शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गुन्हे सिद्ध होण्याचे प्रमाण घटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 23:31 IST

बलात्काराच्या ४८ गुन्ह्यांमधील आरोप सिद्ध झाले नाहीत

- सूर्यकांत वाघमारे नवी मुंबई : पोलीस आयुक्तालय क्षेत्रात घडलेल्या १५३ बलात्कारांच्या गुन्ह्यापैकी ४८ गुन्हे लग्नाच्या आमिषाने झाले आहेत. या ४८ गुन्ह्यांचा न्यायालयात टिकाव लागला नसल्याने एकून गुन्ह्याच्या दोषसिद्धीचा टक्का घसरला आहे. यामुळे आपसातील वादातून दाखल होणाऱ्या बलात्काराच्या खोट्या तक्रारींचा परिणाम पोलिसांच्या तपासावर होत असल्याचे दिसून येत आहे.नवी मुंबई पोलीस आयुक्तालय क्षेत्रात गतवर्षात १५३ बलात्काराच्या गुन्ह्यांची नोंद झाली आहे. त्यापैकी १५१ गुन्ह्यांची उकल पोलिसांकडून झालेली आहे. त्यापैकी ३ गुन्हे नोकरीच्या आमिषाने, २२ गुन्हे शेजारच्या व्यक्तींकडून, १५ नातेवाइकांकडून तर ७ मित्रांकडून व ४८ गुन्हे लग्नाच्या आमिषाने घडले आहेत. तर ३ गुन्हे अनोळखी व्यक्तींकडून झालेले आहेत. २०१७ मध्ये एकूण १३१ गुन्हे घडले होते. त्यापैकी १२८ गुन्ह्यांची उकल झालेली आहे.विनयभंगाच्या तक्रारीत देखील २०१७ च्या तुलनेत २०१८ मध्ये ३० गुन्हे अधिक आहेत. पोलिसांकडील या नोंदीनुसार २०१७ च्या तुलनेत गतवर्षी बलात्काराच्या तक्रारी २२ ने वाढल्या आहेत. त्यामध्ये लग्नाचे आमिष दाखवून बलात्कार केल्याच्या तक्रारीवरून दाखल झालेले गुन्हे न्यायालयात टिकू शकलेले नसल्याचे पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी सांगितले. यामुळे गुन्ह्याचा तपास करूनदेखील दोषसिद्धी न होऊ शकल्याचा परिणाम पोलिसांच्या तपासकामावर होत असल्याचे दिसून येत आहे. नवी मुंबईत आजवर घडलेल्या घटनांवरून काही राजकीय तसेच सामाजिक क्षेत्रात सक्रिय असणाºया व्यक्तींवर देखील अशा स्वरूपाचे गुन्हे दाखल झालेले आहेत. मात्र अशा प्रकारच्या गुन्ह्यांमध्ये संबंधिताचीही बदनामी होत असून त्याचे दुरगामी परिणाम उमटतात.एखाद्या महिला व पुरुष यांच्यात संमतीने शरीरसंबंध झाल्यानंतर कालांतराने त्यांच्यात वाद होताच महिलेकडून पुरुषाविरोधात बलात्काराची तक्रार केली जाते. मात्र, न्यायालयाच्या मते कधीकाळी संमतीने झालेले संबंध बलात्कार असू शकत नाहीत; परंतु मुलगी अल्पवयीन असल्यास तिला लग्नाचे आमिष दाखवून शरीरसंबंध केल्यास तो मानला जातो. अशा गुन्ह्यातही दोषसिद्धीचे नवी मुंबई पोलिसांचे प्रमाण २४ टक्के आहे. त्यात वाढ करण्याच्या अनुषंगाने येत्या काळात तपासयंत्रणेवर भर दिला जाईल, असा विश्वास पोलीस आयुक्त संजय कुमार यांनी व्यक्त केला आहे. अनेकदा तपास अधिकाºयाकडून योग्यरीत्या दोषारोपपत्र तयार न करणे, साक्षीदाराने साक्ष बदलणे, अशा प्रकारातून देखील संबंधित गुन्ह्यातील संशयित आरोपी सुटू शकतो.प्रेमसंबंधातून महिला पुरुषामध्ये अनेकदा अनैतिक शरीरसंबंध घडतात. त्याकरिता पुरुषाकडून सदर महिला अथवा मुलीला लग्नाचे देखील आमिष दाखवले जाते. पुरुषाला अद्दल घडवण्याच्या उद्देशाने काही वेळा बलात्काराची तक्रार दिली जाते. तर काही प्रकरणात केवळ सूडबुद्धीच्या भावनेतून तरुणावर बलात्काराचे आरोप झाल्याचेही प्रकार घडतात.पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात गतवर्षी लग्नाचे आमिष दाखवून बलात्काराचे ४८ गुन्हे घडले आहेत. मात्र, न्यायालयाच्या मते लग्नाचे आमिष दाखवून झालेले शरीरसंबंध हा बलात्काराचा गुन्हा होत नाही. त्यामुळे अशा प्रकारचे गुन्हे न्यायालयात टिकत नसल्याने त्याचा परिणाम बलात्कारांच्या एकूण गुन्ह्यांच्या दोषसिद्धीच्या आकडेवारीवर होत आहे.- संजय कुमार, पोलीस आयुक्त

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईPoliceपोलिस