शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांचा आनंद गगनात मावेना; लेक दिविजाला दहावीत 92.60% गुण...
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
4
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
5
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
6
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
7
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
8
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
9
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
10
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
11
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
12
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
13
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
14
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
15
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
16
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
17
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
18
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
19
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
20
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार

डोंबिवलीकरांनो, तुमची रिक्षा पेटू शकते

By admin | Updated: January 8, 2016 02:05 IST

कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती

आकाश गायकवाड, डोंबिवली कल्याण-डोंबिवली -कल्याणमध्ये रिक्षामध्ये बसताना ही रिक्षा कुठल्याही क्षणी पेट घेऊ शकते, हे लक्षात असू द्या. कारण, सध्या डोंबिवलीतील काही जुन्या रिक्षांमध्ये चक्क घरगुती वापराच्या गॅसचा इंधन म्हणून वापर केला जात आहे.कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकाऱ्यांकडून कल्याण-डोंबिवलीतील रिक्षांची अचानक करण्यात येणारी तपासणी गेल्या काही महिन्यांपासून बंद झाल्याने हे प्रकार वाढल्याचे समजते.कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांवर धावणाऱ्या जुन्या रिक्षांमध्ये एलपीजी लीडर किटद्वारे घरगुती गॅस सिलिंडरचा वापर केला जातो. इंधनापेक्षा घरगुती गॅसवरील ही रिक्षा चांगली कमाई करून देते. याशिवाय, इंधन जास्त लागत नाही. ठरावीक गॅस एजन्सीचालकांना हाताशी धरून रिक्षामध्ये गॅस भरण्याचे उद्योग काही रिक्षाचालक करीत आहेत. प्रवाशांना गॅस चेंबरवर बसवून हे रिक्षाचालक प्रवाशांच्या जीवाशी खेळत आहेत. रात्रीच्या वेळी रिक्षा चालवणारे चालक हे उद्योग करीत असल्याचे बोलले जाते. रिक्षातील गॅस संपला की, शहराबाहेरील एखाद्या झुडुपाच्या मागे अथवा आडोशाच्या ठिकाणी जायचे. तिथे सिलिंडरमधील गॅस रिक्षामध्ये खाली करायचा. पुन्हा रिकामे सिलिंडर गॅस एजन्सीच्या माणसाला नेऊन द्यायचे, अशी पद्धत अवलंबण्यात येते. ६५० रु पयांच्या एका घरगुती गॅस सिलिंडरकरिता ९०० ते १००० रुपये या ब्लॅकच्या दरात गॅस एजन्सीकडून रिक्षाचालक सिलिंडर विकत घेतात.यापूर्वी तत्कालीन कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी महिन्यातून दोन ते तीन वेळा अचानक धाड टाकून रिक्षांची तपासणी करीत असत. या कारवाईत जे अनधिकृत रिक्षाचालक सापडायचे, त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करून रिक्षा जप्त करण्याची कारवाई व्हायची. कारवाई टाळण्यासाठी रिक्षाचालक प्रामाणिकपणे व्यवसाय करायचे. मात्र, सध्याचे कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गेल्या वर्षभरापासून अशा अचानक तपासण्या करीत नाहीत, असे काही रिक्षाचालकांनी सांगितले. त्यामुळे दादागिरी करणारे काही रिक्षाचालक योग्य कागदपत्रे, स्वत:चे परमिट नसतानाही व्यवसाय करतात. प्रामाणिकपणे, वाहनतळावर उभे राहून व्यवसाय करणाऱ्या रिक्षाचालकांवर अन्याय करतात, असेही सांगण्यात येत आहे. वाहतूक पोलीस आणि कल्याण उपप्रादेशिक परिवहन अधिकारी यांच्यात समन्वयाचे वातावरण नसल्याने प्रवाशांना रिक्षाचालकांच्या मनमानीला सामोरे जावे लागते.