शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

कासाडी नदीचे अस्तित्व धोक्यात, नदीमध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2018 06:56 IST

तळोजामधील कासाडी नदीमध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. कासाडी संवर्धनासाठी ठोस उपाययोजनाच केल्या जात नसून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे.

- शैलेश चव्हाण, वैभव गायकरपनवेल  -  तळोजामधील कासाडी नदीमध्ये पुन्हा रसायनमिश्रित पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्यांना प्रशासनाकडून अभय मिळू लागले आहे. कासाडी संवर्धनासाठी ठोस उपाययोजनाच केल्या जात नसून नदीचे अस्तित्व नष्ट करण्याचे षड्यंत्र सुरू झाले आहे.विधानसभेच्या प्रत्येक अधिवेशनामध्ये कासाडी नदीमधील प्रदूषणाचा विषय गाजत आहे. प्रदूषण करणाºया किती कारखान्यांवर कारवाई केली याचा तपशील प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून दिला जातो. परंतु प्रत्यक्षात नदीपात्रातील प्रदूषण थांबविण्यासाठी अद्याप ठोस उपाययोजना झालेल्या नाहीत. काही दिवसांपासून नदीमध्ये कारखान्यांमधील दूषित पाणी सोडण्यास सुरवात झाली आहे. मंगळवारी नदीच्या पात्रातील पाण्याचा रंग काळा झाला होता. कारखान्यांमधील पाण्यावर प्रक्रिया न करताच ते नदीमध्ये सोडले आहे. वास्तविक रासायनिक कारखान्यांमधील पाण्यावर एमआयडीसीतील जलप्रक्रिया केंद्रामध्ये प्रक्रिया करणे आवश्यक आहे. प्रक्रिया केलेले पाणी नदीमध्ये सोडताना त्याचे परीक्षण करणे आवश्यक आहे. पण अनेक वेळा कारखान्यांमधील पाणी थेट नदीपात्रात सोडले जात आहे. नदीचे पात्र काळे झाले असल्यामुळे परिसरातील नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे. एकेकाळी या परिसरातील जीवनदायी असलेल्या कासाडीचे नाल्यात रूपांतर होवू लागले आहे. मासेमारी करणाºया कोळी बांधवांवर उपासमारीची वेळ आली आहे. नदीमधील प्रदूषण थांबविण्याकडे प्रदूषण नियंत्रण मंडळ, महापालिका व एमआयडीसी सर्वच दुर्लक्ष करत आहेत.कासाडी नदीमधील प्रदूषण ही एकमेव समस्या आता राहिलेली नाही. नदीचे अस्तित्वच संपविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. आतापर्यंत शासकीय यंत्रणांनी नदीपात्राचे क्षेत्र निश्चित केलेले नाहीत. डोंगररांगांपासून ते खाडीपर्यंत नदीचे पात्र अरूंद होवू लागले आहे. दिवसेंदिवस दोन्ही बाजूने पात्रामध्ये अतिक्रमण सुरू झाले आहे. वालदेश्वर मंदिराच्या शेजारी भराव टाकण्यास सुरवात झाली आहे.डेब्रिज टाकून पात्र अरूंद केले जात नाही. भविष्यात अशीच स्थिती राहिली तर कासाडी नदीला पावसाळी पाणी वाहून नेणारा नाला असे स्वरूप येवू शकते.मुंबईमध्ये मिठी नदीच्या पात्रामध्ये झालेल्या अतिक्रमणामुळे २६ जुलै २००५ च्या अतिवृष्टीमध्ये मुंबई पाण्यामध्ये गेली होती. शेकडो नागरिकांना जीव गमवावा लागला होता. कोट्यवधी रूपयांचे नुकसान झाले होते.भविष्यात कासाडीचे योग्य संवर्धन केले नाही तर अतिवृष्टीमध्ये पनवेल, कळंबोली परिसर पुन्हा पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे. महापालिका, एमआयडीसी, प्रदूषण नियंत्रण मंडळाने योग्य दखल घ्यावी, अशी मागणी नागरिक करू लागले आहेत.१५ वर्षांपासून लढाकासाडी नदीमध्ये होणारे प्रदूषण थांबविण्यासाठी योगेश पगडे व इतर नागरिक १५ वर्षांपासून लढा देत आहेत. कारखान्यांमधील प्रदूषणाविरोधात वारंवार आवाज उठविला आहे. आंदोलने केली आहेत. प्रदूषण नियंत्रण मंडळासह राज्य शासनाकडे तक्रारी केल्या आहेत. परंतु अद्याप शासनाने याची दखल घेतलेली नाही.जनचळवळ हवीकासाडी व गाढी नदीचे अस्तित्व टिकले तरच भविष्यात पनवेलकर पुराच्या धोक्यापासून वाचू शकतात. नदीमधील अतिक्रमण व प्रदूषण थांबविण्यासाठी जनचळवळ उभारण्याची गरज आहे. पनवेलकरांनी आताच नदी वाचविण्याची चळवळ सुरू केली नाही तर भविष्यात शहर पाण्याखाली जाण्याची भीती जाणकार व्यक्त करत आहेत.कासाडी नदीमध्ये दूषित पाणी सोडले जात असेल तर त्याची दखल घेवून दोषींवर कारवाई केली जाईल.- तानाजी यादव,उप प्रादेशिक अधिकारी,प्रदूषण नियंत्रण मंडळकिनाºयाचे सुशोभीकरण करावेकासाडी नदी शिरवली, वंगणीची वाडीकडून खाडीकडे वाहते. पूर्वी या नदीच्या पाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात मासेमारी केली जात होती. एमआयडीसी सुरू होण्यापूर्वी पिण्यासाठीही या पाण्याचा वापर केला जात होता. परंतु कारखान्यांमधील दूषित पाणी नाल्यात सोडण्यास सुरवात झाल्यापासून मासेमारी जवळपास ठप्प होवू लागली आहे. नदीचे अस्तित्व टिकविण्यासाठी नदी पात्राचे क्षेत्र निश्चित करून त्याचे सुशोभीकरण केले पाहिजे. परंतु सद्यस्थितीमध्ये याकडे पूर्णपणे दुर्लक्ष केले जात आहे.पालिकेचेही दुर्लक्षकासाडी नदीच्या सुशोभीकरणासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पामध्ये तरतूद केली आहे. परंतु सुशोभीकरणाची तरतूद फक्त नावापुरतीच असून त्यामधून प्रत्यक्षात काहीही कामे होणार नाहीत. पालिकेची स्थापना झाल्यानंतर नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी कासाडी नदीच्या सुशोभीकरणासाठी ठोस तरतूद करण्याची मागणी केली होती. पण त्यांच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईriverनदीpollutionप्रदूषण