शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

प्रशासन सत्ताधा-यांच्या वादात विकास खुंटला, भाजपा आरोपीच्या पिंज-यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 24, 2018 01:01 IST

पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात शहरात विकासकामे होण्याऐवजी महापालिका प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजपा यांच्यातील वाद अनेकदा समोर आला आहे.

पनवेल : पनवेल महापालिका स्थापन होऊन जवळपास दीड वर्षांचा कालावधी लोटला आहे. मात्र, या काळात शहरात विकासकामे होण्याऐवजी महापालिका प्रशासन विरुद्ध सत्ताधारी भाजपा यांच्यातील वाद अनेकदा समोर आला आहे.महापालिकेच्या स्थापनेसाठी आग्रही भूमिका घेणाºया भाजपाकडूनच प्रशासनाविरोधात वारंवार असहकार पुकारला जात आहे. त्यामुळे विकासकामांचा खोळंबा होत असल्याने नागरिकांमध्येही नाराजी पसरू लागली आहे. विरोधी पक्षाने मात्र प्रशासनाची बाजू उचलून धरत सत्ताधाºयांवर गंभीर आरोप केले आहेत.पनवेलच्या महासभेतील कामकाज विषयपत्रिकांवर न चालता वेगळ्याच विषयांवर सुरू असते. जनतेच्या प्रश्नांवर चर्चा होण्याऐवजी दुसºयाच विषयांवर चर्चा रंगते. अधिकाºयांना वारंवार टार्गेट करणे, असंसदीय भाषेचे वापर करणे, सभाशास्त्राचा नियम न पाळल्याने बुधवारी आयोजित तहकूब महासभेतून आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे व संपूर्ण प्रशासनाने सभात्याग केला.महापालिकेच्या स्थापनेनंतर समाविष्ट गावांचा विकास होईल, अशी भावना स्थानिक रहिवाशांना होती. मात्र, गावांचा विकास पूर्णपणे खुंटला आहे. या गोष्टीला सत्ताधारीच जबाबदार असल्याची तक्र ार गावांतील नागरिक करीत आहेत. प्रशासनाकडे वारंवार बोट दाखवणाºया सत्ताधाºयांनी महापालिका स्थापनेचा आग्रह का धरला? असा प्रश्नही आता उपस्थित होऊ लागला आहे.केंद्रात, राज्यात भाजपाचीच सत्ता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून सत्ताधाºयांची पर्यायाने भाजपाचीच अडवणूक होत असेल, तर त्याला भाजपाची अडवणूक होत आहे, असे म्हटले जात असेल तर ते विश्वासार्ह वाटत नाही. वारंवार होणाºया वादामुळे पनवेल महानगरपालिकेची प्रतिमा मलीन होत असून, दररोज नवीन वाद पालिकेत पाहावयास मिळत आहे.आपल्या मर्जीनुसार काम करीत नसल्याने सत्ताधाºयांकडूून पालिका प्रशासन वेठीस धरले जात आहे.पनवेल महापालिकेचे आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी महापालिकेच्या स्थापनेपासून अनधिकृत फेरीवाले, अनधिकृत बांधकाम, हॉटेल्स व्यावसायिकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. भाजपाच्या पाठीशी उभे राहिलेल्याना आयुक्तांच्या कारवाईचा मोठा फटका बसल्याने आयुक्तांच्या बदलीचीही चर्चा होत आहे. सत्ताधाºयांना महापालिका प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करायची आहे का? असा आरोप विरोधी पक्षनेते प्रीतम म्हात्रे यांनी केला आहे. पनवेल महापालिका हद्दीत अनेक गावे समाविष्ट असून, सत्ताधारी आणि प्रशासनाच्या वादात गावांचा विकास खुंटला आहे. भाजपाने एक प्रकारे आयुक्त हटाव ही मोहीम हाती घेतली असून, आयुक्तांच्या जाण्याने विकासाला गती मिळेल का? असा प्रश्न सर्वसामान्य नागरिक विचारत आहेत.पनवेल महापालिकेच्या स्थापनेला दीड वर्ष ओलांडूनही अद्याप प्रभाग समित्या स्थापन झालेल्या नाहीत. याशिवाय रस्ते दुरुस्ती, कचरा समस्या, तर काही भागांत पाणीप्रश्न आदी समस्या आजही भेडसावत आहेत. या समस्या सोडवण्याला प्राधान्य देण्याऐवजी आरोप-प्रत्यारोपांना अधिक महत्त्व दिले जात आहे. सत्ताधाºयांच्या आडमुठे धोरणाविरोधात विरोधी पक्षांबरोबरच सामाजिक संघटनांनीही पुढकार घेत प्रशासनाच्या बाजूने उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी सह्यांची मोहीम, बैठका, घेतल्या जात आहेत. कोकण आयुक्तांच्या मध्यस्तीची मागणीपनवेल महापालिकेतील सत्ताधारी व प्रशासक या वादाचा परिणाम पनवेलच्या विकासावर झाला असल्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहराध्यक्ष माजी नगरसेवक शिवदास कांबळे यांनी कोकण आयुक्तडॉ. चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. पनवेलमध्ये ओढवलेल्या या वादामुळे विकासकामे ठप्प झाली असल्याचे त्यांनी कोकण आयुक्तांना सांगितले आहे.

टॅग्स :panvelपनवेल