शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी जिल्हा विकासावर भर

By नारायण जाधव | Updated: April 24, 2023 16:14 IST

यासाठी विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्याला सक्षम करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : जगाच्या आर्थिक नकाशावर भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी देशाच्या सकल उत्पन्नात १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राने कंबर कसली असून त्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा सक्षम करण्यावर नियोजन विभागाने भर दिला आहे. याअंतर्गत सन २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचा चंग विभागाने बांधला आहे. यासाठी विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्याला सक्षम करण्यात येणार आहे.

त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आराखड्यात येत्या काळात सहा प्रमुख मुद्यांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी उच्चस्तर, राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर तीन समित्याही गठित केल्या आहेत.

भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचे केंद्राने ठरविले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. त्यादृष्टीने या सहा कलमी योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन तर २०४६ पर्यंत ३.५ ट्रिलियन करण्याचा नियाेजन विभागाचा मानस आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्र १३.२ टक्के, सेवा क्षेत्र ६० टक्के आणि उद्योग क्षेत्राचा वाटा २६.८ टक्के आहे.

हे सर्व लक्षात घेऊन राज्याला परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर नेणे, देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा वाटा १५ टक्क्यांवरून २० टक्क्यापर्यंत नेणे, शाश्वत विकासात महाराष्ट्राला ९ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर नेण्याचे ध्येय नियोजन विभागाने ठेवले आहे. त्यासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर अशा तीन समित्या स्थापन करून सहा मुद्यांवर भर दिला आहे.

अशी आहे सहा कलमी योजना

१ -जिल्ह्याची सद्यस्थिती - जिल्ह्याची सद्यस्थिती विचारात घेण्यात येणार आहे. यात भौगोलिक स्थान, उत्पादन, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, आर्थिक वाढीचा दर, उद्योगांची संख्या, शिक्षण संस्था, आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, सेझ यांची संख्या विचारात घेतली जाणार आहे.

२- जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू - संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू लक्षात घेऊन संबंधित भागधारक, नागरिकांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यांची मते, सूचना ऐकून घ्याव्यात. गुंतवणुकीला, विकासाला चालना देतील, अशी तीन-चार क्षेत्रे विचारात घेऊन त्यांचा विकास आराखड्यात समावेश करावा.

३- जिल्ह्याचे व्हिजन - जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्यादृष्टीने गुंतवणुकीला पोषक असे व्हिजन तयार करावे. यानुसार ठरविलेले लक्ष्य गाठण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे साध्य ठरवून भागधारकांना प्रेरित करावे.

४ -भागधारकांसोबत सल्लामसलत - जिल्ह्यातील उद्योजक, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विचारविनिमय, सल्लामसलत करून आराखडा तयार करावा, त्यांना जिल्हास्तरीय समितीत समाविष्ट करून घ्यावे.

५-क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करणे - जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू, निर्माण होणाऱ्या संधी, त्यावरील उपाय, मार्केट यांचे विश्लेषण करून तीन-चार क्षेत्रांवर भर द्यावा.

६ - जिल्हा कृती आराखडा - क्षेत्र व उपक्षेत्रांच्या स्वयंमूल्यांकनाच्या आधारे अन्य यंत्रणांचे बळकटीकरण करून जिल्हा कृती आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करणे, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून शासनास सादर करणे.