शहरं
Join us  
Trending Stories
1
CJI गवईंवर बूट फेकणाऱ्या वकिलाला शरद पवारांचे खासदार निलेश लंकेंनी दिल्लीत गाठले; त्यानंतर...
2
आता भारतातच मिळणार जागतिक दर्जाचे शिक्षण; ब्रिटनची 9 विद्यापीठे उघडणार कॅम्पस
3
UNSC मध्ये भारताला ब्रिटनचा पाठिंबा! मुक्त व्यापार करारावर शिक्कामोर्तब; खलिस्तानवाद्यांवर कारवाईची मागणी
4
रस्त्यावर बेशुद्ध अवस्थेत सापडली महिला; शुद्धीवर आल्यावर सांगितलं असं; ऐकून सगळेच चक्रावले!
5
शाब्बास रिचा! सेंच्युरी हुकली; पण 'नॉट रिचेबल' वाटणारा टप्पा गाठला अन् मोठा डावही साधला
6
रावळपिंडी चिकन टिक्का, बहावलपूर नान, तर..., हवाई दलाच्या मेन्यू कार्डमधून पाकिस्तानची खिल्ली
7
शुभमन गिलच्या कर्णधारपदावर सौरव गांगुलींचे मोठे विधान, म्हणाला...
8
वारंवार मागणी केल्याने डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल शांतता पुरस्कार मिळेल? शर्यतीत कोण? जाणून घ्या...
9
'आम्ही सगळेच स्तब्ध झालो होतो, पण आता...', बूट फेकण्याच्या घटनेवर CJI गवई स्पष्टच बोलले
10
रोहित पवारांच्या मातोश्रींकडून गुंड निलेश घायवळचे कौतुक; सचिन घायवळसोबतचेही फोटो आणले समोर
11
Crime: एकाच कुटुंबातील तिघांवर प्राणघातक हल्ला, ५०० सीसीटीव्हीच्या मदतीने हल्लेखोराला अटक
12
ई-बस प्रवाशांसाठी STकडून मासिक, त्रैमासिक पास योजना सुरू; प्रताप सरनाईकांनी दिली माहिती
13
महिलांसाठी आनंदाची बातमी! 'या' राज्यात आता १२ दिवसांची मासिक पाळी रजा मिळणार, सरकारची घोषणा
14
"सचिन घायवळवर गुन्हे दाखल होते, पण..."; मंत्री योगेश कदमांनी सांगितले शस्त्र परवाना देण्याचे कारण
15
Nobel Prize : साहित्यातील नोबेल पुरस्काराची घोषणा, हंगेरीचे लास्झलो क्रास्नाहोरकाई ठरले मानकरी
16
Astro Tips: १० ऑक्टोबरला रात्री ठीक १० वाजून १० मिनिटांनी इच्छापूर्तीसाठी करा 'हे' काम!
17
बाजाराचं जोरदार कमबॅक! एका दिवसात गुंतवणूकदारांना २ लाख कोटींचा फायदा, 'हे' शेअर्स होते टॉप गेनर्स
18
Smriti Mandhana World Record: 'वनडे क्वीन' स्मृतीची विश्व विक्रमाला गवसणी; २८ वर्षांनी असं घडलं
19
IAS Ambika Raina : कमाल! स्वित्झर्लंडची लाखोंची नोकरी सोडून स्वप्न केलं साकार; दोनदा अपयश, तिसऱ्यांदा झाली IAS
20
"कंटेनर वेगाने मागे आला असता तर...", अपघातातून थोडक्यात बचावली रुपाली भोसले, सांगितला भयानक प्रसंग

नवी मुंबईमध्येही चर्चा मनसे फॅक्टरची

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 18, 2019 01:15 IST

ठाणे लोकसभा निवडणुकीमध्येही मनसे फॅक्टरची चर्चा सुरू झाली आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : ठाणे लोकसभा निवडणुकीमध्येही मनसे फॅक्टरची चर्चा सुरू झाली आहे. २००९ मध्ये मनसेमुळेच शिवसेनेच्या हातून ठाणे निसटले होते. २०१४ मध्ये प्रभाव दिसला नसला तरी तब्बल ४८,८६३ मते मिळाली होती. यामुळे उमेदवार नसला तरी मनसेची ताकद कमी लेखणे कोणालाच परवडणारे नाही. राज ठाकरे यांच्या सभांचा किती परिणाम होईल. कोणाला फायदा होणार व कोणाला बसणार फटका, याचा अंदाज नवी मुंबईमधील राजकीय वर्तुळामध्येही लावण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे.महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभांची चर्चा राज्यभर सुरू झाली आहे. ठाणेमध्येही त्यांची सभा होणार असल्यामुळे त्याचा निवडणुकीवर नक्की किती परिणाम होणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.नवी मुंबईमध्येही सोशल मीडियासह राजकीय वर्तुळामध्ये याचीच चर्चा सुरू झाली आहे. २००९ मध्ये मनसे फॅक्टर महत्त्वाचा ठरला होता. ठाणे लोकसभा मतदारसंघामधील उमेदवार राजन राजे यांनी तब्बल एक लाख ३४ हजार ८४० मते मिळविली होती. यामुळे शिवसेनेचा गड कोसळून राष्ट्रवादीचे संजीव नाईक जिंकून आले होते. त्यानिवडणुकीत राज ठाकरे यांची ठाण्यामधील सभा निर्णायक ठरली होती. २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचा प्रभाव कमी होऊनही अभिजीत पानसे यांना तब्बल ४८,८६३ मते मिळाली होती. लोकसभेप्रमाणे विधानसभेच्या निवडणुकीमध्येही यापूर्वी मनसेची भूमिका महत्त्वाची ठरली होती. २००९ च्या बेलापूर मतदारसंघामध्ये मनसेच्या राजेंद्र महाले यांना १९ हजार ५६९ मते मिळाली होती. ही मते राष्ट्रवादीच्या पथ्यावर पडली होती.यापूर्वी एकवेळी लोकसभा व नंतर विधानसभेच्या निकालामध्ये मनसेमुळे युतीला फटका बसला होता व राष्ट्रवादीला फायदा झाला होता. यामुळे या वेळी मनसेचा उमेदवार नसला तरी राज ठाकरे यांच्या भूमिकेमुळे होणाऱ्या फायदा व तोट्यावर गांभीर्याने विचार होत आहे.शिवसेनेकडून पुन्हा फटका बसू नये यासाठी काळजी घेतली जात आहे. राष्ट्रवादीकडून मनसेची मते पारड्यात पाडण्यासाठी प्रयत्न केले जाण्याची शक्यता आहे. मनसेचे नवी मुंबई शहराध्यक्ष गजानन काळे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, आम्ही कोणत्याही उमेदवाराचा प्रचार करत नाही; परंतु पक्षप्रमुख राज ठाकरे यांनी घेतलेली भूमिका नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न सुरू केले असून शहरामध्ये कार्यकर्त्यांच्या बैठका, चौक सभा घेतल्या जात आहेत.>एकही नगरसेवक नाहीऐरोली व बेलापूर मतदारसंघामध्ये २०१४ च्या निवडणुकीमध्ये मनसेचा प्रभाव फारसा दिसला नाही. मनसेच्या उमेदवारांना एकही मतदारसंघामध्ये पाच हजार मतेही मिळविला आली नाहीत. सद्यस्थितीमध्ये महानगरपालिकेमध्येही एकही नगरसेवक नाही; परंतु पाच वर्षांमध्ये विविध आंदोलनामधून मनसेने प्रभाव पाडला आहे.

टॅग्स :Maharashtra Lok Sabha Election 2019महाराष्ट्र लोकसभा निवडणूक 2019Raj Thackerayराज ठाकरे