शहरं
Join us  
Trending Stories
1
'नोबेल समितीने शांती निवडण्याऐवजी राजकारण केलं', ट्रम्प यांना डावलताच 'व्हाईट हाऊस'चा थयथयाट
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
आशिया कपची ट्रॉफी भारताला मिळूच देणार नाही, मोहसीन नक्वींनी आता खेळली अशी चाल 
4
नवी मुंबई विमानतळाला आरएसएसच्या नेत्याचे नाव देण्याची तयारी; रोहित पवारांचा भाजपवर आरोप
5
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
6
प्रेमासाठी काय पण! पाकिस्तानी कपलने सीमा ओलांडून भारतात केला प्रवेश, 'अशी' झाली पोलखोल
7
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
8
यशस्वी जयस्वालनं वेस्ट इंडिजला झोडलं, एकाच खेळीत मोडले अनेक मोठे विक्रम!
9
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
10
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
11
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
12
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
13
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
14
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
15
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
16
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
17
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
18
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
19
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
20
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?

नवी मुंबई विमानतळाला दि.बा. पाटील यांचे नाव देणार का? अजित पवार म्हणाले, "उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 10, 2025 13:39 IST

नवी मुंबई विमानतळाच्या नावावरुन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी महत्त्वाचे विधान केले.

Ajit Pawar on Navi Mumbai Airport:  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळाचे उद्घाटन केले. यावेळी या विमानतळाला दि. बा. पाटील यांचे नाव देण्यात येईल अशी अपेक्षा भूमिपुत्रांना होती. मात्र  पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माजी खासदार दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न केल्याने पुन्हा एकदा भूमिपुत्रांमध्ये प्रचंड नाराजीचा सुरु उमटला आहे. विरोधकांनीही दि. बा. पाटील यांच्या नावाची घोषणा न झाल्याने सरकारवर सडकून टीका केली. आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नावावरुन महत्त्वाचे विधान केले आहे.

नवी मुंबई विमानतळाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात लोकार्पण करण्यात आले. मात्र नवी मुंबई विमानतळाला माजी खासदार दि बा. पाटलांचे नाव देण्याबाबत कोणताही उल्लेख न केल्याने भूमिपुत्रांकडून प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. त्यामुळे आता भूमिपूत्र आणि सरकार यांच्यात संघर्ष पेटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नवी मुंबई विमातळाला दि .बा. पाटील यांचे नाव देण्याची मागणी रायगड, ठाणे, मुंबई, नवी मुंबई व पालघर इथल्या  स्थानिक भूमिपुत्रांकडून वारंवार केली जात आहे. सरकारने त्याबाबत सकारात्मकता देखील दाखवली होती. मात्र उद्घाटनच्या कार्यक्रमात याची घोषणा न झाल्याने भूमिपुत्रांचा अपेक्षा भंग झाला.

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा पाटील यांचे नाव देण्यात येणार की ते बदलण्यात येणार असा प्रश्न अजित पवार यांना विचारण्यात आला. यावर बोलताना अजित पवार यांनी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जाईल असं म्हटलं.

"एकदा ते विमानतळ व्यवस्थितपणे चालू होऊ द्या. पंतप्रधान मोदींनीही विमानतळाची पाहणी केली. साधारण विमानसेवा सुरु होण्यासाठी साधारण ४५ दिवस लागणार आहेत. एकदा मान्यवरांनी तारीख दिली आणि उद्घाटन केलं की पुढच्या गोष्टी गतीने व्हायला मदत होते. मुंबईच्या विमानतळावर खूप मोठा ताण आहे. त्यामुळे या विमानतळाची गरज होती. आम्ही वाढवण येथेही विमानतळ तयार करण्यासंदर्भात सूतोवच केले आहे. कारण तिथेही आंतरराष्ट्रीय विमानतळ तयार करावे लागणार आहे.  आता उद्घाटन केलेल्या विमानतळाची क्षमता नऊ कोटी आहे. राहिलेली कामे चांगल्या पद्धतीने करण्याची आमची भूमिका आहे. त्यासंदर्भात तिथल्या लोकांच्या ज्या काही भावना आहेत त्या लक्षात घेऊन  सरकारकडून योग्य ती कारवाई करु.  नाव देण्याच्या संदर्भात स्वतः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तिथल्या वेगवेगळ्या शिष्टमंडळांशी चर्चा केलेली आहे. अशा जेव्हा मोठ्या प्रमाणात लोकांची मागणी येते त्यावेळी जनतेच्या बहुमताचा विचार करुनच निर्णय घेतला जातो," असं उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Navi Mumbai Airport Name: Ajit Pawar on Naming After D.B. Patil

Web Summary : Ajit Pawar addressed the naming of Navi Mumbai Airport after D.B. Patil, stating a decision considering public opinion will be made after operations commence. He emphasized the airport's importance in relieving Mumbai's air traffic congestion.
टॅग्स :Ajit Pawarअजित पवारAirportविमानतळNavi Mumbaiनवी मुंबई