शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
4
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
5
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
6
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
7
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
8
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
9
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
10
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
11
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
12
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
13
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
14
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
15
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
16
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
17
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
18
नाशिक: मुलासोबत ट्रेकिंगला गेले अन् पांडव लेणीच्या डोंगरावर अडकले; नंतर...
19
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
20
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!

राज्यातील दुष्काळाचा शहरवासीयांना विसर, वाहने धुण्यासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 00:05 IST

राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे.

नवी मुंबई : राज्यातील विविध जिल्हे आणि तालुके दुष्काळाने होरपळून निघाले आहेत. हंडाभर पाण्यासाठी महिलांना वणवण भटकंती करावी लागत आहे. मात्र मुबलक पाणीसाठा असलेल्या नवी मुंबईत पाण्याची वारेमाप उधळपट्टी सुरू आहे. अनेक ठिकाणी गळक्या जलवाहिनीतून पाण्याचा अपव्यय होत आहे. उद्याने आणि वाहने धुण्यासाठी शेकडो लीटर पाणी खर्ची घातले जात आहे. यासंदर्भात प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होताना दिसत नाही.मान्सूनला आणखी एक ते दीड महिन्याचा अवकाश आहे. त्याअगोदरच राज्यात भयावह दुष्काळ पसरला आहे. विशेषत: मराठवाड्यात गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. पिण्याच्या पाण्यासह गुरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. दुष्काळग्रस्तांना मदत करण्यासाठी अनेक सामाजिक संस्था पुढे सरसावल्या आहेत. राज्य सरकारनेही मदतीचा हात दिला आहे. विविध राजकीय पक्षांचे नेते दुष्काळग्रस्त विभागाचा दौरा काढून तेथील लोकांचे सांत्वन करीत आहेत.स्वत:च्या मालकीचे धरण असलेली नवी मुंबई ही राज्यातील दुसरी महापालिका आहे. खालापूर तालुक्यातील स्वमालकीच्या मोरबे धरणातून महापालिका शहरवासीयांना चोवीस तास पाणीपुरवठा करते. गेल्या वर्षी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात पुरेसा पाऊस पडला. त्यामुळे धरण ओव्हरफ्लो झाल्याने ७00 दशलक्ष पाण्याचा विसर्ग करावा लागला होता. असे असतानाही यावर्षी धरणातील पाण्याची पातळी खालावल्याचे दिसून आले आहे. मोरबे धरणाची पातळी ८८ मीटर इतकी आहे. म्हणजेच ८८ मीटर पातळी गाठल्यानंतर धरणात १९0.८९ दशलक्ष घनमीटर पाणीसाठा होतो. एप्रिलमध्ये या धरणात ९४.३७ दशलक्ष घनमीटर इतका पाणीसाठा शिल्लक होता. हा जलसाठा साधारण १५ आॅगस्टपर्यंत पुरेल, असे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. असे असले तरी राज्यात सुरू असलेल्या पाणीबाणीच्या पार्श्वभूमीवर पाण्याचा अपव्यय टाळण्यासाठी महापालिकेकडून कठोर उपाययोजना करण्याची गरज निर्माण झाली आहे. नवी मुंबई हे कॉस्मोपॉलिटीन शहर आहे. या शहरात विविध प्रांतासह महाराष्ट्राच्या कानाकोपºयातून आलेले लोक राहतात. शहरात मुबलक पाणी मिळत असले तरी आपल्या मूळ गावी निर्माण झालेल्या दुष्काळजन्य परिस्थिती लक्षात घेऊन पाण्याचा जपून वापर करायला हवा, असे जाणकारांचे मत आहे. दरम्यान, शहरातील एमआयडीसी परिसरातील झोपडपट्ट्यांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. त्याचप्रमाणे काही सिडको वसाहतीत सुद्धा अपुरा पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. मात्र ज्या विभागात अखंडित पाणीपुरवठा होत आहे, तेथे पाण्याची वारेमाप उधळपट्टी होताना दिसत आहे. नळाला पाइप लावून बिनधास्तपणे वाहने धुतली जात आहेत, तर काही ठिकाणी उद्यानासाठी पिण्याच्या पाण्याचा वापर केला जात असल्याचे दिसून आले आहे. छतावरील पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहतानाचे दृश्य ठिकठिकाणी पाहावयास मिळत आहे. एमआयडीसी परिसरात गळक्या जलवाहिन्यांतून आजही मोठ्या प्रमाणात शेकडो लीटर पाणी वाहून जात आहे. यासंदर्भात तातडीने उपाययोजना करण्याची गरज आहे.दिवसाला ३२७ एमएलडी पाणीमहापालिका मोरबे धरणासह उपलब्ध विविध स्रोतांच्या माध्यमातून दिवसाला एकूण ३२७ एमएलडी इतका पाणीपुरवठा करते. यात स्वत:च्या मोरबे धरणातून दिवसाला २१0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते, तर एमआयडीसीकडून मिळणाºया ६0 एमएलडी पाण्याचा गावठाण आणि झोपडपट्ट्यांना पुरवठा केला जातो. सिडकोच्या हेटवणे धरणातून ३0 एमएलडी इतके पाणी घेतले जाते.सिडको नोड्सनाही पाणीपुरवठामोरबे धरणासह एमआयडीसी आणि सिडकोकडून महापालिकेच्या जलकुंभात दिवसाला ३२७ एमएलडी इतका पाणीसाठा होतो. यापैकी खारघर, कळंबोली व कामोठे या सिडको नोड्सना महापालिका पाणीपुरवठा करते. तर जलकुंभातील जवळपास २७0 एमएलडी इतके पाणी उपनगरांना पुरविले जाते.

टॅग्स :Waterपाणी