शहरं
Join us  
Trending Stories
1
आधीच प्लॅन ठरला होता, आंतरवालीतील दगडफेकीमागे पवारांचे आमदार; छगन भुजबळांचा मोठा गौप्यस्फोट
2
“राहुल गांधी हे सीरियल लायर, हायड्रोजनचं सोडा, लवंगी फटाकाही फोडू शकले नाहीत”: CM फडणवीस
3
Asia Cup 2025 : 'जानी दुश्मन' असलेल्या बांगलादेशच्या मदतीला धावला श्रीलंका; अफगाणिस्तानचा खेळ खल्लास!
4
Hindenberg प्रकरणात ‘सेबी’ची Adani समूहाला क्लीन चिट; गौतम अदानी म्हणाले, “सत्यमेव जयते...”
5
“देशातील Gen Z, विद्यार्थी, युवक संविधान-लोकशाही वाचवतील, मी सदैव पाठीशी राहीन”: राहुल गांधी
6
७५ वर्षांचे झाले, PM मोदींनी निवृत्ती घ्यावी का? शरद पवार म्हणाले, “त्यांनी थांबावे हे...”
7
"युक्रेन युद्ध थांबवणे सर्वात सोपे वाटत होते, पण पुतिन..."; ट्रम्प यांची रशियन राष्ट्राध्यक्षांवर थेट टीका, स्पष्टच बोलले
8
Best Catch In T20I : परेरानं घेतलेला झेल भारीच! पण सूर्या दादाला तोड नाय! कारण....(VIDEO)
9
जबरदस्त...! तब्बल 18.60 लाख रुपयांनी स्वस्त झाली अ‍ॅक्टर्स अन् नेत्यांच्या आवडीची ही ढासू SUV; आता किती रुपयांना मिळणार? जाणून घ्या
10
Mohammad Nabi Fastest Fifty : एका षटकात ५ षटकार! युवीचा विक्रम आला होता धोक्यात, पण...
11
पालघर-डहाणूत ठाकरे गटाला खिंडार; सरपंच-उपसरपंच-पदाधिकारी शिवसेनेत, एकनाथ शिंदे म्हणाले...
12
Nuwan Thushara Unplayable Delivery : 'बेबी मलिंगा'ची कमाल! लेगला चेंडू टाकत उडवली ऑफ स्टंप (VIDEO)
13
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
14
स्कॉर्पिओ, सेल्टोस अन् हॅरियरचीही ‘बोलती बंद’; लोकांनी या ढासू SUV वर लाखो रुपये केले खर्च! 
15
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
16
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
17
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
18
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
19
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
20
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?

पर्यावरणप्रेमींना निवडणूक जाहीरनाम्यात हवी निसर्ग संवर्धनाची हमी; राजकीय पक्षांना खुले पत्र

By नारायण जाधव | Updated: March 9, 2024 18:38 IST

पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवूनच मतदान, नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही मोहीम सुरू केली आहे.

नारायण जाधव, लोकमत न्यूज नेटवर्क, नवी मुंबई: पर्यावरण रक्षणासाठी राजकारण्यांना जबाबदार धरण्यासाठी पर्यावरणप्रेमींनी निसर्ग आणि पर्यावरण संवर्धनासाठी तुम्ही काय करणार, याचा आपल्या निवडणूक जाहीरनाम्यात समावेश करावा, ‘पर्यावरणाचा मुद्दा डोळ्यासमोर ठेवून मी मतदान करेन’, अशी मोहीम देशपातळीवर सुरू केली आहे. यासाठी सर्व राजकीय पक्षांना लिहिलेल्या खुल्या पत्रात, या कार्यकर्त्यांनी म्हटले आहे की पर्यावरण संरक्षण, संवर्धन आणि टिकाव सुनिश्चित करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीसाठी जाहीर केल्या जाणाऱ्या पक्षीय जाहीरनाम्यात तुम्ही काय कार्यवाही कराल, याबाबत हमी देणारे आश्वासनांचा समावेश करावा, अशी मागणी केली आहे.

नॅटकनेक्ट फाउंडेशनचे संचालक बी. एन. कुमार यांनी ही मोहीम सुरू केली आहे. सर्व विचारधारांचे राजकारणी, मग ते सत्ताधारी असोत किंवा विरोधी पक्षात, पर्यावरणाच्या काळजीसाठी त्यांनी सरसावले पाहिजे, असे त्यांनी सांगितले. ‘आम्ही आमच्या प्राथमिक शाळांमध्ये निसर्गाच्या संरक्षणाची गरज शिकलो आहोत. परंतु व्यवहारात आपल्यापैकी बहुतेकजण याबाबत अपयशी ठरत आहेत. आमचा अनुभव असा आहे की, राजकारणी पर्यावरणाचा ऱ्हास करून विकासकामे करतात. चारधाम महामार्ग आणि मुंबई महानगर प्रदेशात बेपर्वा विकासासाठी खारफुटी, पाणथळ जागांचा नाश केला जात आहे.’ ‘वारंवार पूर आणि भूस्खलन होऊनही आपण धडा शिकत नाही,’ असे ते म्हणाले. तर निसर्ग आणि पर्यावरणाच्या ऱ्हासामुळे त्यांच्या स्वतःच्या जीवनावर आणि आरोग्यावरही परिणाम होईल या वस्तुस्थितीपासून राजकीय नेते पळून जाऊ शकत नाहीत, असे सागरशक्तीचे प्रमुख नंदकुमार पवार यांनी सांगितले.

वॉचडॉग फाउंडेशनच्या गॉडफ्रे पिमेंटा यांनी सांगितले की, भारतामध्ये राष्ट्रीय स्तरावरील पर्यावरणविषयक चिंता कोणत्याही पक्षास नाही. समृद्ध जैवविविधतेने नटलेल्या महाराष्ट्राला तर तातडीने संरक्षणाची गरज आहे. प्रदूषणामुळे महासागर आणि खाड्या धोक्यात आल्या असून, राज्यातील २८ नद्या शहरी प्रदूषणामुळे नष्ट होण्याच्या उंबरठ्यावर असल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. नेरूळच्या कार्यकर्त्या रेखा सांखला म्हणाल्या की, महाराष्ट्र सरकारच्या राजपत्राच्या पाठिंब्याने सिडको आणि मनपाकडून होणाऱ्या विकास योजनांमुळे होणारा पर्यावरणाच्या नाश नवी मुंबईपेक्षा अधिक कुठेही हे दिसत नाही. तर खारघर वेटलँड आणि हिल्सच्या ज्योती नाडकर्णी यांनी सांगितले की, ‘निसर्गाचा नाश करून होणारा सर्रास विकास शाश्वत नसून त्याचे दुष्परिणाम आपण वेळोवेळी पाहिले आहेत.’

इंदौरस्थित अलायन्स फॉर रिव्हर्स इन इंडिया (एएफआर)चे सहसंस्थापक संजय गुप्ता यांनी निदर्शनास आणले की, पर्यावरणाची काळजी ही औद्योगिकीकरणात अडथळे आणण्यासाठी नाही. पारसिक ग्रीन्स फोरमचे संयोजक विष्णू जोशी यांनी पर्यावरणाची पर्वा न करता, बांधकाम व्यावसायिकांना अनुकूल असे डोंगरउतार आणि तळ कापण्याच्या वाढत्या प्रवृत्तीबद्दल चिंता व्यक्त केली.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईenvironmentपर्यावरण