शहरं
Join us  
Trending Stories
1
जिथे शिवसेनेचं मतदान आहे, तिथे...; निवडणूक आयोग भाजपाची चाकरी करत असल्याचा उद्धव ठाकरेंचा आरोप
2
निवडणूक आयोगाच्या नियोजनावर भाजपाही संतापली; "मतदारांचे हाल दुर्दैवी, यातून..."
3
लोकसभेची उमेदवारी घेऊन वायकरांनी आपली अटक टाळली; गजानन कीर्तीकरांचा खळबळजनक दावा
4
"जे लोक मतदान करणार नाहीत त्यांना..."; अभिनेते परेश रावल यांनी मांडली रोखठोक भूमिका
5
अमेरिका, कॅनडा, अरब देशातून AAP ला अवैध फंडिग; ED नं गृह मंत्रालयाला सोपवला रिपोर्ट
6
पुरती दमछाक झाली, वडिलांची उणीव मात्र भासली; अमोल कीर्तिकर यांनी व्यक्त केली भावना
7
Maharashtra Mumbai Kalyan Lok Sabha Election 2024 Live Updates: एटीएममधून मतदारांना मतदानासाठी पैसे वाटण्यात आले, जितेंद्र आव्हाड यांचा गंभीर आरोप
8
बुलढाणा: आग लागल्याने घरातील साहित्य जळून खाक, संपूर्ण कुटुंब बेघर
9
"मुंबईकर मतदानाला उतरलाय, पण काही ठिकाणी मुद्दाम उशीर केला जातोय"; आदित्य ठाकरेंचा आरोप
10
बॉलिवूडच्या बादशाहाने केलं मतदान, पत्नी आणि मुलांसह केंद्रावर पोहोचला अन्...
11
सामूहिक बलात्कारानंतर अल्पवयीन मुलीला जिवंत वीट भट्टीत जाळले; नराधमांना फाशीची शिक्षा
12
Chhattisgarh Accident: छत्तीसगडमध्ये मृत्यूचे तांडव; मजुरांच्या वाहनाचा भीषण अपघात; १७ जण दगावले
13
"आशिष शेलार यांनी लोकसभा निवडणुकीतून काढला पळ’’, मुंबईतील मतदानादरम्यान ठाकरे गटाचा टोला 
14
'शिंदेंसोबत जायला मी विरोध केला होता'; गजानन किर्तीकरांच्या पत्नीने मांडली रोखठोक भूमिका
15
...अन् अचानक तरुण झाला कोट्यधीश; खात्यात आले 9900 कोटी, बँक मॅनेजरही हैराण
16
"ही अत्यंत खेदाची गोष्ट आहे...", अभिनेत्री वैशाली भोसलेला मतदान करता न आल्यामुळे व्यक्त केला संताप
17
अहमदाबाद विमानतळावर मोठी कारवाई, इस्लामिक स्टेटचे ४ दहशतवादी पकडले, श्रीलंकेचे कनेक्शन उघड
18
Maharashtra HSC 12th Result 2024 राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी: उद्या १२ वीचा निकाल जाहीर होणार
19
Multibagger Stock: ४ वर्षांत ₹१ लाखांचे झाले ४० लाख, दीड रुपयांच्या शेअरमध्ये गुंतवणूक करणारे मालामाल
20
सोनं पुन्हा महागणार, ७५,००० रुपयांच्या पुढे जाणार; इराणमधून आली मोठी बातमी

नागरी कामांवरील खर्च जाणार पाण्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2019 2:10 AM

प्रशासनाची डोळेझाक : अर्धवट स्थितीतील कामांमुळे उडणार बोजवारा

नवी मुंबई : मागील काही महिन्यांत प्रशासनाकडून हाती घेण्यात आलेली बहुतांश कामे अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेली आहेत. त्यात रेलिंग बसवण्याच्या कामांसह पदपथांच्या कामांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. ही कामे अर्धवट स्थितीतच सोडून देण्यात आलेली असल्याने, त्यावर झालेला खर्च यंदाच्या पावसाळ्यात पाण्यात जाण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पालिकेच्या वतीने मागील काही महिन्यांत प्रत्येक नोडमध्ये मोठ्या प्रमाणात विकासकामे करण्यात आली आहेत. त्यामध्ये पदपथ दुरुस्तीसह रस्त्यालगत रेलिंग बसवण्याच्या कामांचा सर्वाधिक समावेश आहे. या कामांवर प्रभागनिहाय लाखो रुपयांचा निधी खर्च करण्यात आलेला आहे. मात्र, त्यापैकी बहुतांश कामांच्या दर्जाबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, केवळ ठेकेदारांच्या घशात निधी घालण्यासाठी कामे काढली का? अशीही शंका निर्माण झाली आहे. अनेक ठिकाणी रेलिंग बसवल्यानंतर त्याखालील जागेत सिमेंटचा भरणा करून पाया भक्कम करण्यात आलेला नाही. त्याऐवजी मातीचा भराव टाकून थुकपट्टी लावण्याची कामे झाली आहेत. यामुळे बहुतांश ठिकाणचे रेलिंग एका बाजूला झुकले असून ते दोन ते तीन महिन्यांतच कोसळण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. त्यापैकी काही ठिकाणी महावितरणने खोदकाम करून तिथल्या समस्येत अधिकच भर टाकली आहे. घणसोली सेक्टर १५ येथे गॅसच्या पाइपसाठी रस्त्याचे खोदकाम करण्यात आले आहे. मात्र, काम पूर्ण झाल्यानंतर खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करणे आवश्यक असतानाही ते करण्यात आलेले नाही. केवळ खडी व मातीचा भराव टाकून बुजवण्यात आले आहे. यामुळे रस्त्यावर खोलगट भाग तयार झाला असून पावसाळ्यात त्या ठिकाणी पाणी साचल्यास खडी वाहून जाऊ शकते; परंतु या संदर्भात संबंधितांकडे तक्रार करूनही खोदकामाच्या ठिकाणी रस्त्याचे डांबरीकरण करण्यास टाळाटाळ होताना दिसत आहे. मात्र, अशा प्रकारच्या अर्धवट स्थितीत सोडण्यात आलेल्या कामांमुळे त्यावर खर्च करण्यात आलेला लाखोंचा निधी पावसाच्या पाण्यात जाण्याची परिस्थिती आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई