शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
एपस्टीन फाईल्समधून ट्रम्प यांचं नाव गायब; माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांचे अनेक फोटो समोर
3
₹८१ वरुन ₹३ च्या खाली आलेला 'हा' शेअर; आता अचानक मोठी तेजी, कंपनीला मिळाली गूड न्यूज
4
संजूची डोळ्यांचं पारणं फेडणारी फटकेबाजी! थेट कॉमेंट्री बॉक्समधून शास्त्रींचा आगरकर-गंभीर जोडीला सवाल (VIDEO)
5
२०४७ चं स्वप्न आणि कटू सत्य, आकडेवारी भारतासोबत नाही; RBI च्या माजी गव्हर्नरांनी उपस्थित केले प्रश्न
6
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
7
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
8
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
9
"त्यांची समजूत घालायला २ वर्ष लागली...", सोनाक्षी-जहीरच्या नात्याबद्दल पूनम सिन्हांचा खुलासा
10
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
11
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
12
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
13
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
14
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
15
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
16
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
17
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
18
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
19
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
20
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्तांना नवी मुंबईतील रात्रनिवारा केंद्रांचाही लाभ नाही

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 07:15 IST

विदर्भामधून दुष्काळग्रस्त मोठ्या प्रमाणात नवी मुंबई व मुंबईमध्ये येत आहेत. राहण्याची सोय नसल्यामुळे उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडावर आश्रय घेत आहेत.

- नामदेव मोरेनवी मुंबई : विदर्भामधून दुष्काळग्रस्त मोठ्या प्रमाणात नवी मुंबई व मुंबईमध्ये येत आहेत. राहण्याची सोय नसल्यामुळे उड्डाणपूल व मोकळ्या भूखंडावर आश्रय घेत आहेत. महापालिकेच्या रात्रनिवारा केंद्राचाही त्यांना लाभ होत नाही. उच्च न्यायालयाच्या आदेशाप्रमाणे शहरात किमान ११ निवारा केंद्रे उभारणे आवश्यक आहे. पण सद्यस्थितीमध्ये एकच केंद्र असून तेही दुष्काळग्रस्तांसाठी गैरसोयीचे ठरत आहे.वाशिम, यवतमाळ व राज्यातील विविध जिल्ह्यांमधून दुष्काळग्रस्त नागरिक रोजगारासाठी मुंबईमध्ये येऊ लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये नवी मुंबईमधील नेरूळ, सानपाडा व इतर विभागामध्ये हजारो नागरिक दाखल झाले आहेत. उड्डाणपुलाखाली, रेल्वे स्टेशन परिसर व इतर ठिकाणी जागा मिळेल तेथे शेतकरी व शेतमजुरांनी आश्रय घेतला आहे. रात्री या ठिकाणी मुक्काम करायचा व दिवसा नाक्यावर जाऊन काम शोधायचे असा सर्वांचा दिनक्रम आहे. सानपाडा पुलाखाली आश्रय घेतलेले नागरिक स्वयंपाक येथे करतात व झोपण्यासाठी जवळच्या पादचारी पुलाचा आधार घेत आहेत.वास्तविक महानगरांमध्ये आलेल्या बेघर नागरिकांसाठी महानगरपालिकांनी रात्र निवारा केंद्र सुरू करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिले आहेत. एक लाख लोकसंख्या असलेल्या परिसरामध्ये एक केंद्र उभारणे बंधनकारक आहे. नवी मुंबईची २०११ च्या जनगणनेप्रमाणे ११ लाख लोकसंख्या आहे. सद्यस्थितीमध्ये लोकसंख्या १५ लाखपेक्षा जास्त झाली असल्याचा अंदाज आहे. यामुळे शहरामध्ये ११ ते १५ रात्र निवारा केंद्रे उभारणे आवश्यक आहे.सद्यस्थितीत बेलापूरमधील जुन्या विभाग कार्यालयाच्या जागेमध्ये फक्त एकच केंद्र कार्यरत आहे. येथे ८० नागरिकांना आश्रय घेता येईल एवढी क्षमता आहे. पण २० ते २५ जणांनाच त्याचा लाभ होत आहे. पालिकेचे कर्मचारी बेघरांशी संवाद साधून त्यांना याविषयी माहिती देत आहेत. सिग्नलवर काम करणाऱ्यांना या केंद्रामध्ये घेऊन येण्याचा प्रयत्न करत आहेत, पण त्याला अपेक्षित यश आलेले नाही.दुष्काळग्रस्त नागरिकांना या केंद्राची पुरेशी माहिती नाही. याशिवाय केंद्रापासून रोजगाराचे ठिकाणी असलेले नाके दूर अंतरावर आहेत. नेरूळ, सानपाडा, तुर्भे रेल्वे स्टेशनच्या जवळ निवारा केंद्र असते तर त्याचा लाभ दुष्काळग्रस्तांनाही झाला असता. सद्यस्थितीमध्ये पुलाखाली व इतर ठिकाणी मुक्काम करण्यावाचून दुसरा पर्याय नसून त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाने अतिक्रमण समजून त्रास देऊ नये अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.बेलापूरमध्ये महानगरपालिकेने रात्रनिवारा केंद्र सुरू केले आहे. येथे ८० बेघरांना आश्रय घेता येऊ शकतो. जास्तीत जास्त नागरिकांनी या केंद्राचा लाभ घ्यावा यासाठी आमचा प्रयत्न सुरू आहे. दुष्काळग्रस्त नागरिकांना केंद्रात प्रवेश हवा असेल तर त्यांनी संपर्क साधावा. शहरात अजून दोन केंद्रांचे काम सुरू आहे.- अमोल यादव, उपआयुक्त समाजविकास, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई