्या शिष्टमंडळासोबत शनिवारी सकाळी कामोठे पोलीस ठाण्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांची बैठक बोलावली होती. बैठकीत बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी रस्त्याचे काम सध्या मंत्रालयातील सनदी अधिकाऱ्यांच्या मंजुरीसाठी थांबले असून, ही मंजुरी आल्यानंतर सर्वेक्षणाचे काम सुरू होईल, त्यानंतर निविदा पक्रिया पार पडण्यासाठी एका महिन्याचा कालावधी लागेल, त्यानंतर पुढील काम सुरू होईल, असे आश्वासन बांधकाम विभागाचे उपअभियंता अलगुट यांनी दिले. त्यामुळे पुढील तीन महिन्यांत कामोठेतील सर्व्हिस रोडचे रखडलेले काम मार्गी लागण्याची चिन्हे आहेत.५० मीटरचे काम अपूर्णसाडेबाराशे कोटी रूपयांचा मार्ग बांधा वापरा व हस्तांतरण करा या तत्त्वांवर बांधला. मात्र, यामधील अवघ्या पन्नास मीटरच्या मार्गाचे काम पूर्ण न केल्यामुळे कामोठेवासीयांना कळंबोलीतील उड्डाणपुलाखालून वळसा घेऊन मुंबईचा महामार्ग गाठावा लागतो.