शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
2
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
3
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
4
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
5
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
6
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
7
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
8
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
9
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
10
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
11
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
12
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
13
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
14
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
15
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
16
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
17
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
18
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
19
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...
20
पहलगाम ईफेक्ट : सूक्ष्म नजर ठेवा, सतर्क रहा; भारतीय रेल्वेला अलर्ट!

बट्ट्याबोळ करणारा बिल्डरधार्जिणा विकास आराखडा

By नारायण जाधव | Updated: March 4, 2024 13:39 IST

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा.

नारायण जाधव, उपवृत्तसंपादक

स्थापनेनंतर तब्बल ३२ वर्षांनी नवी मुंबई महापालिकेने तयार केलेल्या प्रारूप विकास आराखड्याची रचना आणि उठवलेली आरक्षणे पाहता, तो नवी मुंबईला नजीकच्या भविष्यात ‘व्हर्टिकल स्लम’कडे नेणारा असल्याची भीती याच सदरात गेल्या वर्षी ३ एप्रिल २०२३ रोजी व्यक्त केली होती. आता जनतेकडून आलेल्या हरकती व सूचनांवर कोणतीही अंमलबजावणी न करता, तो आहे तसाच किंबहुना, राज्यकर्त्यांच्या दबावाखाली त्यांच्या हिताचे महत्त्वाचे बदल महापालिकेच्या नगररचना विभागाने केल्याचेच दिसत आहे. त्यामुळे येत्या काळात नवी मुंबईची ठाणे, कल्याण, डोंबिवली, भिवंडी या ठाणे जिल्ह्यांतील शहरासारखी बजबजपुरी कशी होईल, याचीच पुरेपूर काळजी घेतल्याचे दिसत आहे.

विकास आराखडा तयार करताना माणसाला जन्मापासून मरणापर्यंत जे जे लागते ते म्हणजे रुग्णालय, शाळा, मैदान, करमणूक केंद्र, बाजारहाट, बस, रेल्वे स्थानके ते स्मशानभूमीपर्यंतच्या सर्व घटकांचा यात विचार व्हायला हवा. नवी मुंबईच्या विकास आराखड्यात लोकसंख्येच्या तुलनेत एकूण मोकळे क्षेत्र, एमआयडीसीत दिलेली निवासी बांधकामांना परवानगी आणि सिडकोच्या जुन्या इमारतींच्या जागी पुनर्विकासाच्या नावाखाली येणारे उत्तुंग टाॅवर पाहता, त्यात आधुनिकता असेल, असे वाटले होते; परंतु नगररचना विभागाने राज्यकर्ते आणि बिल्डरांच्या दबावाखाली आहे त्या मोकळ्या जागा, पार्किंग क्षेत्र, हरितपट्टेच नव्हे तर जागतिक रामसर क्षेत्रासह फ्लेमिंगो अभयारण्याच्या परिसरात बांधकामांसाठी लागू असलेल्या बंधनांना ठाणे खाडीत बुडवल्याचे शासनाकडे मंजुरीसाठी पाठवलेल्या प्रारूप आराखड्यात दिसत आहे.

वास्तविक, नगररचना कायदा १९६६ नुसार स्थानिक स्वराज्य संस्थेची स्थापना झाल्यानंतर शासनाच्या नगररचना अधिकाऱ्यांनी चार वर्षांतच शहराचा विकास आराखडा तयार करून शासनाची मंजुरी घेऊन त्यानुसार काम करणे अभिप्रेत असते; परंतु येथील नगररचना अधिकाऱ्यांनी या ३२ वर्षांत सीसी/ओसी देऊन बिल्डरांची सेवा करण्यातच धन्यता मानली आहे.

रामसर क्षेत्र परिसरात उभी राहणार बांधकामेठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्य १६.९०५ चौरस किलोमीटर क्षेत्रावर पसरलेले आहे. खाडीचे अंदाजे ६५ चौरस किलोमीटरचे क्षेत्र जागतिक दर्जाचे रामसर स्थळ घोषित असून, यात १७ चौरस किलोमीटरमध्ये अभयारण्याचे क्षेत्र आहे. उर्वरित ४८ चौरस किलोमीटर ही जागा पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्र म्हणून ऑक्टोबर २०२१ मध्ये अधिसूचित आहे. नवी मुंबई शहराची ‘फ्लेमिंगो सिटी’ म्हणून ओळख करून देण्यात येत आहे. याच फ्लेमिंगोंचा अधिवास असलेल्या पाम बीच परिसरात नव्या विकास आराखड्यात बांधकामांना वाट मोकळी करून दिली आहे. देशातील एका मोठ्या उद्योगपतीचा बंगलो प्रकल्पही येथेच उभा राहत आहे.

प्रादेशिक उद्यान बिल्डरांना आंदणनवी मुंबई महापालिकेने १६ नोव्हेंबर १९९५ रोजी अडवली-भूतवली-बोरिवली गावांमधील ६४४.७८ हेक्टर जमिनीवर प्रादेशिक उद्यानाचे आरक्षण टाकले होते. यातील ५१३.९२ हेक्टर जमीन ही वन खात्याची तर १३०.८६ हेक्टर जमीन खासगी मालकीची हाेती. या संपूर्ण क्षेत्रावर ॲम्युझमेंट पार्क प्रस्तावित होते. मात्र, एमआरटीपी कायदा १९६६ मधील ३७ (१) च्या तरतुदींची पूर्तता न करता नव्या विकास आराखड्यात हे आरक्षण उठवून तिथे निवासी आणि वाणिज्यिक बांधकामांना ठाणे आणि नवी मुंबईतील राज्यकर्त्यांच्या हितासाठी परवानगी दिली आहे.

टॅग्स :Navi Mumbai Municipal Corporationनवी मुंबई महानगरपालिकाNavi Mumbaiनवी मुंबई