शहरं
Join us  
Trending Stories
1
"राष्ट्रहिताच्या रक्षणासाठी आम्ही..."; ५० टक्के टॅरिफनंतर भारताचे डोनाल्ड ट्रम्प यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी टाकला 'टॅरिफ' बॉम्ब! भारतावर लादला तब्बल ५० टक्के कर, आदेशावर केली स्वाक्षरी
3
'पंतप्रधानांना महादेवाची प्रतिमा भेट दिली, कारण...'; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मोदींच्या भेटीनंतर काय बोलले?
4
कोल्हापुरकरांसाठी आनंदाची बातमी! वनताराच्या सीईओंनी केली मोठी घोषणा; महास्वामीही म्हणाले, अंबानींच्या भूमिकेला....
5
बापाचा दारु प्यायल्यामुळे मृत्यू, बारचालकांचा बदला घेण्यासाठी मुलगा बनला चोर; सगळं प्रकरण ऐकून पोलिसही चक्रावले
6
उद्धव ठाकरे-राज ठाकरेंची युती झाली! मुंबई पालिकेआधी 'या' निवडणुका एकत्र लढवणार...
7
Ankita Lokhande: मुंबई पोलिसांचे आभार... 'त्या' दोन बेपत्ता मुली सुखरूप; अंकिता लोखंडेने दिली माहिती
8
Mumbai Rape: प्रशिक्षणाच्या नावाखाली १३ वर्षाच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, क्रिकेट प्रशिक्षकाला अटक
9
यंदा चिंचपोकळीच्या ‘चिंतामणी’चं आगमन कधी? गणेशभक्तांनो 'ही' तारीख ठेवा लक्षात!
10
डोनाल्ड ट्रम्प यांनी केली उत्तराधिकाऱ्याची घोषणा, जाहीर केलं या नेत्याचं नाव    
11
संघाचा शतकमहोत्सव थाटात साजरा होणार, कार्यक्रमांची रेलचेल, देशोदेशीच्या दूतावासांना निमंत्रण, पण...
12
Dharali Cloud Burst: उरले फक्त दगड आणि गाळ! ढगफुटीनंतरचा धरालीतील पहिला ड्रोन व्हिडीओ
13
Vaishnavi Patil : छोरियां छोरों से कम नहीं! कल्याणच्या ढाबा चालकाच्या लेकीची कुस्तीत मोठी झेप, दिग्गजांना केलं चितपट
14
मुंबईत भरणार 'क्रीडा महाकुंभ'! लेझीम, फुगडीसह शिवकालीन पारंपरिक खेळांना मिळणार पुनर्वैभव
15
गलवानमधील संघर्षानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी पहिल्यांदाच चीनच्या दौऱ्यावर जाणार, एससीओ संमेलनात सहभागी होणार
16
मोबाईलमध्ये नको ते व्हिडिओ सापडले, भीतीपोटी पतीला मारले; जीव वाचवण्यासाठी प्रियकराला अडकवले, पण...
17
विकेटची गॅरेंटी देणारा बुमराहच ठरतोय टीम इंडियासाठी 'पनौती'? भयावह आकडेवारीवर सचिन तेंडुलकर म्हणाला...
18
निर्वस्त्र करुन मारहाण, एक्स गर्लफ्रेंडसोबत संबंध; मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीने संपवले आयुष्य
19
मोहम्मद सिराजचा मोठा पराक्रम, गोलंदाज असूनही मोडला धोनीचा रेकॉर्ड!
20
कधी भूस्खलन तर कधी ढगफुटी; नैसर्गिक की मानवी चूक? उत्तराखंड विनाशाच्या वाटेवर...

रेल्वे सेवेमुळे उरणच्या विकासाला गतीे,  वाहतूककोंडी कमी होणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2018 03:57 IST

उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत.

नामदेव मोरे  नवी मुंबई -  उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्याचे रविवारी उद्घाटन होत आहे. रेल्वे वाहतुकीमुळे तालुक्याच्या विकासाला गती येणार आहे. जेएनपीटी मार्गावरील वाहतूककोंडी काही प्रमाणात कमी होणार असून बांधकाम  व्यवसायाला सुगीचे दिवस येणार आहेत. उलवेसह परिसरातील घरांच्या किमतीमध्येही वाढ होण्याची शक्यता असून नागरिकांची गैरसोय दूर होणार आहे. शासनाने १९८९ मध्ये जेएनपीटी बंदर सुरू केले. जवळपास तीन दशकांच्या वाटचालीमध्ये देशातील प्रमुख बंदर म्हणून जेएनपीटीचा नावलौकिक झाला आहे. येथील रोजगारामध्ये वाढ झाली असली तरी वाहतुकीची साधने नसल्यामुळे या परिसराचा विकास आवश्यक गतीने होवू शकला नाही. या मार्गावरील प्रचंड वाहतूककोंडीमुळे प्रवाशांची मोठ्याप्रमाणात गैरसोय होवू लागली होती. कोंडी सोडविण्यासाठी उरण रेल्वे प्रकल्पाची मागणी होवू लागली होती. शासनाने १९९७ मध्येच या मार्गावर रेल्वे सेवा सुरू करण्यासाठीचा निर्णय घेतला होता. त्यासाठी ४९५ कोटी रुपये खर्च होणार होते, परंतु विविध कारणांनी हा प्रकल्प रखडत गेला व खर्चाचा आकडा तब्बल १७८२ कोटींवर पोहचला. जमीन संपादन व वनविभागाच्या अडथळ्यामुळे निर्धारित वेळेत हा प्रकल्प पूर्ण होवू शकला नव्हता. सर्व अडचणींवर मात करून पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले असून ११ नोव्हेंबरला प्रत्यक्ष रेल्वे सेवा सुरू होणार आहे. यामुळे उरणवासीयांचे २० वर्षांचे स्वप्न साकार होणार आहे. सिडकोने विकसित केलेल्या उलवे नोडमधील सेक्टर २, ३, ९, १९, २०, २१, २२ व २३ मध्ये नागरिक वास्तव्यासाठी गेले आहेत. रेल्वे सेवा नसल्यामुळे या नागरिकांची प्रचंड गैरसोय होवू लागली होती. रिक्षा, एनएमएमटी बस, एसटी व खासगी वाहतुकीवर या परिसरातील नागरिकांना विसंबून राहावे लागत होते. गैरसोयीमुळे अनेकांनी घरे विकत घेवूनही तेथे वास्तव्यास जाण्याचे टाळले होते. रेल्वे सुविधेमुळे या सर्वांची गैरसोय दूर होणार आहे. उरण रेल्वेच्या पहिल्या टप्प्यामुळे विमानतळ परिसर व संपूर्ण उरण तालुक्यामध्ये बांधकाम व्यवसायाला गती येणार आहे. उलवे नोडमधील सर्व सेक्टरचे बांधकाम वेगाने होणार आहे. याशिवाय उरणपर्यंतच्या सर्व रेल्वे स्टेशन परिसरातील कामांना गती येणार आहे. बांधकामांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. दोन वर्षापूर्वी उलवेमध्ये ५१०० रुपये प्रतिचौरस फूट दराने घरांची विक्री होत होती. रेल्वेमुळे हा दर ७ हजार रुपयांवर गेला आहे. १७८२ कोटींचा प्रकल्पनवी मुंबई ते उरण या रेल्वे प्रकल्पासाठी १७८२ कोटी रुपये खर्च होणार आहेत. २७ किलोमीटर लांबीच्या रेल्वे प्रकल्पाचा ६७ टक्के खर्च सिडको व ३३ टक्के खर्च मध्य रेल्वे करणार आहे. या मार्गावर एकूण १० रेल्वे स्टेशन असणार आहेत. पूर्ण मार्गावर ४ मोठे पूल आहेत. ७८ छोटे पूल व १५ भुयारी मार्ग असणार आहेत. पहिला टप्पासीवूड ते खारकोपर व सीबीडी ते खारकोपर दरम्यान १२ किलोमीटरचा पहिला टप्पा आहे. या मार्गावर सीवूड, तरघर, बामणडोंगरी, खारकोपर ही रेल्वे स्टेशन असणार आहेत. २०१९ पर्यंत दुसऱ्या टप्प्याचे काम दुसरा टप्पा १० किलोमीटरचा असणार आहे. मध्य रेल्वेने या मार्गावरील गव्हाण, रांजणपाडा, न्हावा शेवा, द्रोणागिरी-उरण या स्टेशनचे बांधकाम सुरू केले आहे. डिसेंबर २०१९ पर्यंत या टप्प्याचे काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. जेएनपीटीसह विमानतळ परिसराचा विकास सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी उरण रेल्वेविषयी माहिती देताना सांगितले की, दोन टप्प्यामध्ये रेल्वे मार्गाचे काम केले जात असून पहिल्या टप्प्याची उभारणी सिडकोने केली आहे. दुसºया टप्प्याचे काम रेल्वे प्रशासन करत असून  ते कामही गतीने सुरू आहे. उरण मार्गावर रेल्वे सुरू झाल्यामुळे विमानतळ परिसर व जेएनपीटी परिसरातील विकासाला गती येणार आहे. या परिसरातील विकास यापुढे अधिक वेगाने होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.रेल्वे सेवा सुरू झाल्यामुळे उलवे परिसरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे. बस किंवा रिक्षावर अवलंबून राहावे लागत होते. रेल्वेमुळे वाहतूक सुरळीत होणार आहे. जेएनपीटी मार्गावरील ताण कमी होऊन वाहतूककोंडीही कमी होईल.     - प्रकाश गोगावले, रहिवासी, उलवे  

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईRaigadरायगड