शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रेल्वे सेवेमुळे उरणच्या विकासाला गतीे,  वाहतूककोंडी कमी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:57 IST

उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत.

नामदेव मोरे  नवी मुंबई -  उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. उलवेसह परिसरातील घरांच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. शासनाने १९८९ मध्ये जेएनपीटी बंदर सुरू केले. जवळपास तीन दशकांच्या वाटचालीमध्ये देशातील प्रमुख बंदर म्हणून जेएनपीटीचा नावलौकिक झाला आहे. येथील रोजगारामध्ये वाढ झाली असली तरी वाहतुकीची साधने नसल्यामुळे या परिसराचा विकास आवश्यक गतीने होवू शकला नाही. या मार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होवू लागली होती. कोंडी सोडविण्यासाठी उरण रेल्वे प्रकल्पाची मागणी होवू लागली होती. शासनाने १९९७ मध्येच या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४९५ कोटी रुपये खर्च होणार होते, परंतु विविध कारणांनी हा प्रकल्प रखडत गेला व खर्चाचा आकडा तब्बल १७८२ कोटींवर पोहचला. जमीन संपादन व वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होवू शकला नव्हता. सर्व अडचणींवर मात करून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले असून ११ नोव्हेंबरला प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. यामुळे उरणवासीयांचे २० वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे. सिडकोने विकसित केलेल्या उलवे नोडमधील सेक्टर २, ३, ९, १९, २०, २१, २२ व २३ मध्ये नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे सेवा नसल्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली होती. रिक्षा, एनएमएमटी बस, एसटी व खासगी वाहतुकीवर या परिसरातील नागरिकांना विसंबून राहावे लागत होते. गैरसोयीमुळे अनेकांनी घरे विकत घेवूनही तेथे वास्तव्यास जाण्याचे टाळले होते. रेल्वे सुविधेमुळे या सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यामुळे विमानतळ परिसर व संपूर्ण उरण तालुक्यामध्ये बांधकाम व्यवसायाला गती येणार आहे. उलवे नोडमधील सर्व सेक्टरचे बांधकाम वेगाने होणार आहे. याशिवाय उरणपर्यंतच्या सर्व रेल्वे स्टेशन परिसरातील कामांना गती येणार आहे. बांधकामांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी उलवेमध्ये ५१०० रुपये प्रतिचौरस फूट दराने घरांची विक्री होत होती. रेल्वेमुळे हा दर ७ हजार रुपयांवर गेला आहे. १७८२ कोटींचा प्रकल्पनवी मुंबई ते उरण या रेल्वे प्रकल्पासाठी १७८२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २७ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाचा ६७ टक्के खर्च सिडको व ३३ टक्के खर्च मध्य रेल्वे करणार आहे. या मार्गावर एकूण १० रेल्वे स्टेशन असणार आहेत. पूर्ण मार्गावर ४ मोठे पूल आहेत. ७८ छोटे पूल व १५ भुयारी मार्ग असणार आहेत. पहिला टप्पासीवूड ते खारकोपर व सीबीडी ते खारकोपर दरम्यान १२ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर सीवूड, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर ही रेल्वे स्टेशन असणार आहेत. २०१९ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम दुसरा टप्पा १० किलोमीटरचा असणार आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी-उरण या स्टेशनचे बांधकाम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेएनपीटीसह विमानतळ परिसराचा विकास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी उरण रेल्वेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन टप्प्यामध्ये रेल्वे मार्गाचे काम केले जात असून पहिल्या टप्प्याची उभारणी सिडकोने केली आहे. दुसºया टप्प्याचे काम रेल्वे प्रशासन करत असून  ते कामही गतीने सुरू आहे. उरण मार्गावर रेल्वे सुरू झाल्यामुळे विमानतळ परिसर व जेएनपीटी परिसरातील विकासाला गती येणार आहे. या परिसरातील विकास यापुढे अधिक वेगाने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे उलवे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बस किंवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत होते. रेल्वेमुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. जेएनपीटी मार्गावरील ताण कमी होऊन वाहतूककोंडीही कमी होईल.     - प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवे  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड