शहरं
Join us  
Trending Stories
1
सस्पेन्स...! कोण होणार बिहारचा CM? अमित शाह स्पष्टच बोलले, नितिश कुमारांचे टेन्शन वाढवले
2
युद्धाच्या सावटाखाली इराण, खामेनेई यांनी निवडले तीन संभाव्य उत्तराधिकारी, पण मुलाचे नाव नाही!
3
पाकिस्तानच्या पंतप्रधानपदी कुत्रा जरी...; लष्करप्रमुख मुनीर यांनी अमेरिकेत सभा घेतली अन् शोभा केली
4
बापरे...! आता गो इंडिगोच्या वैमानिकाने मेडे अलर्ट पाठविला; रात्रीची वेळ अन् विमानात प्रवासीही होते...
5
मौसम मस्ताना..! जसप्रीत बुमराहनं पहिल्याच षटकात सलामीवीर Zak Crawley चा केला 'करेक्ट कार्यक्रम'
6
महाराष्ट्र निवडणुकीचे सीसीटीव्ही फुटेज देण्यास नकार; राहुल गांधींची मागणी, आयोगाने दिली ही कारणे...  
7
"दहशत आणि विनाशासाठी इस्रायल दोषी...!", UN मधील अमेरिकेच्या विधानाने सर्वच चकित; व्हिडिओ व्हायरल
8
Viral Video : प्रसिद्धीसाठी काहीही! लाईक्स आणि व्ह्यूजसाठी महिलेनं चक्क बेडकांसोबत बनवला व्हिडीओ
9
Plane Crash : इरफान बेटा, उठ... मुझसे बात कर..! विमान अपघातातील मृताच्या आईने फोडला हंबरडा
10
ENG vs IND : ३ शतकवीर अन् मग ४१ धावांत ७ विकेट्स! टीम इंडिया पहिल्या डावात ४७१ धावांवर All Out
11
केव्हा पूर्ववत होणार पाकिस्तानसोबतचा सिंधू पाणी करार? अमित शाह स्पष्टच बोलले, दिलं असं उत्तर की शाहबाज यांची झोप उडेल
12
इस्त्रायल युद्धावेळीच इराणमध्ये मोठा भूकंप; इराणनं केली अणु चाचणी? चर्चांना उधाण
13
'ऑपरेशन सिंधू' केवळ भारतीयच नव्हे, 'या' देशाच्या विद्यार्थ्यांनाही इराणमधून सुखरूप बाहेर आणणार!
14
"डियर क्रिकेट गिव्ह मी वन मोअर चान्स" वाल्या करुण नायरच्या पदरी भोपळा! (VIDEO)
15
शशी थरूर भाजपात जाणार का? काँग्रेस २३ जूनला मोठा निर्णय घेणार
16
Yogini Ekadashi 2025: योगिनी एकादशीला विष्णुकृपा; त्रिपुष्कर योगात ५ राशींना धनलाभाची संधी
17
"माझ्या भांगेत कुंकू भर..." आत्महत्येआधी तिने चिठ्ठीत लिहिलं होते; नैराश्यामागचे कारण काय?
18
इस्रायलचा दावा, वरिष्ठ इराणी लष्करी कमांडर सईद इजादी ठार; हमासशी संबंध असल्याचा आरोप!
19
शाहरुख खानच्या मन्नतवर बीएमसीची कारवाई! नूतनीकरणाच्या नियमांचं उल्लंघन केल्याचा आरोप
20
जिओ, एअरटेलची तयारी! दर दिवसाच्या हिशेबा सारखाच दर तासाला डेटा मिळणार...; रिचार्ज मात्र...

डोंबिवलीकरांनो, तुमची रिक्षा पेटू शकते

By admin | Updated: January 8, 2016 02:05 IST

कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती

आकाश गायकवाड, डोंबिवली कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर केला जात आहे.कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कल्याण-डोंबिवलीतील रिक्षांची अचानक करण्यात येणारी तपासणी गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्याने हे प्रकार वाढल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या रिक्षांमध्ये एलपीजी लीडर किटद्वारे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. इंधनापेक्षा घरगुती गॅसवरील ही रिक्षा चांगली कमाई करून देते. याशिवाय, इंधन जास्त लागत नाही. ठरावीक गॅस एजन्सीचालकांना हाताशी धरून रिक्षामध्ये गॅस भरण्याचे उद्योग काही रिक्षाचालक करीत आहेत. प्रवाशांना गॅस चेंबरवर बसवून हे रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारे चालक हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. रिक्षातील गॅस संपला की, शहराबाहेरील एखाद्या झुडुपाच्या मागे अथवा आडोशाच्या ठिकाणी जायचे. तिथे सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये खाली करायचा. पुन्हा रिकामे सिलिंडर गॅस एजन्सीच्या माणसाला नेऊन द्यायचे, अशी पद्धत अवलंबण्यात येते. ६५० रु पयांच्या एका घरगुती गॅस सिलिंडरकरिता ९०० ते १००० रुपये या ब्लॅकच्या दरात गॅस एजन्सीकडून रिक्षाचालक सिलिंडर विकत घेतात.यापूर्वी तत्कालीन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महिन्यातून दोन ते तीन वेळा अचानक धाड टाकून रिक्षांची तपासणी करीत असत. या कारवाईत जे अनधिकृत रिक्षाचालक सापडायचे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून रिक्षा जप्त करण्याची कारवाई व्हायची. कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे. मात्र, सध्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गेल्या वर्षभरापासून अशा अचानक तपासण्या करीत नाहीत, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे दादागिरी करणारे काही रिक्षाचालक योग्य कागदपत्रे, स्वत:चे परमिट नसतानाही व्यवसाय करतात. प्रामाणिकपणे, वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय करतात, असेही सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते.