शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

तुर्भे रेल्वे यार्डमधील विकासकामे धिम्या गतीने

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2019 01:38 IST

पावसाळ्यापूर्वी दुरुस्ती पूर्ण करण्याचे आव्हान : माथाडींच्या रोजगारावरही परिणाम

नामदेव मोरेनवी मुंबई : कामगार संघटनांच्या पाठपुराव्यानंतर तुर्भे रेल्वे यार्डमधील प्लॅटफॉर्म व छत दुरुस्तीचे काम प्रशासनाने सुरू केले आहे. सद्यस्थितीमध्ये हे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू असून, पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. रखडलेल्या कामाचा परिणाम रोजगारावरही होऊ लागल्याने कामगारांनीही नाराजी व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे.

मुंबई व उपनगरांमधील प्रमुख रेल्वे यार्डमध्ये तुर्भेचाही समावेश आहे. या ठिकाणी देशाच्या विविध भागांमधून सिमेंट, धान्य व इतर माल येत असतो. पूर्वी प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगन यायच्या, त्यामधून मालाची चढ-उतार करण्यासाठी ७०० पेक्षा जास्त माथाडी कामगार काम करत आहेत; परंतु मागील काही वर्षांमध्ये रेल्वे यार्डमधील समस्या वाढत गेल्या. खराब रस्ते, खचलेले प्लॅटफॉर्म व छतावरील उडालेले पत्रे यामुळे या ठिकाणी माल कमी येऊ लागला. पावसाळ्यामध्ये छतामधून मोठ्या प्रमाणात पाणीगळती होत असल्यामुळे धान्य व सिमेंट भिजल्याच्या घटनाही घडल्या होत्या. महाराष्ट्र राज्य माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने व कामगारांनीही माल यार्डच्या दुरुस्तीसाठी पाठपुरावा सुरू केला होता.

तीन ते चार वर्षांच्या पाठपुराव्यानंतर रेल्वे प्रशासनाने सर्वप्रथम रोडचे काँक्रीटीकरण केले. रोडच्या एक लेनची दुरुस्ती पूर्ण केल्यानंतर प्लॅटफॉर्म छत दुरुस्तीचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला. एक महिन्यापासून दुरुस्तीचे काम प्रत्यक्ष सुरू झाले आहे. यामुळे कामगारांनीही व येथे माल मागविणाऱ्यांनीही प्रशासनाचे आभार मानले होते; पण प्रत्यक्षात ठेकेदाराकडून काम गतीने केले जात नाही.एक महिन्यानंतर दहा टक्के कामही पूर्ण झालेले नाही. प्लॅटफॉर्मवर ५५ ब्लॉक असून, त्यामधील पाच ब्लॉकचे काम आतापर्यंत पूर्ण झाले आहे. उर्वरित ५० ब्लॉकमधील प्लॅटफार्मचे काम पावसाळ्यापूर्वी कसे पूर्ण केले जाणार, असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत.छताच्या दुरुस्तीचे काम शेवटच्या टोकापासून सुरू आहे. लोखंडी सांगाडा बसविण्याचे काम जवळपास पूर्ण केले आहे; परंतु त्यावर अद्याप पत्रे बसविण्यात आलेले नाहीत. अनेक ठिकाणी अद्याप लोखंडी सांगाडाही बसविण्यात आलेला नाही. काही ठिकाणी प्लॅटफार्म खचलेला असून, त्याची दुरुस्तीही होणे आवश्यक आहे. माथाडी कामगारांशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले की, दुरुस्तीचे काम अत्यंत धिम्या गतीने सुरू आहे. कामाचा वेग वाढविला नाही तर पावसाळ्यापूर्वी ते पूर्ण होणार नाही. यामुळे पावसाळ्यात पुन्हा गैरसोयींना सामोरे जावे लागणार आहे. कामाच्या ठिकाणी ठेकेदाराने फलक लावणे आवश्यक होते. त्या फलकावर कामाचे स्वरूप, ठेकेदाराचे नाव, काम

कधी मंजूर केले, कामासाठी कितीनिधी द्यावा लागणार व इतर सर्व माहितीचा तपशील लिहिणे आवश्यक आहे; पण प्रत्यक्षात अशाप्रकारचा कोणताही माहिती फलक लावण्यात आलेला नाही.

अधिकाऱ्यांचेही दुर्लक्षरेल्वे यार्डमधील कामाविषयी माहिती घेण्यासाठी येथील कार्यालयात संपर्क साधला असता, अभियांत्रिकी विभागाचे कोणीही अधिकारी येथे नसतात, अशी माहिती मिळाली. जुईनगरमध्ये अधिकारी बसतात, अशी माहिती देण्यात आली.

जुईनगरमधील रेल्वे कार्यालयात जाऊन माहिती घेतली असता रेल्वे यार्डचे काम पाहणारे अधिकारी येथे नसतात. तेथील कामकाज नक्की कोठून चालते, याची माहिती जुईनगरमधील अभियांत्रिकी विभागालाही देता आली नाही.

मालाची आवकही झाली कमीतुर्भे रेल्वे यार्डमध्ये प्रत्येक महिन्याला २० ते २५ वॅगनमधील सिमेंट व धान्याची आवक होत होती; परंतु येथील समस्यांमुळे गत तीन वर्षांमध्ये सातत्याने वॅगनची संख्या कमी होऊ लागली. सद्यस्थितीमध्ये महिन्याला चार ते पाच वॅगनचीच आवक होत आहे, यामुळे कामगारांच्या रोजगारावरही परिणाम झाला आहे. दुरुस्तीचे काम लवकर पूर्ण केले जावे, अशी मागणी कामगारांनी केली आहे.

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईrailwayरेल्वे