शहरं
Join us  
Trending Stories
1
सीरियावरील हल्ल्यांमुळे इराण संतापला; इस्रायलला जन्माची अद्दल घडवण्यासाठी आखला प्लॅन
2
ना कॉल ना गिफ्ट...! शमीची पोस्ट बघून हसीन जहाँच्या मनात आली ही गोष्ट, म्हणाली...
3
STनेच होणार विदर्भातील नागरिकांची नागद्वार यात्रा, दोन्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची फोनवर चर्चा
4
उद्योगपती कल्याणींच्या कन्येची वडिलोपार्जित मालमत्तेवरील मालकी हक्कासाठी कराड न्यायालयात धाव
5
"आम्ही युद्धाला घाबरत नाही, आमचं संपूर्ण आयुष्य..."; सीरियाच्या राष्ट्राध्यक्षांचा इस्रायलला इशारा
6
IND vs ENG : नो रिस्क; बुमराह चौथा कसोटी सामना खेळणार हे जवळपास फिक्स! प्रशिक्षकांनीच दिली हिंट
7
VIDEO: अंबरनाथ पालिकेत दोन ठेकेदारांमध्ये पोलिसांसमोरच सुरू झाली फ्री-स्टाइल हाणामारी
8
टाटा समूहाच्या हॉटेल कंपनीला २९६ कोटींचा नफा, ५ वर्षांत गुंतवणूकदारांना केलं मालामाल; दिला बंपर परतावा!
9
"महाराष्ट्र झाले २० टक्के कमिशनचे राज्य, राज्यात सत्ताधारी टॉवेल बनियन गँगचा धुमाकूळ’’, विजय वडेट्टीवार यांची टीका  
10
"राज्यात पाच महिन्यात १ लाख ६० हजार गुन्हे, ९२४ हत्या", अंबादास दानवे यांनी मांडली धक्कादायक आकडेवारी
11
विधिमंडळात पडळकर आणि आव्हाडांच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी; CM फडणवीस म्हणाले, 'हे योग्य नाही'
12
अहमदाबादमधील विमान अपघात वैमानिकांच्या चुकीमुळे? AAIBने स्पष्टच सांगितलं, ते दावे फेटाळले
13
काल पडळकर आणि आव्हाडांमध्ये वाद, आज दोन्ही नेत्यांचे कार्यकर्ते भिडले, विधानभवन परिसरात पुन्हा राडा, पाहा VIdeo
14
"भगवद्गीता वाचून हिंदू झालो, पण हिंदू होण्यासाठी...?" बाबा बागेश्वर आणि पाकिस्तानचे आरिफ अजाकिया यांच्यातील प्रश्नोत्तर व्हायरल
15
CM फडणवीस म्हणाले त्रिभाषा सूत्र लागू करणार; उद्धव ठाकरेंनी हिंदीला विरोध करणारे पुस्तकच भेट दिलं
16
Ghatkopar Wall Collapse: घराच्या दुरुस्तीदरम्यान भिंत कोसळल्याने कामगाराचा मृत्यू, घाटकोपर येथील घटना!
17
दिसला गं बाई दिसला... अखेर सारा तेंडुलकर अन् शुबमन गिलचा 'तो' VIDEO सापडलाच..!!
18
२४ तासांत ३० किलो वजन कमी करण्याची हमी, शस्त्रक्रियेनंतर लगेच महिलेचा मृत्यू   
19
यूपी पोलिसांच्या एन्काउंटरमध्ये २३८ गुन्हेगार ठार, तर ९ हजारांहून अधिक गोळीबारात जखमी
20
IND W vs ENG W : वनडेत एक नंबर कामगिरी! स्मृती-प्रतिका सलामी जोडीनं सेट केला वर्ल्ड रेकॉर्ड

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईबाबतचा संभ्रम दूर करा

By admin | Updated: March 25, 2017 01:42 IST

प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना

नवी मुंबई : प्रकल्पग्रस्तांच्या बांधकामांवरील कारवाईच्या मुद्द्यावरून संभ्रम निर्माण झाला आहे. मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी २0१५ पर्यंतच्या बांधकामांना अभय देण्याची भूमिका जाहीर केली होती. तर प्रकल्पग्रस्तांच्या आंदोलनानंतर गेल्या आठवड्यात राज्याच्या नगरविकास विभागाने डिसेंबर २0१२ पर्यंतच्या बांधकामांना अभय दिल्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे प्रकल्पग्रस्तांत कमालीचा संभ्रम निर्माण झाला असून, हा संभ्रम दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधींनी पुढाकार घ्यावा, अशी मागणी प्रकाशझोत सामाजिक संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे.प्रकल्पग्रस्तांच्या विविध प्रश्नांवर ही संघटना कार्यरत आहे. त्यांचे प्रलंबित प्रश्न तडीस नेण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून पाठपुरावा सुरू आहे. राज्य सरकारने याअगोदर २0१२ पर्यंतच्या बेकायदा बांधकामांना अभय देण्याचे धोरण जाहीर केले होते. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सरसकट २0१५पर्यंतची बांधकामे नियमित करण्याची घोषणा वर्षभरापूर्वी केली होती; परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाचा हवाला देत सिडको महापालिकेने २0१२ नंतरच्या बांधकामांवर कारवाईचा धडाका सुरूच ठेवला आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय दिले असतानाही महापालिका व सिडकोने कारवाई मोहीम सुरूच ठेवल्याने प्रकल्पग्रस्तांतून संताप व्यक्त होत आहे.गेल्या आठवड्यात प्रकल्पग्रस्तांनी सिडको भवन येथे आंदोलन केले. आमरण उपोषण करण्यात आले. याची दखल घेत नगरविकास विभागाने उपोषणकर्त्यांशी चर्चा करून २0१२ पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिल्याचे नव्याने जाहीर केले. त्यामुळे उपोषण संपले, आंदोलन शमले. मात्र, प्रकल्पग्रस्तांत संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले आहे. मुख्यमंत्र्यांनी २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय जाहीर केले असताना त्याच राज्य सरकारच्या नगरविकास खात्याने २0१२पर्यंतच्या बांधकामांवरील कारवाईला स्थगिती दिली आहे. ही बाब सर्वसामान्य प्रकल्पग्रस्तांना बुचकळ्यात टाकणारी आहे. तसेच त्यांची दिशाभूल करणारी असल्याने स्थानिक लोकप्रतिनिधींनी यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून २0१५पर्यंतच्या बांधकामांना अभय असल्याचे लेखी स्वरूपातील पत्र प्राप्त करावे, अशी मागणी प्रकाशझोत संस्थेचे अध्यक्ष विकास पाटील यांनी आमदार संदीप नाईक यांच्याकडे केली आहे. तसेच यासंदर्भातील पत्राची प्रत बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांनाही देण्यात आल्याचे पाटील यांनी सांगितले. (प्रतिनिधी)