शहरं
Join us  
Trending Stories
1
UPSC Result 2025: यूपीएससी आयईएस आयएसएसचा निकाल जाहीर; सोलापूरचा मयुरेश वाघमारे देशात आठवा!
2
दिवाळीपूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुडन्यूज, महागाई भत्त्यात 3% वाढ; आता 'एवढा' पगार मिळणार
3
Chaitanyananda Saraswati : अय्याशीसाठी संस्थेत बांधली लग्झरी रुम... स्वयंघोषित बाबाचे काळे कारनामे, अश्लील चॅट्सने खळबळ
4
अर्थव्यवस्थेला ५ मोठे 'बूस्टर डोस'! रेपो दर जैसे थे, पण RBI च्या 'या' निर्णयाने मार्केटमध्ये येणार पैसा
5
इलेक्ट्रीक टु-व्हीलर विक्रीत मोठा उलटफेर! ओलाची जागा बजाज, बजाजची जागा ओलाने घेतली, टीव्हीएस, एथरने टिकवली...
6
"तुझी मैत्रिण किंवा ज्युनियर आहे का, दुबईतल्या शेखला..."; चैतन्यानंदचे हादरवणारे व्हॉट्सअॅप चॅट समोर
7
एका झटक्यात सोनं १२०० रुपयांपेक्षा अधिक वाढलं, चांदीतही जोरदार तेजी; खरेदीपूर्वी पाहा सोन्या-चांदीचे नवे दर
8
१७ वर्षांची तरुणी न सांगताच घराबाहेर पडली, आता २ महिन्यांनी जंगलात सापडला मृतदेह, कोकणात खळबळ 
9
गुरुवारी दसरा २०२५: राहु काळ कधी? पाहा, शुभ विजय मुहूर्त; महत्त्व, महात्म्य अन् काही मान्यता
10
EMI भरतोय म्हणून घरावर पतीचा अधिकार होत नाही; दिल्ली हायकोर्टाचा महत्त्वाचा निकाल, प्रकरण काय?
11
'जे घडले, ते घडायला नको होते'; मोहसिन नक्वींनी बीसीसीआयची माफी मागितली, पण ट्रॉफी परत देण्यास नकार
12
असे कसे झाले...! सप्टेंबरमध्ये वाहनांची विक्री वाढायला हवी होती, १३ टक्क्यांनी कमी झाली...; नेमके काय झाले...
13
नवरात्र घट विसर्जन २०२५: पुरणाचे दिवे आणि कलशाचे पाणी कसे वापरावे? देवीच्या कृपेसाठी खास विधी!
14
फिलिपाईन्स भूकंपात 69 जणांचा मृत्यू, शेकडो जखमी; पाहा धक्कादायक व्हिडिओ...
15
३० वर्षांनी शुभ दसरा २०२५: ७ राजयोगात १० राशींना भरपूर लाभ, भरघोस यश-पैसा; सुख-सुबत्ता काळ!
16
नांदेडचे शेतकरी कैलाश रामभाऊ यांनी KBC मध्ये जिंकले ५० लाख, एक कोटी रुपयांच्या प्रश्नावर सोडला खेळ
17
ICC Rankings : अभिषेकनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; T20I च्या इतिहासात पहिल्यांदाच असं घडलं
18
"ही भिवंडी आहे, मराठीत कशाला बोलायचं?"; अबु आझमींचे वादग्रस्त वक्तव्य, मनसे म्हणाली, "लाज वाटते तर..."
19
गंगाखेडेतमध्ये धनगर आरक्षण आंदोलनात खळबळ; ओबीसी नेते सुरेश बंडगर यांचा आत्मदहनाचा प्रयत्न
20
सर्व्हे! नितीश कुमार, तेजस्वी यादव की PK...कुणाला मुख्यमंत्री म्हणून मिळाली पहिली पसंती?

राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन डॉलर करण्यासाठी जिल्हा विकासावर भर

By नारायण जाधव | Updated: April 24, 2023 16:14 IST

यासाठी विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्याला सक्षम करण्यात येणार आहे.

नवी मुंबई : जगाच्या आर्थिक नकाशावर भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची करण्यासाठी देशाच्या सकल उत्पन्नात १५ टक्के वाटा असलेल्या महाराष्ट्राने कंबर कसली असून त्याकरिता राज्यातील प्रत्येक जिल्ह्याचा विकास आराखडा सक्षम करण्यावर नियोजन विभागाने भर दिला आहे. याअंतर्गत सन २०२७ पर्यंत राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलियन करण्याचा चंग विभागाने बांधला आहे. यासाठी विकासाचे प्रमुख केंद्र म्हणून प्रत्येक जिल्ह्याला सक्षम करण्यात येणार आहे.

त्यादृष्टीने जिल्ह्याचा विकास आराखड्यात येत्या काळात सहा प्रमुख मुद्यांवर भर देण्यात येणार आहे. यासाठी उच्चस्तर, राज्यस्तर आणि जिल्हास्तरावर तीन समित्याही गठित केल्या आहेत.

भारताची अर्थव्यवस्था २०२७ पर्यंत पाच ट्रिलियन डॉलरची करण्याचे केंद्राने ठरविले आहे. देशाच्या विकासात महाराष्ट्राचा सिंहाचा वाटा आहे. देशाच्या सकल उत्पन्नात महाराष्ट्राचा वाटा १५ टक्के आहे. त्यादृष्टीने या सहा कलमी योजनेमुळे राज्याची अर्थव्यवस्था २०३७ पर्यंत २.५ ट्रिलियन तर २०४६ पर्यंत ३.५ ट्रिलियन करण्याचा नियाेजन विभागाचा मानस आहे. राज्याच्या सकल उत्पन्नात २०२०-२१ मध्ये कृषी क्षेत्र १३.२ टक्के, सेवा क्षेत्र ६० टक्के आणि उद्योग क्षेत्राचा वाटा २६.८ टक्के आहे.

हे सर्व लक्षात घेऊन राज्याला परकीय गुंतवणुकीत पहिल्या क्रमांकावर नेणे, देशाच्या सकल उत्पन्नात राज्याचा वाटा १५ टक्क्यांवरून २० टक्क्यापर्यंत नेणे, शाश्वत विकासात महाराष्ट्राला ९ व्या क्रमांकावरून ५ व्या क्रमांकावर नेण्याचे ध्येय नियोजन विभागाने ठेवले आहे. त्यासाठी जिल्ह्याचा विकास आराखडा सक्षम करण्यासाठी मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तर, मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली राज्यस्तर आणि जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तर अशा तीन समित्या स्थापन करून सहा मुद्यांवर भर दिला आहे.

अशी आहे सहा कलमी योजना

१ -जिल्ह्याची सद्यस्थिती - जिल्ह्याची सद्यस्थिती विचारात घेण्यात येणार आहे. यात भौगोलिक स्थान, उत्पादन, लोकसंख्या, दरडोई उत्पन्न, आर्थिक वाढीचा दर, उद्योगांची संख्या, शिक्षण संस्था, आयटीआय, अभियांत्रिकी महाविद्यालये, सेझ यांची संख्या विचारात घेतली जाणार आहे.

२- जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू - संबंधित जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू लक्षात घेऊन संबंधित भागधारक, नागरिकांच्या कार्यशाळा आयोजित करून त्यांची मते, सूचना ऐकून घ्याव्यात. गुंतवणुकीला, विकासाला चालना देतील, अशी तीन-चार क्षेत्रे विचारात घेऊन त्यांचा विकास आराखड्यात समावेश करावा.

३- जिल्ह्याचे व्हिजन - जिल्हाधिकाऱ्यांनी आपल्या जिल्ह्यातील संभाव्य संधी ओळखून त्यादृष्टीने गुंतवणुकीला पोषक असे व्हिजन तयार करावे. यानुसार ठरविलेले लक्ष्य गाठण्यासाठी अल्प, मध्यम आणि दीर्घ मुदतीचे साध्य ठरवून भागधारकांना प्रेरित करावे.

४ -भागधारकांसोबत सल्लामसलत - जिल्ह्यातील उद्योजक, शिक्षण संस्था, संशोधन संस्था, विविध क्षेत्रातील तज्ज्ञ विचारविनिमय, सल्लामसलत करून आराखडा तयार करावा, त्यांना जिल्हास्तरीय समितीत समाविष्ट करून घ्यावे.

५-क्षेत्र व उपक्षेत्रांची निवड करणे - जिल्ह्याची मजबूत आणि कमकुवत बाजू, निर्माण होणाऱ्या संधी, त्यावरील उपाय, मार्केट यांचे विश्लेषण करून तीन-चार क्षेत्रांवर भर द्यावा.

६ - जिल्हा कृती आराखडा - क्षेत्र व उपक्षेत्रांच्या स्वयंमूल्यांकनाच्या आधारे अन्य यंत्रणांचे बळकटीकरण करून जिल्हा कृती आराखडा तयार करून त्यानुसार कार्यवाही करणे, त्यासाठी कालबद्ध कार्यक्रम ठरवून शासनास सादर करणे.