शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता विजयला पाहण्याचा नादात तमिळनाडूत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा गेला जीव, मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता
2
९ वर्षांची मुलगी बेपत्ता झाल्याची बातमी अन्... विजयच्या रॅलीत ३६ जणांचा मृत्यू, पाण्याच्या बाटल्या फेकत होता अभिनेता
3
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
4
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
5
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
6
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
7
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
8
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
9
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
10
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
11
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
12
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
13
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
14
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
15
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
16
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
17
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
18
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
19
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
20
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद

विकासकामे होत नसल्यामुळे नाराजी, सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:55 IST

सर्वसाधारण सभेत लक्षवेधी : लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविषयीही व्यक्त केली नाराजी

नवी मुंबई : निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामे होत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पाठपुरावा करूनही अत्यावश्यक कामे केली जात नाहीत. प्रशासन विकासकामांना कधी गती देणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामांना गती दिली जात नाही. पदपथांवरील गटारांची झाकणे गायब आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रोडचीही दुरवस्था होऊ लागली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली नसल्यामुळे तेथील स्थितीही बिकट होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे फक्त शहरातील प्रमुख ठिकाणी केली जात आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागांमधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही विकासकामे केली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी सुचविलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. काही कामांच्या फायली गहाळ केल्या जात आहेत. निविदा काढण्यासाठी वेळ लावला जातो. प्रभाग-६५, ७७ व ७८ मधील रस्ते आणि गटारांच्या कामांचे कार्यादेश तब्बल दीड वर्षांपूर्वी दिले आहेत; पण कामे झालेली नाहीत. संपूर्ण शहरात अशीच स्थिती असून प्रशासनाने कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लक्षवेधीवर चर्चा माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रशांत पाटील, हेमांगी सोनावणे, रंगनाथ औटी, घनश्याम मढवी, रामदास पवळे, एम. के. मढवी, अनंत सुतार, रवींद्र इथापे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली.नगरसेवकांना वारंवार अधिकाºयांच्या दालनामध्ये पाठपुरावा करण्यासाठी जावे लागत आहे. नक्की पालिका चालवतेय कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर घणसोली परिसरामध्ये कामे झालेली नाहीत. अनेक फाइल्स प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. निविदा मागविण्यासाठी चार वर्षे घालवली जात आहेत.विकास होत असल्याचा प्रशासनाचा दावाच्महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी विकासकामे होत नसल्याचा दावा खोडून काढला आहे. १ एप्रिल २०१८ पासून २० डिसेंबरपर्यंत ३६२४ कामे पूर्ण झालेली असल्याचे स्पष्ट केले.च्शहरात ९७० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गुरुवारच्या सभेत ३०४ कोटी रुपयांची कामे पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची १६३ कामे सुरू आहेत. ५ ते २५ लाख रुपये किमतीची ३१० कामे, ५ लाखपेक्षा कमी रकमेची २६४६ व २ लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत.च्प्रत्येक कामावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे नियमित आढावा घेतला जात आहे. नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा ३२२ कोटी रकमेची कामे नागरिकांची गरज व सुविधा लक्षात घेऊन केली जात आहेत.च्घणसोली नोडमध्ये १५९ कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असल्याचेही आयुक्त रामास्वामी एन. यांनी केले असून काही कामे रखडली असल्यास तीही मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.काँगे्रसला मतदान केले का?नगरसेविका वैजयंती भगत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रभाग ६५, ७७, ७८ काँगे्रस व इतर पक्षीयांच्या प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी भगत यांना काँगे्रस पक्षाचे नाव तुम्ही घेत आहात, पण काँगे्रसला मतदान केले आहे का अशी विचारणा केली. यामुळे भगत व म्हात्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई