शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
5
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
6
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
7
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
8
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
9
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
10
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
11
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
12
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
13
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
14
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
15
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
16
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
17
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
18
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
19
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
20
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
Daily Top 2Weekly Top 5

बट्ट्याबोळ करणारा बिल्डरधार्जिणा विकास आराखडा

By नारायण जाधव | Updated: March 4, 2024 13:39 IST

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

स्थापनेनंतर तब्बल ३२ वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची रचना आणि उठवलेली आरक्षणे पाहता, तो नवी मुंबईला नजीकच्या भविष्यात ‘व्हर्टिकल स्लम’कडे नेणारा असल्याची भीती याच सदरात गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केली होती. आता जनतेकडून आलेल्या हरकती व सूचनांवर कोणतीही अंमलबजावणी न करता, तो आहे तसाच किंबहुना, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली त्यांच्या हिताचे महत्त्वाचे बदल महापालिकेच्या नगररचना विभागाने केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईची ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठाणे जिल्ह्यांतील शहरासारखी बजबजपुरी कशी होईल, याचीच पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे.

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. नवी मुंबईच्या विकास आराखड्यात लोकसंख्येच्या तुलनेत एकूण मोकळे क्षेत्र, एमआयडीसीत दिलेली निवासी बांधकामांना परवानगी आणि सिडकोच्या जुन्या इमारतींच्या जागी पुनर्विकासाच्या नावाखाली येणारे उत्तुंग टाॅवर पाहता, त्यात आधुनिकता असेल, असे वाटले होते; परंतु नगररचना विभागाने राज्यकर्ते आणि बिल्डरांच्या दबावाखाली आहे त्या मोकळ्या जागा, पार्किंग क्षेत्र, हरितपट्टेच नव्हे तर जागतिक रामसर क्षेत्रासह फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात बांधकामांसाठी लागू असलेल्या बंधनांना ठाणे खाडीत बुडवल्याचे शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रारूप आराखड्यात दिसत आहे.

वास्तविक, नगररचना कायदा १९६६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षांतच शहराचा विकास आराखडा तयार करून शासनाची मंजुरी घेऊन त्यानुसार काम करणे अभिप्रेत असते; परंतु येथील नगररचना अधिकाऱ्यांनी या ३२ वर्षांत सीसी/ओसी देऊन बिल्डरांची सेवा करण्यातच धन्यता मानली आहे.

रामसर क्षेत्र परिसरात उभी राहणार बांधकामेठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. खाडीचे अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र जागतिक दर्जाचे रामसर स्थळ घोषित असून, यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित आहे. नवी मुंबई शहराची ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख करून देण्यात येत आहे. याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाम बीच परिसरात नव्या विकास आराखड्यात बांधकामांना वाट मोकळी करून दिली आहे. देशातील एका मोठ्या उद्योगपतीचा बंगलो प्रकल्पही येथेच उभा राहत आहे.

प्रादेशिक उद्यान बिल्डरांना आंदणनवी मुंबई महापालिकेने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी अडवली-भूतवली-बोरिवली गावांमधील ६४४.७८ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यानाचे आरक्षण टाकले होते. यातील ५१३.९२ हेक्टर जमीन ही वन खात्याची तर १३०.८६ हेक्टर जमीन खासगी मालकीची हाेती. या संपूर्ण क्षेत्रावर ॲम्युझमेंट पार्क प्रस्तावित होते. मात्र, एमआरटीपी कायदा १९६६ मधील ३७ (१) च्या तरतुदींची पूर्तता न करता नव्या विकास आराखड्यात हे आरक्षण उठवून तिथे निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांना ठाणे आणि नवी मुंबईतील राज्यकर्त्यांच्या हितासाठी परवानगी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई