नवी मुंबई: नवी मुंबईचे राजकारण सध्या वनमंत्री गणेश नाईक आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यातील तीव्र संघर्षामुळे ढवळून निघाले आहे. आधी केवळ शाब्दिक चकमकींपुरता मर्यादित असलेला हा वाद आता थेट रस्त्यावरील 'बॅनरयुद्धा'पर्यंत पोहोचला आहे. शिंदे समर्थकांनी शहरात लावलेल्या उपरोधिक बॅनरमुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे.
शिंदेसेनेचे नवी मुंबई संपर्क प्रमुख अंकुश कदम यांनी नवी मुंबईत ठिकठिकाणी बॅनर लावले आहेत. यावर कोणाचेही नाव थेट न घेता, "स्मृतिभ्रंश झालेल्या स्वयंघोषित शिल्पकारांवर मोफत उपचार करून मिळेल," असा जळजळीत मजकूर लिहिण्यात आला आहे. गणेश नाईक स्वतःला 'नवी मुंबईचे शिल्पकार' मानतात, त्यामुळे हा इशारा थेट त्यांच्याकडेच असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
संघर्षाची पार्श्वभूमी काय?
महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारात गणेश नाईक यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली होती. "टांगा पलटी, घोडे फरार करू" असे खुले आव्हान त्यांनी दिले होते. इतकेच नव्हे तर, खासदार श्रीकांत शिंदे यांना 'माजी खासदार' करण्याचा इशाराही नाईक यांनी दिला होता. या विधानानंतर शिंदे समर्थक कमालीचे आक्रमक झाले असून, आता समाज माध्यमांपासून ते प्रत्यक्ष बॅनरपर्यंत नाईक यांच्या विरोधात मोहीम उघडली गेली आहे.
Web Summary : Political tensions rise in Navi Mumbai as Shinde and Naik factions engage in a 'banner war' following critical remarks. Shinde supporters target Naik, who is known as 'sculptor of Navi Mumbai,' with sarcastic banners offering treatment for 'memory loss'.
Web Summary : नवी मुंबई में शिंदे और नाइक गुटों के बीच राजनीतिक तनाव बढ़ गया है, जिसके बाद 'बैनर युद्ध' छिड़ गया है। शिंदे समर्थकों ने नाइक को निशाना बनाया, जिन्हें 'नवी मुंबई का शिल्पकार' माना जाता है, और व्यंग्यात्मक बैनर लगाकर 'स्मृति हानि' के इलाज की पेशकश की है।