शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छ भारत अभियानावरील खर्च व्यर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 15, 2018 23:33 IST

कचऱ्याचे ढिगारे कायम : नवी मुंबईसह पनवेलमधील खतनिर्मितीचे प्रयोग फसले : लोकसहभाग नाहीच

- नामदेव मोरे 

नवी मुंबई : स्वच्छ भारत अभियानामध्ये सलग दोन वर्षे नवी मुंबईने राष्ट्रीय पुरस्कार मिळविले. अभियान राबविण्यासाठी प्रत्येक वर्षी करोडो रुपये खर्च केले आहेत, परंतु प्रत्यक्षात स्वच्छता मोहिमांवरील खर्च व्यर्थ जात असल्याचे निदर्शनास येऊ लागले आहे. शहरात कचºयाचे ढिगारे साचले आहेत. कंपोस्ट पीटचा प्रयोग फसला आहे. लोकसहभाग फक्त नावापुरताच असून नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करण्यातही सहकार्य करत नाही. नवी मुंबईपेक्षा पनवेलमधील स्थिती अत्यंत बिकट आहे.

सानपाडा रेल्वे स्टेशनच्या बाहेर स्वच्छता अभियानाविषयी जनजागृती करण्यासाठी गतवर्षी भिंत रंगवण्यात आली होती. अभियान संपताच जवळील हॉटेलचालकाने त्या फलकाच्या बाजूलाच कचरा टाकण्यास सुरवात केली आहे. कचऱ्याचे ढिगारे उचलण्याकडे पालिका प्रशासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. हॉटेलचालकानेही हा परिसर स्वच्छ ठेवण्यासाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. घनकचरा व्यवस्थापनामध्ये महापालिकेला देशात प्रथम क्रमांक मिळाला आहे. परंतु सद्यस्थितीमध्ये शहरातील कचरा वेळेवर उचलला जात नाही. तुर्भे गाव, सानपाडा, घणसोली परिसरामध्ये कचºयाचे ढिगारे पहावयास मिळत आहेत. अभियानाअंतर्गत पालिकेच्या शाळा व उद्यानामध्ये कंपोस्ट पीट तयार करण्यात आले होते. त्या कंपोस्ट पीटचा वापर केला जात नाही. अनेक ठिकाणी फक्त नावापुरते खतनिर्मिती प्रकल्प उभारण्यात आले आहेत. गृहनिर्माण सोसायटीमधील नागरिक ओला व सुका कचरा वेगळा करत नाहीत. एकाच डब्यामध्ये ओला व सुका दोन्ही प्रकारचा कचरा टाकला जात आहे. स्वच्छ भारत अभियानाअंतर्गत शहरामध्ये मोठ्या प्रमाणात नवीन प्रसाधनगृहे उभारण्यात आली आहेत, परंतु देखभाल करण्याची यंत्रणाच निर्माण करण्यात आली नाही.

नवी मुंबईपेक्षा पनवेल परिसरामध्ये स्थिती बिकट आहे. स्वच्छ भारत अभियानासाठी तयार केलेल्या कंपोस्ट पीटचे कचरा कुंडीत रूपांतर झाले आहे. प्रसाधनगृहांचीही दुरवस्था झाली आहे. शहरात कचºयाचे ढिगारे वेळेवर उचलण्यात येत नाहीत. उघड्या वाहनांमधून कचºयाची वाहतूक केली जात आहे. स्वच्छ भारत अभियानावर केलेला सर्व खर्च व्यर्थ झाला आहे. पनवेलमध्ये ओला व सुका कचरा वेगळा केलाच जात नाही. दोन्ही महानगरपालिका स्मार्ट सिटीच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचा दावा करत आहेत. परंतु प्रत्यक्षात फक्त स्वच्छता अभियानाची पाहणी करण्यासाठी केंद्रीय टीम येणार असली की स्वच्छतेवर लक्ष दिले जाते. स्पर्धा संपली की पुन्हा दुर्लक्ष केले जात असल्याचे चित्र निर्माण झाले आहे.

पालिकेची मेहनत व्यर्थनवी मुंबई महानगरपालिका आयुक्त डॉ. रामास्वामी एन., घनकचरा व्यवस्थापनाचे उपआयुक्त तुषार पवार व पालिकेचे सर्व अधिकारी स्वच्छ भारत अभियान प्रभावीपणे राबविण्यासाठी प्रयत्न करत आहेत. लोकसहभाग वाढविण्यासाठी विद्यार्थ्यांच्या रॅली आयोजित केल्या जात आहेत. परंतु प्रत्यक्षात नागरिक या चळवळीमध्ये सहभागीच होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे जिथे स्वच्छतेचा संदेश देणारे फलक लावले आहेत त्याच ठिकाणी कचरा टाकला जात आहे. नागरिकांनीही उत्स्फूर्तपणे या मोहिमेमध्ये सहभागी होण्याची आवश्यकता असून यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे मत काही अधिकारी व कर्मचाºयांनी व्यक्त केले आहे.नवी मुंबईमधील स्वच्छतेची स्थितीकचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीतस्वच्छतेचा संदेश लिहिलेल्या ठिकाणीच कचरा टाकला जात आहेउद्यान व शाळेतील कंपोस्ट पीटची दुरवस्था झाली आहेओला व सुका कचरा वेगळा करण्याकडे दुर्लक्षअनेक ठिकाणी स्वच्छतागृह बंद अवस्थेमध्ये आहेतस्वच्छतागृहांची देखभाल करण्यासाठी यंत्रणाच नाहीपनवेलमधील सद्यस्थिती पुढीलप्रमाणेकचरा वाहतूक उघड्या वाहनांमधून केली जात आहेकचºयाचे ढिगारे वेळेवर उचलले जात नाहीतसार्वजनिक प्रसाधनगृहांची नियमित साफसफाई केली जात नाहीकचरा वर्गीकरण केले जात नाहीकंपोस्ट पीटचे कचरा कुुंडीत रूपांतर झाले आहे

टॅग्स :Swachh Bharat Abhiyanस्वच्छ भारत अभियानMONEYपैसाNavi Mumbaiनवी मुंबईpanvelपनवेल