शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

डोंबिवलीकरांनो, तुमची रिक्षा पेटू शकते

By admin | Updated: January 8, 2016 02:05 IST

कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती

आकाश गायकवाड, डोंबिवली कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर केला जात आहे.कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कल्याण-डोंबिवलीतील रिक्षांची अचानक करण्यात येणारी तपासणी गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्याने हे प्रकार वाढल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या रिक्षांमध्ये एलपीजी लीडर किटद्वारे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. इंधनापेक्षा घरगुती गॅसवरील ही रिक्षा चांगली कमाई करून देते. याशिवाय, इंधन जास्त लागत नाही. ठरावीक गॅस एजन्सीचालकांना हाताशी धरून रिक्षामध्ये गॅस भरण्याचे उद्योग काही रिक्षाचालक करीत आहेत. प्रवाशांना गॅस चेंबरवर बसवून हे रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारे चालक हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. रिक्षातील गॅस संपला की, शहराबाहेरील एखाद्या झुडुपाच्या मागे अथवा आडोशाच्या ठिकाणी जायचे. तिथे सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये खाली करायचा. पुन्हा रिकामे सिलिंडर गॅस एजन्सीच्या माणसाला नेऊन द्यायचे, अशी पद्धत अवलंबण्यात येते. ६५० रु पयांच्या एका घरगुती गॅस सिलिंडरकरिता ९०० ते १००० रुपये या ब्लॅकच्या दरात गॅस एजन्सीकडून रिक्षाचालक सिलिंडर विकत घेतात.यापूर्वी तत्कालीन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महिन्यातून दोन ते तीन वेळा अचानक धाड टाकून रिक्षांची तपासणी करीत असत. या कारवाईत जे अनधिकृत रिक्षाचालक सापडायचे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून रिक्षा जप्त करण्याची कारवाई व्हायची. कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे. मात्र, सध्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गेल्या वर्षभरापासून अशा अचानक तपासण्या करीत नाहीत, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे दादागिरी करणारे काही रिक्षाचालक योग्य कागदपत्रे, स्वत:चे परमिट नसतानाही व्यवसाय करतात. प्रामाणिकपणे, वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय करतात, असेही सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते.