शहरं
Join us  
Trending Stories
1
India Into Final : सात वेळच्या चॅम्पियनसमोर ८ वर्षांपूर्वीचा रुबाब! विक्रमी विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल
2
IND vs AUS : "ना फिफ्टीचं सेलिब्रेशन, ना सेंच्युरीचं! विजयी धाव घेताच जेमिमाला अश्रू अनावर; म्हणाली...
3
सरकार शेतकरी कर्जमाफी कधीपर्यंत करणार? मुख्यमंत्री फडणवीसांनी बैठकीनंतर सांगितला प्लॅन
4
"मुख्यमंत्री करा म्हणून किती लाचारी करायची?"; राज ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचलं, चढवला हल्ला
5
Jemimah Rodrigues Century : शाब्बास जेमी! घरच्या मैदानात अविस्मरणीय शतकी खेळीसह लुटली मैफील
6
Sangli Crime: ‘व्हाईट हाऊस हॉटेल’च्या बारमध्ये मित्रानेच चिरला गळा, तरुणाचा जागेवरच मृत्यू
7
एकीकडे दिलासा, मात्र दुसरीकडे बच्चू कडू, राजू शेट्टी यांच्यासह हजारो शेतकरी आंदोलकांविरोधात गुन्हा दाखल
8
शेतकऱ्यांच्या कायमस्वरूपी कर्जमुक्तीसाठी उच्चाधिकार समितीची स्थापना; मुख्यमंत्री फडणवीस-बच्चू कडू यांच्या बैठकीत निर्णय
9
‘चाचा पीएमओ है हमारे’, एअरपोर्ट ऑथोरिटीत नोकरी मिळवून देण्याच्या नावाखाली बंटी-बबलीकडून ७ लाखांचा गंडा
10
Phaltan Doctor Update: "हॉटेलमध्ये हातावर सुसाईड नोट दिसली नाही, पोस्टमार्टम रुममध्ये दिसली"; वकिलाने कोर्टासमोर मांडली शंका
11
Maoist Leader: ‘देवजी’च्या महासचिवपदी निवडीचा दावा सपशेल खोटा, आत्मसमर्पण करणाऱ्या 'चंद्राण्णा'वर साधला निशाणा
12
IND vs AUS : ७ वेळच्या वर्ल्ड चॅम्पियनसमोर जेमी-हरमनप्रीतची हवा; दोघींनी मिळून सेट केला नवा विक्रम
13
बिहार निवडणुकीत काँग्रेस-राजदला किती जागा मिळणार?; PM नरेंद्र मोदींची 'भविष्यवाणी'
14
विदर्भाला बसला ‘माेंथा’ चक्रीवादळाचा फटका ! पुढचे तीन दिवस अवकाळीचे संकट ; नोव्हेंबरपर्यंत जोर राहणार कायम?
15
शिवरायांच्या गडकिल्ल्यांवर मोदींच्या नावाने उघडणार 'नमो पर्यटन केंद्र'; राज ठाकरेंचा तीव्र विरोध
16
खासगी क्षणात अडथळा ठरत होती प्रेयसीची चिमुकली! प्रियकरानं उचललं टोकाचं पाऊल? जाणून तुमचाही थरकाप उडेल! 
17
याला म्हणतात शेअरचा धमाका...! गुंतवणूकदारांना केलं मालामाल; १०००० चे फक्त १० महिन्यांत बनवले 5 लाख; अजूनही तेजी कायम
18
महाराष्ट्रातला मोर्चा दणदणीत झाला पाहिजे, राज ठाकरेंचं आवाहन; मतचोरीवरून मेळाव्यात केले सादरीकरण
19
सरन्यायाधीश गवई यांच्यानंतर पुढचे सरन्यायाधीश कोण असतील? सरकारने केली मोठी घोषणा
20
Bihar Election: नितीश कुमारी की, तेजस्वी यादव, बिहारमध्ये कोणाचे सरकार येणार? फलोदी सट्टा बाजाराचा कौल काय?

शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:42 IST

मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई - मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. रमजानमुळे पुढील एक महिना आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील तापमान ३३ ते ४० अंशावर गेले आहे. उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. यामुळे काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. एक महिन्यापासून फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. रोज कोकणसह दक्षिणेतील राज्यांमधून तब्बल ८०० ते १६०० टन आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. गत आठवड्यामध्ये एकाच दिवशी सव्वालाख पेट्यांची आवक झाली होती.होलसेल मार्केटमध्ये २०० ते ५०० रुपये दराने हापूस आंब्याची विक्री होत असून इतर आंबा ३० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. उन्हाळ्यामुळे कलिंगडाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागामधून व इतर राज्यांमधून रोज ५०० ते ६०० टन कलिंगडाची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये ८ ते १३ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. मोसंबी व संत्रीचीही जवळपास २०० टन आवक सुरू आहे. खरबुजालाही शहरवासीयांकडून मागणी वाढत असून जवळपास १५० टन आवक रोज होत आहे.रमजानच्या महिन्यामध्ये फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. पुढील एक महिना मार्केटमधील आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कलिंगड, खरबूज व आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. देशभरातून मार्केटमध्ये फळांची आवक होत आहे. विदेशामधूनही या तीन वस्तूंना मोठी मागणी असून आखाती देशामधील निर्यात या महिन्यात दुपटीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढू लागली आहे. पुढील एक महिना आंब्यासह कलिंगड, खरबूज व इतर फळांना मागणी जास्त असणार आहे. आखाती देशांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबई