शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

फेरीवाल्यांचे पदपथावर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:54 IST

विभाग कार्यालयाचे अभय? : दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा

नवी मुंबई : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर बस्तान ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यात पदपथांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागत आहे. वाशी व कोपरखैरणे विभागात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत, त्यानुसार फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी दिवसभर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर फेरीवाले दिसत नाहीत. मात्र, सायंकाळनंतर फेरीवाल्यांना पदपथ मोकळे करून दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ७ वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी विभागातील पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रात्री १०.३० वाजेपर्यंत पदपथांवर या फेरीवाल्यांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे पदचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.वाशी सेक्टर ९ परिसरात हा प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच नेरुळ आणि सानपाडा परिसरात फेरीवाल्यांकडून सायंकाळच्या वेळी होणारेअतिक्रमण रहिवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाकविभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या आशीर्वादाने सायंकाळनंतर पदपथांवर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांचा ताप स्वच्छता कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. हे फेरीवाले परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी करतात. घनकचरा तेथेच टाकून निघून जातात. सडलेला भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक व इतर घनकचºयाचे ढीग साचत असल्याने सकाळी दैनंदिन साफसफाई करणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका