शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
2
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
3
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
4
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
5
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
6
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
7
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
8
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
9
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
10
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
11
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
12
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
13
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
14
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
15
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...
16
६ डॉक्टर, २ मौलवी अन् १८ अटकेत; दिल्ली स्फोटामागे कोण कोण होते, किती जण अजून फरार?
17
२ लाखांचा सौदा, रोख रक्कम आणि पुलवामा कनेक्शन... दिल्ली स्फोटात वापरलेल्या कारचा इतिहास आला समोर!
18
परभणीत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचे वाहन ताफ्याबाहेर पडले, यंत्रणा गोंधळात, नेमकं काय घडलं?
19
भ्रष्टाचाराची हद्द! सोने,४ लाख घेऊनही ५ लाखांची मागणी; 'API'सह चार पोलिस 'ACB'च्या ताब्यात
20
Delhi Blast : पतीच्या अंत्यसंस्कारावरुन सुनेचं सासूशी कडाक्याचं भांडण, अखेर...; दिल्ली स्फोटात गमावला जीव

विकासकामे होत नसल्यामुळे नाराजी, सर्वसाधारण सभेत लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2018 04:55 IST

सर्वसाधारण सभेत लक्षवेधी : लोकप्रतिनिधींनी अधिकाऱ्यांविषयीही व्यक्त केली नाराजी

नवी मुंबई : निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामे होत नसल्यामुळे सर्वपक्षीय नगरसेवकांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. पाठपुरावा करूनही अत्यावश्यक कामे केली जात नाहीत. प्रशासन विकासकामांना कधी गती देणार, असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला.

काँग्रेसच्या नगरसेविका वैजयंती भगत यांनी सर्वसाधारण सभेमध्ये लक्षवेधी सूचना मांडली होती. निवडणुका होऊन चार वर्षे झाल्यानंतरही शहरातील विकासकामांना गती दिली जात नाही. पदपथांवरील गटारांची झाकणे गायब आहेत. अनेक ठिकाणी पथदिवे बंद आहेत. रोडचीही दुरवस्था होऊ लागली आहे. डासांचा प्रादुर्भाव वाढला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. उद्यानांच्या देखभाल दुरुस्तीसाठी कंत्राटदारांची नेमणूक केली नसल्यामुळे तेथील स्थितीही बिकट होत आहे. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कामे फक्त शहरातील प्रमुख ठिकाणी केली जात आहेत. वाहतूककोंडीचा प्रश्न गंभीर झाला आहे. प्रभागांमधील विकासकामे मार्गी लावण्यासाठी लोकप्रतिनिधी पाठपुरावा करत असतात. वारंवार पाठपुरावा केल्यानंतरही विकासकामे केली जात नाहीत. लोकप्रतिनिधींनी सुचविलेले प्रस्ताव प्रलंबित ठेवले जात आहेत. काही कामांच्या फायली गहाळ केल्या जात आहेत. निविदा काढण्यासाठी वेळ लावला जातो. प्रभाग-६५, ७७ व ७८ मधील रस्ते आणि गटारांच्या कामांचे कार्यादेश तब्बल दीड वर्षांपूर्वी दिले आहेत; पण कामे झालेली नाहीत. संपूर्ण शहरात अशीच स्थिती असून प्रशासनाने कामांना गती द्यावी, अशी मागणी करण्यात येत आहे. लक्षवेधीवर चर्चा माजी उपमहापौर अविनाश लाड, प्रशांत पाटील, हेमांगी सोनावणे, रंगनाथ औटी, घनश्याम मढवी, रामदास पवळे, एम. के. मढवी, अनंत सुतार, रवींद्र इथापे यांच्यासह अनेक नगरसेवकांनी भूमिका स्पष्ट केली.नगरसेवकांना वारंवार अधिकाºयांच्या दालनामध्ये पाठपुरावा करण्यासाठी जावे लागत आहे. नक्की पालिका चालवतेय कोण? असा प्रश्नही उपस्थित करण्यात आला. आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदलीनंतर घणसोली परिसरामध्ये कामे झालेली नाहीत. अनेक फाइल्स प्रशासनाकडे प्रलंबित आहेत. निविदा मागविण्यासाठी चार वर्षे घालवली जात आहेत.विकास होत असल्याचा प्रशासनाचा दावाच्महापालिका आयुक्त रामास्वामी एन. यांनी विकासकामे होत नसल्याचा दावा खोडून काढला आहे. १ एप्रिल २०१८ पासून २० डिसेंबरपर्यंत ३६२४ कामे पूर्ण झालेली असल्याचे स्पष्ट केले.च्शहरात ९७० कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. गुरुवारच्या सभेत ३०४ कोटी रुपयांची कामे पटलावर मंजुरीसाठी ठेवण्यात आली आहेत. २५ लाख रुपयांपेक्षा अधिक रकमेची १६३ कामे सुरू आहेत. ५ ते २५ लाख रुपये किमतीची ३१० कामे, ५ लाखपेक्षा कमी रकमेची २६४६ व २ लाखपेक्षा कमी रकमेची ५१५ कामे सुरू आहेत.च्प्रत्येक कामावर अत्याधुनिक संगणकीय प्रणालीद्वारे नियमित आढावा घेतला जात आहे. नागरी सुविधांसाठी अर्थसंकल्पातील तरतुदीपेक्षा ३२२ कोटी रकमेची कामे नागरिकांची गरज व सुविधा लक्षात घेऊन केली जात आहेत.च्घणसोली नोडमध्ये १५९ कोटींपेक्षा जास्त रकमेची कामे सुरू असल्याचेही आयुक्त रामास्वामी एन. यांनी केले असून काही कामे रखडली असल्यास तीही मार्गी लावली जातील, असे आश्वासन दिले.काँगे्रसला मतदान केले का?नगरसेविका वैजयंती भगत यांनी लक्षवेधी सूचना मांडल्यानंतर प्रभाग ६५, ७७, ७८ काँगे्रस व इतर पक्षीयांच्या प्रभागांमध्ये विकासकामे होत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली. उपमहापौर मंदाकिनी म्हात्रे यांनी भगत यांना काँगे्रस पक्षाचे नाव तुम्ही घेत आहात, पण काँगे्रसला मतदान केले आहे का अशी विचारणा केली. यामुळे भगत व म्हात्रे यांच्यामध्ये शाब्दिक चकमक झाली. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबई