शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

फेरीवाल्यांचे पदपथावर पुन्हा अतिक्रमण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 8, 2019 00:54 IST

विभाग कार्यालयाचे अभय? : दैनंदिन साफसफाईच्या कामात अडथळा

नवी मुंबई : फेरीवाल्यांनी पुन्हा पदपथावर बस्तान ठोकले आहे. विशेष म्हणजे, ऐन पावसाळ्यात पदपथांवर अतिक्रमण झाल्याने नागरिकांना रस्त्यावर साचलेल्या पाण्यातून जा-ये करावी लागत आहे. वाशी व कोपरखैरणे विभागात हा प्रकार सर्रास पाहावयास मिळत असल्याने नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी शहरातील बेकायदा बांधकामे आणि अतिक्रमणांवर धडक कारवाई करण्याचे निर्देश संबंधित विभाग कार्यालयांना दिले आहेत, त्यानुसार फेरीवाल्यांना अटकाव करण्यासाठी ठिकठिकाणी दिवसभर सुरक्षारक्षक तैनात करण्यात आले आहेत, त्यामुळे दिवसभर फेरीवाले दिसत नाहीत. मात्र, सायंकाळनंतर फेरीवाल्यांना पदपथ मोकळे करून दिले जात असल्याचे पाहावयास मिळते. याचा परिणाम म्हणून सायंकाळी ७ वाजल्यानंतर शहरातील बहुतांशी विभागातील पदपथांवर फेरीवाल्यांचे अतिक्रमण झाल्याचे दिसून येते. विशेष म्हणजे, रात्री १०.३० वाजेपर्यंत पदपथांवर या फेरीवाल्यांचा धुडगूस सुरू असतो. त्यामुळे पदचाऱ्यांची कसरत होत आहे. वाहतूककोंडीची समस्या निर्माण होत आहे.वाशी सेक्टर ९ परिसरात हा प्रकार सर्रास होत असल्याने नागरिकांनी या संदर्भात संताप व्यक्त केला आहे. वाशीप्रमाणेच कोपरखैरणे, घणसोली, ऐरोली तसेच नेरुळ आणि सानपाडा परिसरात फेरीवाल्यांकडून सायंकाळच्या वेळी होणारेअतिक्रमण रहिवाशांसाठी डोकेदुखीचे ठरले आहे.स्वच्छता कर्मचाऱ्यांची दमछाकविभाग कार्यालयातील काही अधिकारी व कर्मचाºयांच्या आशीर्वादाने सायंकाळनंतर पदपथांवर अतिक्रमण करणाºया फेरीवाल्यांचा ताप स्वच्छता कर्मचाºयांना सहन करावा लागत आहे. हे फेरीवाले परिसरात मोठ्या प्रमाणात दुर्गंधी करतात. घनकचरा तेथेच टाकून निघून जातात. सडलेला भाजीपाला, फळे, खाद्यपदार्थ, प्लॅस्टिक व इतर घनकचºयाचे ढीग साचत असल्याने सकाळी दैनंदिन साफसफाई करणाºया कर्मचाºयांची दमछाक होत आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिका