शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

बट्ट्याबोळ करणारा बिल्डरधार्जिणा विकास आराखडा

By नारायण जाधव | Updated: March 4, 2024 13:39 IST

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

स्थापनेनंतर तब्बल ३२ वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची रचना आणि उठवलेली आरक्षणे पाहता, तो नवी मुंबईला नजीकच्या भविष्यात ‘व्हर्टिकल स्लम’कडे नेणारा असल्याची भीती याच सदरात गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केली होती. आता जनतेकडून आलेल्या हरकती व सूचनांवर कोणतीही अंमलबजावणी न करता, तो आहे तसाच किंबहुना, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली त्यांच्या हिताचे महत्त्वाचे बदल महापालिकेच्या नगररचना विभागाने केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईची ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठाणे जिल्ह्यांतील शहरासारखी बजबजपुरी कशी होईल, याचीच पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे.

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. नवी मुंबईच्या विकास आराखड्यात लोकसंख्येच्या तुलनेत एकूण मोकळे क्षेत्र, एमआयडीसीत दिलेली निवासी बांधकामांना परवानगी आणि सिडकोच्या जुन्या इमारतींच्या जागी पुनर्विकासाच्या नावाखाली येणारे उत्तुंग टाॅवर पाहता, त्यात आधुनिकता असेल, असे वाटले होते; परंतु नगररचना विभागाने राज्यकर्ते आणि बिल्डरांच्या दबावाखाली आहे त्या मोकळ्या जागा, पार्किंग क्षेत्र, हरितपट्टेच नव्हे तर जागतिक रामसर क्षेत्रासह फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात बांधकामांसाठी लागू असलेल्या बंधनांना ठाणे खाडीत बुडवल्याचे शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रारूप आराखड्यात दिसत आहे.

वास्तविक, नगररचना कायदा १९६६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षांतच शहराचा विकास आराखडा तयार करून शासनाची मंजुरी घेऊन त्यानुसार काम करणे अभिप्रेत असते; परंतु येथील नगररचना अधिकाऱ्यांनी या ३२ वर्षांत सीसी/ओसी देऊन बिल्डरांची सेवा करण्यातच धन्यता मानली आहे.

रामसर क्षेत्र परिसरात उभी राहणार बांधकामेठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. खाडीचे अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र जागतिक दर्जाचे रामसर स्थळ घोषित असून, यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित आहे. नवी मुंबई शहराची ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख करून देण्यात येत आहे. याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाम बीच परिसरात नव्या विकास आराखड्यात बांधकामांना वाट मोकळी करून दिली आहे. देशातील एका मोठ्या उद्योगपतीचा बंगलो प्रकल्पही येथेच उभा राहत आहे.

प्रादेशिक उद्यान बिल्डरांना आंदणनवी मुंबई महापालिकेने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी अडवली-भूतवली-बोरिवली गावांमधील ६४४.७८ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यानाचे आरक्षण टाकले होते. यातील ५१३.९२ हेक्टर जमीन ही वन खात्याची तर १३०.८६ हेक्टर जमीन खासगी मालकीची हाेती. या संपूर्ण क्षेत्रावर ॲम्युझमेंट पार्क प्रस्तावित होते. मात्र, एमआरटीपी कायदा १९६६ मधील ३७ (१) च्या तरतुदींची पूर्तता न करता नव्या विकास आराखड्यात हे आरक्षण उठवून तिथे निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांना ठाणे आणि नवी मुंबईतील राज्यकर्त्यांच्या हितासाठी परवानगी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई