शहरं
Join us  
Trending Stories
1
बदल्याची आग पेटली! लश्कर-ए-तोयबाच्या टॉप कमांडरला भारतीय जवानांनी ठार केले
2
रेल्वे स्थानकावर ओळखीतून आठ महिन्यांच्या बाळाचे अपहरण..! रिक्षाचालकाच्या मदतीने असा उलगडला गुन्हा
3
याचीच तर वाट पाहत होता...! आता भारताला एलओसी बंधनकारक नाही, सैन्य आरपार घुसू शकते; शिमला कराराच्या बेड्या तुटल्या
4
Navi Mumbai Crime: बेलापूरमध्ये विकासकाने घरातच गोळी झाडून केली आत्महत्या, प्रकरण काय?
5
टॅरिफमुळे जागतिक व्यापार घसरणार; जागतिक व्यापार संघटनेने व्यक्त केली भीती
6
ISI ची साथ, ५ दहशतवाद्यांना घेऊन सैफुल्लाहनं रचला कट; पहलगाम हल्ल्यात पाकचा बुरखा फाटला
7
Shakti Dubey : शाब्बास पोरी! ४ वेळा अपयश अन् पाचव्या प्रयत्नात 'नंबर वन'; शक्ती दुबेची अभिमानास्पद कामगिरी
8
भारतात पाकिस्तानी डिग्री अवैध, तरीही एवढे भारतीय विद्यार्थी शिक्षण घेतायत; ना मिळणार नोकरी, ना उच्चशिक्षण... 
9
Pahalgam Terror Attack : "विनय नरवाल यांच्या पत्नीला खोटं सांगितलं की ते जिवंत आहेत, त्यानंतर मी खूप वेळा रडलो"
10
Swami Samartha: स्वामी पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या स्वामींनी भक्तांना दिलेला आदेश, उपासना आणि संकल्प!
11
जागतिक बाजारपेठेत तेजी असूनही भारतीय शेअर बाजार का कोसळला? 'ही' आहेत ३ मोठी कारणे
12
"पीडितांना सतत तेच बोलायला लावणं क्लेशदायक आहे", मीडिया आणि राजकारण्यांवर संतापली मराठी अभिनेत्री
13
Gensol Engineering च्या प्रमोटरना ईडीनं घेतलं ताब्यात, फंड डायव्हर्जन प्रकरणी मोठी कारवाई
14
कॉमेडियन कुणाल कामराला मोठा धक्का, शिंदेंच्या विडंबन प्रकरणी दाखल गुन्हा रद्द करण्यास कोर्टाचा नकार 
15
सामाजिक कार्यकर्त्या मेधा पाटकर यांना दिल्ली पोलिसांनी केली अटक; काय आहे प्रकरण?
16
Pahalgam Terror Attack: दहशतवादी हल्ला त्याठिकाणी लष्कराचे जवान का नव्हते? सरकारने दिलं उत्तर, कुठे झाली चूक?
17
Ramayana: साई पल्लवी नव्हे तर ही अभिनेत्री बनली असती सीता, म्हणाली - "मी स्वतःच दिला नकार..."
18
पाकिस्तानी खेळाडूला आमंत्रित केल्यामुळे ट्रोल झालेल्या नीरज चोप्रानं लिहिली भलीमोठी पोस्ट
19
'कुणी नाश्ता करत होतं, कुणी फिरत होतं'; बैसरन घाटीतील दहशतवादी हल्ला होण्यापूर्वीचा व्हिडीओ
20
पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांवर पहिला प्रहार, आसिफ शेख आणि आदिलची घरं सुरक्षा दलांकडून उद्ध्वस्त

तिकडे उन्हाचा पारा चढताच इकडे महावितरणची बत्ती गुल; विजेचा लपंडाव वाढला

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2024 11:09 IST

मध्यरात्री ऐरोलीकर उतरले रस्त्यावर.

नवी मुंबई : मागील काही दिवसांपासून विजेचा लपंडाव सुरू असल्याने अखेर मंगळवारी मध्यरात्री ऐरोलीतील नागरिक रस्त्यावर उतरले. शहरात ठिकठिकाणी सातत्याने विजेचा लपंडाव सुरू असल्याने रखरखत्या उन्हात वीज ग्राहकांचाही पारा चढत आहे.

शहरात तापमानाचा पारा चाळिशीच्या पार जात आहे. रात्रीदेखील ३० ते ३५ अंशावर तापमान राहत असल्याने नागरिक अधिकच त्रस्त आहेत. त्यामुळे दिवसा तसेच रात्री अंगाची होणारी लाहीलाही टाळण्यासाठी सर्वच जण एसी, कूलरचा गारवा घेत आहेत. अशातच शहरात ठिकठिकाणी विजेच्या लपंडावाचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे ना घरात थांबू शकतो, ना घराबाहेर जाऊ शकतो, अशी अवस्था होत आहे. असाच अनुभव मागील काही दिवसांपासून ऐरोली, घणसोली, कोपरखैरणे व वाशी परिसरातील नागरिक घेत आहेत.  विजेअभावी लहान मुले, वृद्ध, रुग्ण कमालीचे त्रस्त झाले आहेत.

यामुळे महावितरणविरोधात नागरिकांचा रोष वाढत आहे. अशातच मंगळवारी रात्री ऐरोली परिसरात वीजपुरवठा खंडित झाला होता. यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रस्त्यावर उतरून रस्ता अडवून महावितरणविरोधात घोषणाबाजी केली. त्याचवेळी घणसोली परिसरातदेखील वीजपुरवठा खंडित झाला होता. दोन्ही विभागातील ट्रान्सफॉर्मरमध्ये बिघाड झाल्याने परिसराचा वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी कामाची गती वाढवून सुमारे साडेतीन ते चार तासांत दोन्ही ट्रान्सफॉर्मर बसवले. मात्र, प्रतिवर्षी उन्हाळा सुरू होताच महावितरणचा वीजपुरवठा खंडित होत असल्याने नागरिकांकडून रोष व्यक्त होत आहे. तर उन्हाळ्यात विजेचा वापर वाढत असल्याने ट्रान्सफॉर्मरवर लोड येऊन बिघाडाच्या घटना घडतात, असे महावितरणच्या अधिकाऱ्यांमार्फत स्पष्ट करण्यात आले आहे.  

अनधिकृत जोडण्यांचा भार-

शहरातील अनेक गावे, गावठाण परिसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामे असून, त्या ठिकाणी निवासी, वाणिज्य वापरासाठी चोरीच्या विजेचा वापर होत आहे. यामुळेदेखील संबंधित ट्रान्सफॉर्मरवर भार वाढून त्यात बिघाड होण्याच्या घटना सातत्याने घडत असतात.

उन्हाळ्यात वाढतो विजेचा वापर-

१)  उन्हाचा पारा चढताच नागरिकांकडून घर, कार्यालयातील पंखा तसेच एसीचा वापर वाढतो. 

२) त्यामुळे उन्हाळ्यात विजेची मागणी वाढत असते. अशातच अनेक भागांमध्ये १५ ते २० वर्षांपूर्वीच्या कमी क्षमतेच्या वायरी असल्याने त्या जळण्याच्यादेखील घटना घडत असतात.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईairoli-acऐरोलीmahavitaranमहावितरणelectricityवीज