ई-लर्निंग संच खरेदीत अपहार!
By Admin | Updated: August 30, 2016 03:18 IST2016-08-30T03:18:02+5:302016-08-30T03:18:02+5:30
जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शाळांसाठी ई-लर्निंग संच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला.

ई-लर्निंग संच खरेदीत अपहार!
पनवेल : जिल्हा परिषदेच्या पनवेल तालुक्यातील शाळांसाठी ई-लर्निंग संच खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप तालुका पंचायत समितीचे विरोधी पक्षाचे सदस्य नीलेश पाटील यांनी पत्रकार परिषदेत केला. हे संच धूळ खात पडले असून विद्यार्थ्यांना त्याचा उपयोग होत नसल्याने ई-लर्निंगमध्ये राज्यात पनवेल तालुका अव्वल असल्याचा दावा खोटा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
पंचाईत समितीच्या सेस फंडातून २०१५-१६ मध्ये १ कोटी २५ लाख रुपये खर्च करून ई-लर्निंग संच खरेदी केले. वृत्तपत्रात निविदा प्रसिद्ध न करता केवळ आॅनलाइन निविदा मागवण्यात आल्या होत्या. त्यात एकाही स्थानिक कंपनीचा सहभाग नव्हता. पहिली ते चौथी व पाचवी ते सातवी अशी वर्गवारी करून १३९ संच खरेदी करण्यासाठी चार वेगवेगळ्या निविदा मागवण्यात आल्या. तालुक्यातील २६३ पैकी १७१ शाळांना संच देण्यात आले. पाचवी ते सातवीपर्यंत ९० शाळा असताना १०४ संच खरेदी करण्यात आले. त्यामुळे अनेक संच वापराविना पडून आहेत.
तालुक्यातील एकाही शिक्षकाला संच वापरण्याचे प्रशिक्षण दिलेले नाही. २०१३-१४ व २०१४-१५ मध्ये प्रत्येकी १६ संच खरेदी केले होते, त्याचे दोन वर्ष वाटपच करण्यात आले नव्हते. संच खरेदीत वेगवेगळ्या कंपन्या दाखविल्या असल्या तरी त्यांचा ठेकेदार एकच आहे. आदित्य पेरिप्युलर ही कोल्हापूरची तर समकन्सेप्ट टेक्नोलॉजी या पुण्याच्या कंपनीने करारासाठी एकाच दिवशी अमरावती येथून एकाच वेंडरकडून बॉन्ड पेपर खरेदी केल्याचे उघड झाले आहे. याशिवाय रोटरीच्या माध्यमातून दिलेल्या ९ संचाचे बिलही सेस फंडातून लावल्याची शंका पाटील यांनी व्यक्त केली. निविदा प्रक्रि या संगनमताने राबवल्याचा आरोप करून बाजारभावापेक्षा दुप्पट किमतीने संच खरेदी केले आहेत. ३० ते ३५ हजार रु पये किंमत असलेले संच ७२ हजाराला तर प्रोजेक्टर असलेले संच १ लाख १७ हजार ५०० रु पयांना खरेदी करण्यात आले असून त्याची किंमत बाजारात ५५ ते ६० हजार आहेत. या सॉफ्टवेअरमध्ये हिंदी व सेमी इंग्रजी अभ्यासक्रम नाही. करारनाम्याप्रमाणे ते बंधनकारक आहे. रोहिंजण शाळेतील संच नादुरुस्त झाला आहे. शिवाय शाळांमध्ये संच पोहोचण्याऐवजी कळंबोलीतून संच घेऊन जाण्याच्या सूचना तालुक्यातील शाळांना करण्यात आल्या आहेत.