शहरं
Join us  
Trending Stories
1
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
2
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
3
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
4
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
5
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
6
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
7
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
8
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
9
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
10
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
11
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
12
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
13
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
14
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
15
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
16
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
17
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
18
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
19
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
Daily Top 2Weekly Top 5

परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरांमध्ये दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:22 IST

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, दरांमध्ये वाढ झाली आहे.

प्राची सोनवणे नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, दरांमध्ये वाढ झाली आहे. या पावसाचा फटका उत्पादनावर बसला असून, हलक्या प्रतिचा माल बाजारात येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा, तसेच या मालाच्या विक्रीबाबत व्यापारी संकटात सापडले आहेत. घाऊक बाजारात दर स्थिरावत असताना किरकोळ बाजारात मात्र दाम दुपटीने भाज्यांची विक्री केली जात आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा परिणाम भाजीपाला विक्रीवर झाला आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ६० ते ७० रुपये दराने विकल्या जात आहेत. इतरवेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, वाशीतील घाऊक बाजारात मंगळवारी ८० ट्रक, ४५१ टेम्पो अशा एकूण ५३१ गाड्यांची आवक झाली. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बसत नसल्याने याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केली. येत्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले तर उत्तर भारतातील येणाºया मालाचीही आवक घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नारायणगाव, चाकण, नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात असून, पावसामुळे उत्पादन घटले आहे.>पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत, असे मत भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत. दिवाळीची सुटी संपत आली असून, अनेक जण आता परगावाहून परतणार असून पुन्हा भाजीपाल्याची मागणी वाढेल. मात्र, त्यानुसार पुरवठा न झाल्यास दरवाढीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.किरकोळ बाजारात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, बाजारात मालच नाही असे कारण पुढे करत किरकोळ विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाज्यांबरोबरीने आता फळांचेही दर वाढू लागले असून, ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. पैसे देऊनही मात्र चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. दर असेच वाढविले तर सर्वसामान्यांनी भाजीपाला खाणेचे बंद करावे काय, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका पखाले या गृहिणीने व्यक्त केली.>छटपूजेलाही बाजार कमीचछटपूजेसाठी एपीएमसी परिसरातील बहुतांश व्यापारी वर्ग सुटीवर जात असल्याने बाजार कमी होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे. त्यामुळे पूजेचे दोन दिवस बाजारात भाजीपाल्याची आवक कमीच राहणार असल्याचेही व्यापाºयांनी सांगितले.महिनाअखेरपर्यंत मालाची आवक अशीच राहणार असून, दरवाढीबाबत अनिश्चितता कायम राहील. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही पावसाचा फटका शेतमालावर बसला असून, आवक घटली आहे. परिणामी आवक घटल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारांंमध्ये भाववाढीने उच्चांक गाठला आहे. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, चांगल्या प्रतिचा माल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तो माल टिकविणे आणि त्याची विक्री करण्याचे आव्हान व्यापारीवर्गासमोर आहे.- प्रशांत जगताप, सचिव, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ