शहरं
Join us  
Trending Stories
1
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
2
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
3
"शरद पवारांना हिंदू धर्मालाच शरण यावं लागलं, स्वत:ची मुंज झाल्याचंही दाखवतील"; प्रकाश महाजन यांचा टोला
4
आईला डॉक्टरकडे नेण्यासाठी येणाऱ्या ड्रायव्हरच्या पडली प्रेमात, त्यानंतर घडलं भयानक... 
5
ट्रॉफी नसेल तर ६००-७०० धावा करुन उपयोग काय? रोहित शर्मानं विराटला टोमणा मारल्याची चर्चा, पण...
6
Eknath Shinde: काँग्रेसने पाकिस्तानला उत्तर देण्याची कधीच हिंमत दाखवली नाही, शिंदेंची टीका
7
Pakistani Citizens Deadline: पाकिस्तानी नागरिकांना भारत सोडण्यासाठी नवी डेडलाइन!
8
Waves Summit 2025: "सॉरी, माझी हार्टबीट खूप...", पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर बोलताना कार्तिक आर्यन झाला नर्व्हस
9
Waves 2025: सिनेसृष्टीतील या ५ दिग्गज सेलिब्रिटींच्या स्मरणार्थ टपाल तिकीटं, पंतप्रधान मोदींनी केलं अनावरण
10
IPL 2025: Mumbai Indians मध्ये आला नवा 'भिडू', कोण आहे Raghu Sharma? किती मिळाले पैसे?
11
"कोणालाही सोडले जाणार नाही, यांचा नाश होत नाही तो पर्यंत..."; अमित शाहांचा दहशतवाद्यांना इशारा
12
जेट विमानातून एक महिन्यापूर्वी पडलेला बॉम्ब केला निकामी, अन्यथा घडला असता मोठा अनर्थ 
13
मुस्लीम विद्यार्थी चारच, पण 159 जणांना नमाज पठण करण्यास भाग पाडलं; प्रोफेसरला अटक!
14
Pahalgam Terror Attack : पहलगाम हल्ल्यापूर्वी दहशतवाद्यांनी दाखवलं मॅगी, मोमोजचं आमिष; महिलेचा धक्कादायक खुलासा
15
रशियाने १९७२ साली सोडलेला उपग्रह नियंत्रण सुटून पृथ्वीवर कोसळणार, इथे होऊ शकते धडक, संपूर्ण जगाची चिंता वाढली   
16
युद्धात पाकिस्तानच्या बाजूनं उभं राहणार, भारताचे तुकडे होतील; कोण आहे हा दिल्लीचा शत्रू? मुनीर सैन्यासोबत लढण्याची केली घोषणा
17
किती ती चिडचिड! तुमच्या रागावर आताच ठेवा ताबा नाहीतर हार्ट ॲटॅकचा मोठा धोका
18
आता थांबायचं नाय! 'धर्मवीर' फेम मराठी अभिनेत्याने घेतली शानदार 'थार'; मुलीच्या आनंदाला उधाण
19
भयंकर! नवरा-नवरीसोबत आक्रित घडलं, कारला भीषण आग; ७ जणांनी उड्या मारुन वाचवला जीव
20
वैभव सूर्यवंशीने ठोकलं विक्रमी शतक, पण आता लागू शकते क्रिकेटबंदी; खेळाडूच्या आरोपाने चर्चांना उधाण

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईबाबतचा संभ्रम दूर करा

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना अभय देण्याची भूमिका जाहीर केली होती. तर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या नगरविकास विभागाने डिसेंबर २0१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला असून, हा संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रकाशझोत सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर ही संघटना कार्यरत आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न तडीस नेण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने याअगोदर २0१२ पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे धोरण जाहीर केले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट २0१५पर्यंतची बांधकामे नियमित करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सिडको महापालिकेने २0१२ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले असतानाही महापालिका व सिडकोने कारवाई मोहीम सुरूच ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांतून संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन येथे आंदोलन केले. आमरण उपोषण करण्यात आले. याची दखल घेत नगरविकास विभागाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून २0१२ पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिल्याचे नव्याने जाहीर केले. त्यामुळे उपोषण संपले, आंदोलन शमले. मात्र, प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय जाहीर केले असताना त्याच राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने २0१२पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. ही बाब सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना बुचकळ्यात टाकणारी आहे. तसेच त्यांची दिशाभूल करणारी असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय असल्याचे लेखी स्वरूपातील पत्र प्राप्त करावे, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांच्याकडे केली आहे. तसेच यासंदर्भातील पत्राची प्रत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)