शहरं
Join us  
Trending Stories
1
सैन्याला फ्री हँड देताच युएनची फोनाफोनी! संयुक्त राष्ट्रांच्या महासचिवांना निषेधासाठी ९ दिवस लागले
2
"पुढील २४ ते ३६ तासांत...", पाकिस्तानी मंत्र्यांची झोप उडाली; मध्यरात्री घेतली पत्रकार परिषद
3
२०१९ पासून सोने २०० टक्के महागले, तरी अक्षय्य तृतीयेच्या खरेदीसाठी उत्साह
4
मैसूरच्या उद्योजकाने अमेरिकेत पत्नी आणि मुलाला घातल्या गोळ्या; नंतर स्वतः केली आत्महत्या, एक मुलगा वाचला
5
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
6
पोलिसांचा अघटित घडल्याचा फोन आला अन् आदित्यच्या आई वडिलांनी धावत पळत सोलापूर गाठलं
7
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
8
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
9
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
10
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
11
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
12
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
13
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
14
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
15
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
16
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
17
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
18
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
19
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
20
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना

विकासकामे होत नसल्यामुळे नाराजी, सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:55 IST

सर्वसाधारण सभेत लक्षवेधी : लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविषयीही व्यक्त केली नाराजी

नवी मुंबई : निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामे होत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पाठपुरावा करूनही अत्यावश्यक कामे केली जात नाहीत. प्रशासन विकासकामांना कधी गती देणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामांना गती दिली जात नाही. पदपथांवरील गटारांची झाकणे गायब आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रोडचीही दुरवस्था होऊ लागली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली नसल्यामुळे तेथील स्थितीही बिकट होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे फक्त शहरातील प्रमुख ठिकाणी केली जात आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागांमधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही विकासकामे केली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी सुचविलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. काही कामांच्या फायली गहाळ केल्या जात आहेत. निविदा काढण्यासाठी वेळ लावला जातो. प्रभाग-६५, ७७ व ७८ मधील रस्ते आणि गटारांच्या कामांचे कार्यादेश तब्बल दीड वर्षांपूर्वी दिले आहेत; पण कामे झालेली नाहीत. संपूर्ण शहरात अशीच स्थिती असून प्रशासनाने कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लक्षवेधीवर चर्चा माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रशांत पाटील, हेमांगी सोनावणे, रंगनाथ औटी, घनश्याम मढवी, रामदास पवळे, एम. के. मढवी, अनंत सुतार, रवींद्र इथापे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली.नगरसेवकांना वारंवार अधिकाºयांच्या दालनामध्ये पाठपुरावा करण्यासाठी जावे लागत आहे. नक्की पालिका चालवतेय कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर घणसोली परिसरामध्ये कामे झालेली नाहीत. अनेक फाइल्स प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. निविदा मागविण्यासाठी चार वर्षे घालवली जात आहेत.विकास होत असल्याचा प्रशासनाचा दावाच्महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी विकासकामे होत नसल्याचा दावा खोडून काढला आहे. १ एप्रिल २०१८ पासून २० डिसेंबरपर्यंत ३६२४ कामे पूर्ण झालेली असल्याचे स्पष्ट केले.च्शहरात ९७० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गुरुवारच्या सभेत ३०४ कोटी रुपयांची कामे पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची १६३ कामे सुरू आहेत. ५ ते २५ लाख रुपये किमतीची ३१० कामे, ५ लाखपेक्षा कमी रकमेची २६४६ व २ लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत.च्प्रत्येक कामावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे नियमित आढावा घेतला जात आहे. नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा ३२२ कोटी रकमेची कामे नागरिकांची गरज व सुविधा लक्षात घेऊन केली जात आहेत.च्घणसोली नोडमध्ये १५९ कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असल्याचेही आयुक्त रामास्वामी एन. यांनी केले असून काही कामे रखडली असल्यास तीही मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.काँगे्रसला मतदान केले का?नगरसेविका वैजयंती भगत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रभाग ६५, ७७, ७८ काँगे्रस व इतर पक्षीयांच्या प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी भगत यांना काँगे्रस पक्षाचे नाव तुम्ही घेत आहात, पण काँगे्रसला मतदान केले आहे का अशी विचारणा केली. यामुळे भगत व म्हात्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई