शहरं
Join us  
Trending Stories
1
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
2
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
3
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
4
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार
5
जम्मू-काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात दिसले 4 संशयित, सुरक्षा दलांनी सुरू केली शोध मोहीम...
6
Pahalgam Terror Attack : "माझा एक भाऊ जेलमध्ये, दुसरा मुजाहिदीन, सरकारने त्याला पकडावं"; दहशतवाद्याच्या बहिणीचा Video
7
ज्याच्यासाठी लिंग परिवर्तन केलं, त्याचं दुसऱ्यावरच प्रेम जडलं...! सनीची मारिया बनलेली किन्नर पोहोचली पोलीस ठाण्यात, अन् मग...
8
पाकिस्तान एलओसीवर मोठ्या प्रमाणावर शस्त्रास्त्रे जमवू लागला; भारताची तयारी काय...
9
Video - अरे देवा! तिकीट भलतंच पण अरेरावी भरपूर; ट्रेनमध्ये टीटीईशी भिडली महिला अन्...
10
खिशातच आयफोनचा स्फोट, तरूण गंभीर जखमी; थरारक घटनेचा व्हिडीओ समोर
11
महात्मा गांधीही इंग्रजांना पत्र लिहिताना "आपला विश्वासू सेवक" लिहायचे, मग त्यांनाही...; राहुल गांधींची सुप्रीम कोर्टाकडून कानउघाडणी
12
Pahalgam Terror Attack: सरकारने पाकिस्तानला सडेतोड उत्तर द्यावं, पण कुठलाही निर्णय घेताना...; शरद पवार यांनी मांडले स्पष्ट मत
13
शरद पवारांच्या विधानावर CM फडणवीसांचं प्रत्युत्तर, म्हणाले- "ज्यांचे आप्तेष्ट मारले गेले..."
14
भारत- पाकिस्तान तणावादरम्यान बलुचिस्तानमध्ये बॉम्ब स्फोट, ४ सैनिकांचा मृत्यू
15
पर्यटकांना वाचवताना जीव गमावला; काश्मिरी युवकाच्या कुटुंबाला DCM शिंदेकडून ५ लाखांची मदत
16
शनिवारी शिवरात्रि स्वामी पुण्यतिथी: ५ राशींनी ‘हे’ करा, साडेसातीत दिलासा; शनिची कायम कृपा!
17
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
18
Swami Samartha: स्वामीकृपा झाल्यावर आपल्या आयुष्यात 'हे' बदल घडतात; तुम्हीदेखील अनुभवले का?
19
भारताच्या कारवाईने पाक सैन्य घाबरले; लष्करप्रमुखाचे कुटुंब खाजगी विमानाने देश सोडून पळाले
20
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत

परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याची आवक घटल्यानं दरांमध्ये दुपटीने वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 25, 2017 02:22 IST

नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, दरांमध्ये वाढ झाली आहे.

प्राची सोनवणे नवी मुंबई : परतीच्या पावसामुळे भाजीपाल्याच्या झालेल्या नुकसानामुळे भाजीपाल्याची आवक घटली असून, दरांमध्ये वाढ झाली आहे. या पावसाचा फटका उत्पादनावर बसला असून, हलक्या प्रतिचा माल बाजारात येत आहे. त्यामुळे हा माल टिकवायचा कसा, तसेच या मालाच्या विक्रीबाबत व्यापारी संकटात सापडले आहेत. घाऊक बाजारात दर स्थिरावत असताना किरकोळ बाजारात मात्र दाम दुपटीने भाज्यांची विक्री केली जात आहे. सर्वसामान्यांचे बजेट कोलमडले असून, दरवाढीला सामोरे जावे लागत आहे.शेतमालाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, त्याचा परिणाम भाजीपाला विक्रीवर झाला आहे. घाऊक बाजारात भाज्यांचे दर ३५ ते ४० रुपयांच्या घरात गेले आहे. त्यामुळे किरकोळ बाजारात भाज्या ६० ते ७० रुपये दराने विकल्या जात आहेत. इतरवेळी ६०० ते ६५० गाड्यांची आवक होणाºया भाजीपाल्याची आवक घटली असून, वाशीतील घाऊक बाजारात मंगळवारी ८० ट्रक, ४५१ टेम्पो अशा एकूण ५३१ गाड्यांची आवक झाली. मागणी आणि पुरवठ्याचे गणित बसत नसल्याने याचा परिणाम भाज्यांच्या दरावर झालेला आहे, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाने व्यक्त केली. येत्या काही दिवसांमध्ये थंडीचे प्रमाण वाढले तर उत्तर भारतातील येणाºया मालाचीही आवक घटण्याची शक्यता नाकारता येत नाही. नारायणगाव, चाकण, नाशिक जिल्ह्यातून भाजीपाल्याची आवक केली जात असून, पावसामुळे उत्पादन घटले आहे.>पुरवठा कमी झाल्याने भाज्यांचे दर कडाडले आहेत, असे मत भाजीपाल्याचे घाऊक व्यापारी व्यक्त करत आहेत. दिवाळीची सुटी संपत आली असून, अनेक जण आता परगावाहून परतणार असून पुन्हा भाजीपाल्याची मागणी वाढेल. मात्र, त्यानुसार पुरवठा न झाल्यास दरवाढीला सामोरे जावे लागेल, अशी प्रतिक्रिया व्यापारी वर्गाकडून व्यक्त करण्यात आली.किरकोळ बाजारात भाज्यांचे दर मोठ्या प्रमाणात वाढले असून, बाजारात मालच नाही असे कारण पुढे करत किरकोळ विक्रेत्यांची लूट सुरू आहे. भाज्यांबरोबरीने आता फळांचेही दर वाढू लागले असून, ग्राहकांचा खिसा कापला जात आहे. पैसे देऊनही मात्र चांगल्या दर्जाचा माल ग्राहकांपर्यंत पोहोचत नाही. दर असेच वाढविले तर सर्वसामान्यांनी भाजीपाला खाणेचे बंद करावे काय, अशी संतप्त प्रतिक्रिया प्रियंका पखाले या गृहिणीने व्यक्त केली.>छटपूजेलाही बाजार कमीचछटपूजेसाठी एपीएमसी परिसरातील बहुतांश व्यापारी वर्ग सुटीवर जात असल्याने बाजार कमी होत असल्याची माहिती व्यापाºयांनी दिली आहे. त्यामुळे पूजेचे दोन दिवस बाजारात भाजीपाल्याची आवक कमीच राहणार असल्याचेही व्यापाºयांनी सांगितले.महिनाअखेरपर्यंत मालाची आवक अशीच राहणार असून, दरवाढीबाबत अनिश्चितता कायम राहील. महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यांमध्येही पावसाचा फटका शेतमालावर बसला असून, आवक घटली आहे. परिणामी आवक घटल्याने दरांमध्ये वाढ झाली आहे. घाऊक बाजारापेक्षा किरकोळ बाजारांंमध्ये भाववाढीने उच्चांक गाठला आहे. पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले असून, चांगल्या प्रतिचा माल कमी प्रमाणात उपलब्ध आहे. तो माल टिकविणे आणि त्याची विक्री करण्याचे आव्हान व्यापारीवर्गासमोर आहे.- प्रशांत जगताप, सचिव, घाऊक भाजीपाला व्यापारी महासंघ