शहरं
Join us  
Trending Stories
1
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
2
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
3
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
4
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीची निवडणूक बिनविरोध करावी; शरद पवारांचा सल्ला
5
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
6
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
7
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
8
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
9
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
10
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
11
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
12
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
13
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
14
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
15
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
16
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
17
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
18
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
19
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
20
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
Daily Top 2Weekly Top 5

दिघा धरणाचे भिजते घोंगडे कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2018 02:50 IST

ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे.

नामदेव मोरे नवी मुंबई : ब्रिटिशांनी दिघा येथे बांधलेले धरण पूर्णपणे भरले आहे. वर्षभर भरपूर पाणी असूनही त्याचा वापर न होणारे दिघा हे देशातील एकमेव धरण आहे. ओसंडून वाहणाऱ्या धरणाच्या सुरक्षेकडेही पूर्णपणे दुर्लक्ष केले जात असून, पर्यटक बुडून अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.देशातील पहिली रेल्वे मुंबई ते ठाणे दरम्यान १८५३ मध्ये सुरू करण्यात आली. तेव्हाच्या रेल्वे इंजिनसाठी मोठ्या प्रमाणात पाण्याची आवश्यकता होती. वर्षभर भरपूर पाणी उपलब्ध व्हावे, यासाठी ब्रिटिशांनी नवी मुंबईमधील दिघा इलठाणपाडा येथे १८.१० एकर जमिनीवर १८५ मीटर लांबीचे व १४.९५ मीटर उंचीचे धरण बांधले. नैसर्गिक जलस्रोत असल्यामुळे या धरणातील पाणी मे महिन्यातही आटत नाही; पण स्वातंत्र्यानंतर या धरणातील जलसाठ्याचा काहीच उपयोग करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीमध्ये महाराष्ट्रामध्ये छोटी-मोठी १८२१ धरणे आहेत. धरणांमधील पाणीवाटप व वापरावरून मोठ्या प्रमाणात वाद सुरू असतात; पण पाण्याचा वापर न होणारे दिघा हे एकमेव धरण ठरले आहे. पावसाळा सुरू होताच राज्यात सर्वात अगोदर हेच धरण भरले आहे. सद्यस्थितीमध्ये संरक्षण कठड्यावरून पाणी वाहत आहे. पर्यटकांनी या परिसरामध्ये गर्दी करण्यास सुरुवात केली आहे. रोज शेकडो पर्यटक या धरण परिसरामध्ये पावसाळी पर्यटनासाठी जात आहेत. रविवारी व सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या वाढत आहे. धरण परिसरामध्ये सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना करण्यात आलेली नाही, यामुळे अनेक तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहावर उभे राहून सेल्फी घेताना व फोटोसेशन करतानाचे चित्र पाहावयास मिळत आहे. स्टंटबाजीमुळे धरण परिसरामध्ये अपघात होण्याची शक्यताही निर्माण झाली आहे.धरणाची मालकी रेल्वेची आहे. पावसाळा सुरू झाल्यानंतर धरणाची भिंत फुटण्याची व धरण असुरक्षित झाल्याचे संदेश सोशल मीडियावरून फिरू लागले होते. रेल्वेच्या अभियंत्यांनी धरणाची पाहणी करून ते सुरक्षित असल्याचे स्पष्ट केले आहे. धरणाचे स्ट्रक्चरल आॅडिटही केले असून, दगडाचे बांधकाम पूर्णपणे सुरक्षित असल्याचा निर्वाळा यापूर्वीच दिला आहे. रेल्वेचे अधिकारी नियमित धरणाची पाहणी करत असले, तरी तेथील सुरक्षेसाठी काहीही उपाययोजना केलेल्या नाहीत. धरण परिसरामध्ये पर्यटकांचा गोंधळ सुरू असतो. पावसाळ्यात अपघात होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. याशिवाय धरणाच्या पायथ्याला झोपड्यांची संख्या वाढली आहे. पावसाचे पाणी वाढल्यास झोपड्यांमध्ये पाणी शिरण्याची शक्यताही निर्माण झाली आहे. स्थानिक लोकप्रतिनिधींनी हे धरण महापालिकेकडे हस्तांतर करण्याची मागणी केली आहे; पण त्या विषयी ठोस कार्यवाही झालेली नाही. दोन वर्षांपूर्वी पाणी वापरावरून आजी-माजी खासदारांमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली होती; परंतु आता दोन्ही लोकप्रतिनिधींनीही या विषयावर मौन बाळगले आहे.श्रेयासाठी फुकटची धडपड : दोन वर्षांपूर्वी दिघा धरणाचे पाणी नवी मुंबई व ठाणे शहराला देण्यासाठी हालचाली सुरू झाल्या होत्या. नवी मुंबई महानगरपालिकेकडे धरण हस्तांतर करण्याची महापालिकेची योजना होती. पण विद्यमान खासदार राजन विचारे व माजी खासदार संजीव नाईक यांनी धरणाचा विषय मार्गी लावण्यासाठी आम्हीच पाठपुरावा केल्याचा दावा करून श्रेय मिळविण्यासाठी प्रयत्न केला होता. परंतु सद्यस्थितीमध्ये धरणातील पाण्याचा काहीही उपयोग होत नसून दोन्ही लोकप्रतिनिधींनी मौन बाळगले आहे.पाणी असूनही घशाला कोरड : पाणी असूनही त्याचा वापर होत नसलेले दिघा हे राज्यातील व देशातील एकमेव धरण आहे. वर्षभर धरणातील पाणीसाठा पडून असतो. दुसरीकडे दिघा व ऐरोली परिसरातील नागरिकांना उन्हाळ्यात आठवड्यातून एक दिवस एमआयडीसी पाणीपुरवठा करत नाही. अनेक ठिकाणी कमी दाबाने पाणीपुरवठा होत असतो.स्टंटबाजपर्यटकांना रोखावेदिघा धरण परिसरामध्ये पर्यटकांची संख्या वाढू लागली आहे. उत्साही तरुण धरणाच्या भिंतीवरील प्रवाहामध्ये उभे राहून सेल्फी व सामूहिक फोटोसेशन करत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. भिंतीवरून खाली व धरणात पडून पर्यटकांचा मृत्यू होण्याची शक्यता निर्माण झाली असून, रेल्वेने या परिसरामध्ये सुरक्षारक्षकांची नेमणूक करावी. पोलिसांनीही गोंधळ घालणाºया पर्यटकांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.पर्यटनाचीही संधीदिघा धरण महापालिकेकडे हस्तांतर झाल्यास धरण परिसरातील जमिनीवर वनविभागाच्या मदतीने निसर्ग पर्यटन केंद्र उभारणे शक्य होणार आहे. महापालिकेकडून धरण हस्तांतरणासाठी काय कार्यवाही सुरू आहे याविषयी माहिती घेण्यासाठी मालमत्ता विभागाचे उपआयुक्त दादासाहेब चाबुकस्वार यांच्याशी संपर्क साधला, परंतु संपर्क होऊ शकला नाही.