शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

शहरवासीयांकडून फळांची मागणी वाढली, ३ हजार टन आवक

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2019 02:42 IST

मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे.

नवी मुंबई - मुंबई व नवी मुंबईकरांकडून फळांची मागणी वाढली आहे. बाजार समितीमध्ये सरासरी रोज ३ हजार टन फळांची आवक सुरू झाली आहे. सर्वाधिक आवक आंब्याची होत असून कलिंगडालाही मागणी वाढली आहे. रमजानमुळे पुढील एक महिना आवक मोठ्या प्रमाणात वाढणार आहे.तीव्र उकाड्यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. शहरातील तापमान ३३ ते ४० अंशावर गेले आहे. उकाड्यापासून सुटका व्हावी यासाठी फळांच्या रसाला मागणी वाढली आहे. यामुळे काही दिवसांपासून बाजार समितीमध्ये फळांची मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. एक महिन्यापासून फळांच्या राजाचे राज्य सुरू झाले आहे. रोज कोकणसह दक्षिणेतील राज्यांमधून तब्बल ८०० ते १६०० टन आंबा विक्रीसाठी येऊ लागला आहे. गत आठवड्यामध्ये एकाच दिवशी सव्वालाख पेट्यांची आवक झाली होती.होलसेल मार्केटमध्ये २०० ते ५०० रुपये दराने हापूस आंब्याची विक्री होत असून इतर आंबा ३० ते ६० रुपये किलो दराने विकला जात आहे. उन्हाळ्यामुळे कलिंगडाची विक्रीही मोठ्या प्रमाणात होत आहे. महाराष्ट्राच्या विविध भागामधून व इतर राज्यांमधून रोज ५०० ते ६०० टन कलिंगडाची आवक सुरू आहे. होलसेल मार्केटमध्ये ८ ते १३ रुपये किलो दराने विक्री होऊ लागली आहे. मोसंबी व संत्रीचीही जवळपास २०० टन आवक सुरू आहे. खरबुजालाही शहरवासीयांकडून मागणी वाढत असून जवळपास १५० टन आवक रोज होत आहे.रमजानच्या महिन्यामध्ये फळांना मोठ्या प्रमाणात मागणी वाढत असते. पुढील एक महिना मार्केटमधील आवक अजून मोठ्या प्रमाणात वाढणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली आहे. कलिंगड, खरबूज व आंब्याची मोठ्या प्रमाणात विक्री होणार आहे. देशभरातून मार्केटमध्ये फळांची आवक होत आहे. विदेशामधूनही या तीन वस्तूंना मोठी मागणी असून आखाती देशामधील निर्यात या महिन्यात दुपटीपेक्षा जास्त होणार असल्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे.एपीएमसीमध्ये फळांची आवक वाढू लागली आहे. पुढील एक महिना आंब्यासह कलिंगड, खरबूज व इतर फळांना मागणी जास्त असणार आहे. आखाती देशांमधूनही मोठ्या प्रमाणात मागणी वाढत आहे.- संजय पानसरे,व्यापारी प्रतिनिधी

टॅग्स :foodअन्नNavi Mumbaiनवी मुंबई