शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात दुष्काळामुळे स्थिती गंभीर: शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ७ महत्त्वाच्या मागण्या!
2
पुणे पोर्शे कार अपघात: फडणवीसांनी विरोधकांना सुनावले, “प्रत्येक गोष्टीत राजकारण योग्य नाही”
3
निवडणूक संपताच शिंदे गटात वादाचे फटाके; "गजानन किर्तीकरांवर कारवाई झाली तर..."
4
चालताना नेमकं काय लक्षात ठेवायचं... वेळ, पावलं की अंतर?; वजन लवकर होईल कमी
5
लैला खान हत्या प्रकरणात सावत्र वडिलांना फाशीची शिक्षा, १३ वर्षांनी अभिनेत्रीला मिळाला न्याय
6
विधान परिषदेच्या निवडणुकीची नवी तारीख जाहीर; शिक्षक, पदवीधर मतदारसंघांसाठी या दिवशी मतदान
7
"सांगली जिल्हाप्रमुखाचं विधान उबाठाला मार्ग दाखवणारं, जर..."; संजय शिरसाटांचा निशाणा
8
१ वर ३ फ्री शेअर देतेय ही एनर्जी कंपनी, रेकॉर्ड डेट दरम्यान शेअरवर गुंतवणूकदारांच्या उड्या
9
"ब्राह्मण-बनिया समाजातही गरीब लोक, त्यांना आरक्षण मिळू नये का?" मोदींचा काँग्रेसवर घणाघात
10
“याचिकेची वेळ चुकली, आता निवडणुका झाल्यावर सुनावणी”; सुप्रीम कोर्टाचा दिलासा देण्यास नकार
11
Inflation Calculator: २० आणि २५ वर्षांनंतर किती असेल १ कोटी रुपयांचं मूल्य? गणित समूजन करा गुंतवणुकीचं प्लॅनिंग
12
कडक उन्हातून घरी आल्यावर किती वेळानंतर पाणी प्यावं?; जाणून घ्या हेल्थ एक्सपर्टचा सल्ला
13
Narendra Modi : "काँग्रेसच्या काळात पाकिस्तान डोक्यावर नाचायचा, आज त्याची काय अवस्था..."; मोदी कडाडले
14
IPL 2024: दिनेश कार्तिक पाठोपाठ टीम इंडियाच्या आणखी एका स्टार खेळाडूचे निवृत्तीचे संकेत
15
Rituals: मंदिरात घंटा का बांधतात? नवस फेडण्यासाठीही घंटेचा वापर का केला जातो ते जाणून घ्या!
16
प्रिटी वुमन! प्रिती झिंटानेही Cannes मध्ये लावली हजेरी, व्हाईट आऊटफिटमध्ये दिसली परी!
17
कोण कोणाला वाचवतेय! बाळाला पोर्शे कारची चावी कोणी दिली? बिल्डर बाप अन् आजोबा दोघेही म्हणतायत 'मी-मी'
18
"जिथं स्फोट झाला तिथे बॉयलर नव्हताच..."; डोंबिवलीतील स्फोटामागचं खरं कारण काय?
19
अशोक सराफ आणि रोहिणी हट्टंगडी यांना मराठी नाट्य परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार जाहीर
20
“लोकसभा निवडणूक ग्रामपंचायतसारखी केली, PM मोदींनी लक्ष्मणरेषा ओलांडली”: प्रकाश आंबेडकर

पाण्याअभावी उड्डाणपुलावरील झाडे सुकली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2019 11:19 PM

लाखो रु पयांचे नुकसान: कुंड्यातील रोपेही झाली गायब; प्रशासनाचे दुर्लक्ष

पनवेल : नवीन पनवेल ते खांदा वसाहत शहराला जोडणारा उड्डाणपूल बांधण्यासाठी सिडकोने लाखो रुपये खर्च केले. त्यामुळे तासनतास रेल्वेच्या बंद फाटकाजवळ थांबणाऱ्या वाहनचालकांना दिलासा मिळाला. वाहतूककोंडी देखील कमी झाली. मात्र या उड्डाणपुलावरील दुभाजकावर लावलेल्या झाडांकडे सिडकोचे दुर्लक्ष झाले आहे. या पुलावरील सर्व झाडे सुकली आहेत, तर कुंड्यामधील रोपेसुद्धा गायब झाल्याचे दिसून आले आहे.

नवीन पनवेल ते खांदा वसाहतीला जोडणाºया उड्डाणपुलावर सिडकोने काही वर्षांपूर्वी झाडे लावली होती. त्यासाठी एका ठेकेदाराला ठेका दिला होता, मात्र त्या ठेकेदाराने झाडांकडे व्यवस्थित लक्ष न दिल्यामुळे झाडे उन्हात करपून मेली आहेत. काही झाडांना पाणी न घातल्यामुळे येथील झाडे सुकून गेली आहेत. त्यामुळे सिडकोचा भोंगळ कारभार समोर आला आहे. त्यानंतर सिडकोने पुन्हा या उड्डाणपुलावर कुंड्यात रोपे लावली आहेत. त्यासाठी लाखो रु पये या झाडांवर खर्च केले आहेत. मात्र यापूर्वीची लावलेली झाडे जगवता आली नाहीत तर या कुंड्यातील झाडे कशी जगतील, असा सवाल रहिवाशांकडून होत आहे.

उड्डाणपुलावर झाडे जगवा, वृक्षवल्ली आम्हा सोयरे अशा आशयाचे फलक लावण्यात आले आहेत, परंतु मागील काही दिवसांपासून हे फलक सुध्दा गायब झाले आहेत. त्याचप्रमाणे उड्डाणपुलाच्या दुभाजकावर लावलेल्या कुंड्यांमधील रोपट्यांसह मोठी झाडेही उन्मळून पडली आहेत तर कही करपून गेली आहेत. वेळोवेळी काळजी न घेतली गेल्याने ही झाडे सुकून गेली आहेत. असे असतानाही पुन्हा लाखो रुपये खर्च करून नवीन झाडे लावली जात असल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे.