शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासाठी मिळणार चांगली बातमी? H-1B च्या तणावादरम्यान एस जयशंकर आणि अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्र्यांची भेट
2
ट्रम्प यांच्या 50 टक्के टॅरिफला भारतानं का दिलं नाही उत्तर? राजनाथ सिंह यांचा परदेशातून मोठा खुलासा!
3
IND vs PAK : भारताला हरवायचंय? मग सेना प्रमुखांसोबत ओपनिंग करा! इम्रान खानचा PCB अध्यक्षाला यॉर्कर
4
'मला रिकामं ठेवू नका'; धनंजय मुंडेंच्या विनंतीवर अजित पवार म्हणाले, 'सूचनेचे पालन केलं जाईल'
5
"ED, EVM, भौकने वाले..., फौज तेरी भारी है; जंजीरों में जकड़ा हुआ जयंत पाटील..." पडळकरांच्या वक्तव्यावरून अमोल कोल्हेंचा हल्लाबोल
6
'सुप्रीम कोर्ट आता बेल कोर्ट बनलं आहे'; जामीन अर्जांची संख्या पाहून न्यायमूर्ती नागरत्ना यांनी व्यक्त केली चिंता
7
IND vs AUS : मॅच आधी टीम इंडियाचा कॅप्टन बदलला! श्रेयस अय्यर अचानक घरी परतला; कारण....
8
"सनातनी हज यात्रेला जात नाहीत, त्यांच्या लोकांनीही...; गरबा मंडपाच्या दरवाजावर गोमूत्र ठेवा!"; धीरेंद्र शास्त्री यांचा सल्ला
9
"२० ओव्हर्स टिकणार त्या दिवशी २०० धावा ठोकणार"; अभिषेक शर्मासंदर्भात मोठी भविष्यवाणी
10
बाई, काय हा प्रकार! पाकिस्तान बेक्कार हरला, तरीही हॅरिस रौफच्या बायकोने केली 'तशी' पोस्ट
11
उद्धवसेनेच्या दसऱ्या मेळाव्याला राज ठाकरे जाणार? टिझरने वेधले लक्ष, मिळाले सूचक संकेत!
12
'Before आणि After चा बोर्ड पाहून आनंद झाला', GST 2.0 बाबत PM मोदींचे देशाच्या नावे पत्र
13
India vs West Indies Test Series: गिलच्या संघातून रिषभ पंत 'आउट'; कोण घेणार त्याची जागा?
14
IND vs PAK: "तुम्ही जर पातळी सोडून वागायला लागलात तर बॅटने..."; इरफानने पाकिस्तानला सुनावलं
15
'पोलीस बाजूला ठेवा, दम असेल तर एकदा रणांगणात या'; निलेश लंकेंचा गोपीचंद पडळकरांना जाहीर इशारा
16
‘मला रिकामे ठेवू नका’, मुंडेंच्या विधानावर जरांगेची प्रतिक्रिया; म्हणाले, “रोजगार हमीवर जा”
17
'बेनिफिट ऑफ डाउट' मिळाला असता तर आम्ही जिंकलो असतो; 'त्या' निर्णयावर अख्तरची 'बोलंदाजी'
18
नेपाळमध्ये ‘Gen Z’चे आंदोलन, RSS नेत्यांचे विधान; म्हणाले, “जगात षड्‍यंत्र, हिंदू समाज...”
19
१५ दिवसात भाजपच्या दुसऱ्या नगरसेवकाला अटक; टोळीला हाताशी धरुन केला गोळीबार, पैसेही पुरवले
20
मुक्या जीवाचे हाल! गायीच्या डोळ्यांवर पट्टी बांधली, फेकलं नाल्यात; काळजात चर्र करणारी घटना

तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:09 IST

मध्यरात्री ऐरोलीकर उतरले रस्त्यावर.

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर मंगळवारी मध्यरात्री ऐरोलीतील नागरिक रस्त्यावर उतरले. शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे.

शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्रीदेखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील नागरिक घेत आहेत.  विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.

यामुळे महावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. अशातच मंगळवारी रात्री ऐरोली परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता अडवून महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी घणसोली परिसरातदेखील वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन्ही विभागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवून सुमारे साडेतीन ते चार तासांत दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसवले. मात्र, प्रतिवर्षी उन्हाळा सुरू होताच महावितरणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. तर उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन बिघाडाच्या घटना घडतात, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.  

अनधिकृत जोडण्यांचा भार-

शहरातील अनेक गावे, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून, त्या ठिकाणी निवासी, वाणिज्य वापरासाठी चोरीच्या विजेचा वापर होत आहे. यामुळेदेखील संबंधित ट्रान्सफॉर्मरवर भार वाढून त्यात बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.

उन्हाळ्यात वाढतो विजेचा वापर-

१)  उन्हाचा पारा चढताच नागरिकांकडून घर, कार्यालयातील पंखा तसेच एसीचा वापर वाढतो. 

२) त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असते. अशातच अनेक भागांमध्ये १५ ते २० वर्षांपूर्वीच्या कमी क्षमतेच्या वायरी असल्याने त्या जळण्याच्यादेखील घटना घडत असतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईairoli-acऐरोलीmahavitaranमहावितरणelectricityवीज