शहरं
Join us  
Trending Stories
1
पटनायक सरकारची 'एक्सपायरी डेट' 4 जून; पहिल्याच रॅलीत संकटमोचकावरच PM मोदींचा हल्लाबोल
2
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
3
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार
4
Amit Shah : "दीदींनी 5 वर्षे प्रचार केला तरी..."; अमित शाह यांनी ममता बॅनर्जींना दिलं जाहीर आव्हान
5
बिहार: २७ वर्षीय महिलेने एकाच वेळी ५ मुलींना दिला जन्म; डॉक्टरही अवाक्, सर्वजण सुखरूप
6
Mumbai Indians च्या खांद्यावर आठ संघांचा भार! SRH विरुद्धच्या लढतीत सर्वांना हवेत MI चे उपकार
7
“भारताचे परराष्ट्र धोरण अपयशी ठरलेय, अनेक देशांशी संबंध बिघडलेत”; प्रकाश आंबेडकरांची टीका
8
मतदानाच्या आदल्या दिवशी बारामती मतदारसंघाबाबत सुप्रिया सुळेंची निवडणूक आयोगाकडे मोठी मागणी
9
Preity Zinta powerhouse of talent, Mumbai Indians: मुंबई इंडियन्सचा 'हा' खेळाडू म्हणजे 'टॅलेंटचं पॉवरहाऊस'; प्रिती झिंटाकडून क्रिकेटरचं तोंडभरून कौतुक
10
मोदींकडून सद्भावना, उद्धव ठाकरेंसोबत भाजपाची पुन्हा युती होणार? देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
11
BANW vs INDW: ३३ व्या वर्षी भारतीय संघात पदार्पण; खेळाडूंनी केला एकच जल्लोष, यजमानांची अस्तित्वाची लढाई
12
'राम मंदिराचा निर्णय बदलणार...'; आचार्य प्रमोद कृष्णम यांचा मोठा दावा, काँग्रेसनं शाहबानो प्रकरणाप्रमाणे प्लॅन आखला!
13
"असं असेल तर MS Dhoni ने खेळूच नये..."; Harbhajan Singh भडकला, CSK vs PBKS सामन्यानंतर व्यक्त केला संताप
14
नरेश गोयल यांना २ महिन्यांचा जामीन, मुंबईबाहेर जाण्यासाठीही घ्यावी लागणार परवानगी
15
भाजपाला मोठा दिलासा, दिंडोरीमध्ये बंडखोर माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी घेतली माघार
16
पाकिस्तानची फजिती! मोहम्मद आमिर आयर्लंड दौऱ्यावर वेळेत जाणार नाही, कारण...
17
"भाजपा आता लाठ्याकाठ्यांनी तोडफोड करायला उतरलीय, अत्यंत निंदनीय आणि लज्जास्पद"
18
LSG ने काल १३ खेळाडू खेळवले! KKR लाही कसे नाही समजले? वाचा नेमके असे काय घडले  
19
माता न तू वैरिणी; नवऱ्यासोबत भांडणाचा राग, चिमुकल्याला मगरींनी भरलेल्या नदीत फेकले...
20
Eknath Shinde : धर्मवीर चित्रपटात राजन विचारेंबाबत दाखवलेलं सर्व खोटं, विचारे नकली शिष्य; एकनाथ शिंदेंनी सगळंच सांगितलं

बंद कारखान्यांमुळे औद्योगिक सुरक्षा धोक्यात, एमआयडीसीची झाली धर्मशाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 31, 2017 5:07 AM

ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना घरघर लागली आहे. ७०० ते ८०० उद्योग बंद पडले आहेत. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये भंगार दुकानदारांसह इतर उद्योग करणाºयांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे.

- नामदेव मोरेनवी मुंबई : ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमधील कारखान्यांना घरघर लागली आहे. ७०० ते ८०० उद्योग बंद पडले आहेत. बंद पडलेल्या कारखान्यांमध्ये भंगार दुकानदारांसह इतर उद्योग करणाºयांनी अतिक्रमण करण्यास सुरवात केली आहे. एमआयडीसीची धर्मशाळा झाली असून, त्याठिकाणी घातपाती कारवाया करणारेही आश्रय घेण्याची भीती व्यक्त केली जात आहे.महाराष्ट्रातील प्रमुख औद्योगिक वसाहतीमध्ये ठाणे बेलापूर एमआयडीसीचा समावेश होतो. जेएनपीटी बंदर, मुंबई - पुणे व गोवा महामार्ग जवळ असल्यामुळे याठिकाणी अनेक नामांकित उद्योजकांनी युनिट सुरू केले आहेत. यामध्ये अनिल अंबानी व मुकेश अंबानी यांच्या कंपन्यांचाही समावेश आहे. पूर्वी सर्वात मोठा केमिकल झोन या परिसरामध्ये होता. परंतु गत दहा वर्षांमध्ये हार्डेलियापासून सविता केमिकलपर्यंत अनेक महत्त्वाच्या कंपन्या बंद पडल्या. हजारो कामगार बेरोजगार झाले. केमिकल उद्योगांना घरघर लागलीच त्याबरोबर इतरही अनेक उद्योग विविध कारणांनी बंद पडत गेले. यापूर्वी महापालिकेच्या पर्यावरण अहवालामध्ये ६० टक्के उद्योग बंद असल्याची माहिती देण्यात आली होती. पालिकेची टक्केवारी खोटी असली तरी प्रत्यक्षात जवळपास १५ टक्के कारखाने बंद पडले आहेत. बंद कारखान्यांची संख्या ७०० ते ८०० च्या दरम्यान आहे. बंद उद्योग ही एमआयडीसी व नवी मुंबईसाठीही डोकेदुखी ठरू लागले आहे. शहरात भंगार माफियांनी धुमाकूळ सुरू केला आहे. कारखान्यांमधील लोखंड व इतर भंगार चोरणाºया टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. याशिवाय बंद कंपनीच्या प्रवेशद्वाराचे व आतमधील गेटचे टाळे तोडून त्या ठिकाणी मोठ्याप्रमाणात अतिक्रमण करण्यात येत असून हे अतिक्रमण रोखण्याचे आव्हान सुरक्षा व्यवस्थेसमोर उभे राहिले आहे.बंद कंपन्यांचे खंडरात रूपांतर झाले असून त्यांना धर्मशाळेचे स्वरूप प्राप्त झाले आहे. बोनसरी परिसरामधील तीन कंपन्यांमध्ये भंगाराचे गोडावून सुरू केले आहे. भंगार दुकानदारांनी याठिकाणी अतिक्रमण केले असल्याची शक्यता आहे. कारखान्यांच्या जागेवर अशाप्रकारे इतर उद्योग सुरू करता येत नाही याची माहिती असतानाही कोणीच याविषयी आवाज उठवत नाही. काही बंद कारखान्यांचा गोडावून म्हणून उपयोग केला जात आहे. वाटाणा व इतर कडधान्य पॅकिंग करण्यापासून कृषी व इतर उद्योगांची साठवणूक करण्यासाठी कारखान्यांचा उपयोग सुरू आहे. तुर्भेमधील एका कंपनीमध्ये चक्क शेळीपालन केले जात होते. त्या ठिकाणी आता लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. गणेश मंदिराजवळील पूर्वीच्या पी.जी. केमिकल कंपनीच्या जागेवर चक्क खानावळ सुरू करण्यात आली आहे. बंद कंपन्यांच्या सुरक्षेसाठी काहीही व्यवस्था नसून अशीच स्थिती राहिली तर भविष्यात अतिरेकीही या कंपन्यांमध्ये वास्तव्य करण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पोलीस, महापालिका व एमआयडीसी प्रशासनही याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत आहेत.

एमआयडीसीतील वास्तव- शिरवणेजवळील बोनसरीमधील कंपन्यांचा भंगार गोडावूनप्रमाणे वापर- तुर्भे एमआयडीसी पोलीस स्टेशनजवळील एका कंपनीमध्ये लॉजिंग बोर्डिंग सुरू करण्याच्या हालचाली- माझ्डा कंपनीसमोरील बंद कारखान्यामध्ये वाटाणा व इतर कृषी मालाची पॅकिंग सुरू- प्लॉट नंबर डी ६५ मधील पी.जी. केमिकलमध्ये अनधिकृतपणे खानावळ सुरू- रेश्मा डार्इंग कंपनी डी ५२ चा इमारतीचा वेअर हाऊसप्रमाणे वापर- सनार्बे मयूर कोल्ड स्टोरेजसमोरील कंपनीच्या जागेवर झोपड्यांचे बांधकाम- भूखंड क्रमांक ३७६ श्रीमान कंपनीही बंद पडली आहे.- बावखळेश्वर मंदिराजवळील तीन कंपन्या बंद पडल्या आहेत.- बंद कंपन्यांमध्ये जुगारी व गर्दुल्ल्यांचा अड्डा- घातपाती व अतिरेकी कारवाया करणारे आश्रय घेण्याची भीतीभंगार माफियांचा धुमाकूळबंद कारखान्यांच्या सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना नाही. परिणामी या कंपन्यांमधील भंगार चोरण्यासाठी अनेक टोळ्या सक्रिय झाल्या आहेत. रात्री बिनधास्त कारखान्यांमध्ये शिरून आतमधील लोखंडी साहित्य चोरी करून नेले जात आहे. यापूर्वी अशाच भंगार माफियांच्या हल्ल्यामध्ये हवालदार गोपाळ सैंदाने शहीद झाले होते. यानंतरही पोलीस प्रशासनाने भंगार व्यवसाय करणाºयांवर ठोस कारवाई केलेली नाही.भूखंड परत ताब्यात घ्यावेएमआयडीसीमधील अनेक कारखाने वर्षानुवर्षे बंद आहेत. शासनाने बंद असलेले कारखाने सुरू करण्यासाठी संबंधितांना प्रोत्साहित करावे व त्यानंतरही कारखाने सुरू होणार नसतील तर ते भूखंड ताब्यात घेवून त्यांची इतरांना विक्री करावी अशी मागणीही केली जात आहे.शक्ती मिलप्रमाणे घटनेची भीतीमुंबईतील बंद पडलेल्या शक्ती मिल कंपनीमध्ये महिलेवर अत्याचार झाल्याची घटना घडली होती. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीमध्येही अनेक कंपन्या बंद असून तेथे गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांनी आश्रय घेतला आहे. सुरक्षेविषयी ठोस उपाययोजना झाल्या नाहीत तर भविष्यात एखादी दुर्घटना घडू शकते अशी भीतीही परिसरातील नागरिकांनी व्यक्त केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई