शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्याचे निवडणूक प्रमुख ठरले; मोठ्या नेत्यांना दिली जबाबदारी, यादी केली जाहीर
2
बोगस मतदानाच्या राहुल गांधींच्या आरोपामुळे खळबळ, तपासात १४ मतदारांनी आपण खरे असल्याचा केला दावा
3
भारतीय महिला संघाने घेतली पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट; विश्वचषक ट्रॉफीसह फोटो समोर आला
4
"एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रिपद दिलं तर ते पुन्हा परत करतात म्हणून मी...", मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं विधान
5
भारतीय महिला क्रिकेटचे 'अच्छे दिन'! विश्वविजेत्या लेकींच्या हस्ताक्षरानं सजलेली 'नंबर वन नमो' जर्सी
6
अंतराळात मोठी दुर्घटना टळली! चीनचे स्पेस स्टेशन स्थानक धडकले, संशोधकांचे परतणे पुढे ढकलले
7
तेलंगणात युध्दबंदीला आणखी सहा महिने मुदतवाढ, माओवाद्यांची घोषणा, शांतता प्रस्तावाला सरकारने प्रतिसाद दिल्याचा दावा
8
आता महाराष्ट्रात इंटरनेट होणार सुपरफास्ट! एलॉन मस्क यांच्या 'स्टारलिंक'शी करार, ठरले भारतातील पहिले राज्य
9
नेटफ्लिक्सवरील 'मनी हाइस्ट' शो पाहिला, टोळी तयार केली; १५० कोटींची फसवणूक, दिल्लीतील धक्कादायक घटना
10
Minuteman 3: अमेरिकेने केली अण्वस्त्र मिसाईलची चाचणी, किती शक्तिशाली आहे मिनटमॅन 3? 
11
प्रियकरासोबत मिळून पतीला संपवलं, मृतदेहाचे तुकडे करून किचनमध्ये गाडले; १४ महिन्यांनी गूढ उकललं
12
धक्कादायक! गव्हाला किडे लागू नये म्हणून ठेवलेल्या गोळ्यांमुळे दोघांचा मृत्यू, तुम्ही ही चूक करु नका
13
संजय राऊतांची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल; अलीकडेच प्रकृतीविषयी दिली होती माहिती
14
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
15
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
16
"नाशिकमधील भाजप आमदाराची माजी नगरसेवकाकडूनच सुपारी", ठाकरेंच्या नेत्याच्या दाव्याने खळबळ
17
Bank Job: बँकेत नोकरी शोधताय? पीएनबी करणार तुमचं स्वप्न साकार, 'या' पदांसाठी भरती सुरू!
18
मत चोरीचा मुद्दा: प्रशांत किशोरांचा राहुल गांधींना सल्ला; म्हणाले, "त्यांनी लढले पाहिजे आणि..."
19
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
20
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?

मोबाइल तिकीट सेवेला विलंब, आयआयटीएस कार्यप्रणालीत अडचणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 5, 2018 04:44 IST

प्रवाशांची नाराजी : एनएनएमटीच्या आयआयटीएस कार्यप्रणालीत अडचणी

योगेश पिंगळे

नवी मुंबई : नवी मुंबई शहराबरोबर शेजारील शहरांमध्ये देखील वाहतुकीचे जाळे पसरविणारा नवी मुंबई परिवहन उपक्रम आर्थिक तोट्यात आहे. अनावश्यक होणारा तोटा भरून काढण्यासाठी, तसेच प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने महापालिकेने सुरू केलेल्या आयआयटीएस कार्यप्रणालीत विविध अडचणी येत आहेत. जीपीएस आणि ओबीट्सच्या साहाय्याने चालणाऱ्या मोबाइल अ‍ॅप आणि बस ट्रॅकर या सुविधा वापरताना प्रवाशांना अनेक वेळा चुकीची माहिती मिळत असल्याने विविध अडचणी येत आहेत. विलंब झालेल्या या सुविधेमधील स्मार्ट कार्ड आणि मोबाइल तिकिटिंग सेवा अद्याप सुरूच झालेली नाही. त्यामुळे प्रवाशांनी या सेवेवर नाराजी व्यक्त केली आहे.

नवी मुंबईतील नागरिकांना दळणवळणाची सुविधा उपलब्ध होण्यासाठी १९९६ साली नवी मुंबई महापालिकेच्या परिवहन उपक्र माची स्थापना झाली. शहरातील नागरिकांना प्रवासाची सुविधा देण्याबरोबर कल्याण, डोंबिवली, उरण, मुंबई, पनवेल, ठाणे, मुंब्रा आदी शहराबाहेरील भागात देखील एनएमएमटीचे जाळे मोठ्या प्रमाणावर पसरले आहे. प्रवाशांना सुविधा देण्याच्या दृष्टीने परिवहन उपक्र माकडून आवश्यक असलेल्या मार्गावर बसची संख्या देखील वाढविण्यात आली आहे.राज्यातील इतर परिवहन उपक्रमांप्रमाणे नवी मुंबईची परिवहन सेवा देखील आर्थिक तोट्यात आहे. हा तोटा भरून काढण्याच्या दृष्टीने तत्कालीन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आयआयटीएस कार्यप्रणाली राबविण्याचा निर्णय घेतला होता. तसेच याबाबतचे काम २0१७ साली सुरू देखील करण्यात आले होते. यामध्ये प्रामुख्याने मोबाइल अ‍ॅप, बस ट्रॅकर, स्मार्ट कार्ड, मोबाईल तिकिटिंग यासारख्या महत्त्वाच्या सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार होत्या. यामध्ये इंटरनेटद्वारे जीपीएस आणि ओबीट्सच्या साहाय्याने एनएमएमटी बसबाबतची माहिती एनएमएमटी कंट्रोल रूम आणि प्रवाशांना मोबाइल फोनवर उपलब्ध होणार होती. परंतु प्रत्यक्षात ही सुविधा वापरताना प्रवाशांना विविध अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

मोबाइल अ‍ॅपवर इच्छित स्थळी प्रवासासाठी बस मार्ग, जवळचे बस स्टॉप आदी बाबी अनेक वेळा चुकीच्या दाखविल्या जात असल्याने प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. यामध्ये इच्छित स्थळी प्रवासासाठी जवळ बस स्टॉप असताना देखील मोबाइल अ‍ॅपवर न दर्शविणे, बस स्टॉपवर येणाºया बसच्या वेळा चुकीच्या दाखविणे, इच्छित स्थळी जाणारी बस असताना देखील अ‍ॅपवर त्याबाबत माहिती न मिळणे. प्रवाशांना अशा अनेक अडचणींना अनेक वेळा सामोरे जावे लागत आहे. आयआयटीएस कार्यप्रणालीची सुविधा सुरू करण्याची वेळ संपली असताना देखील स्मार्ट कार्ड, मोबाइल तिकिटिंग या सुविधा तांत्रिक अडचणींमुळे अद्याप सुरू झालेल्या नाहीत. बस स्टॉपवर प्रवाशांना बसबाबत माहिती देणारे डिजिटल बोर्ड (पब्लिक इन्फॉर्मेशन सिस्टीम) देखील वारंवार नादुरु स्त होत आहेत. कोट्यवधी रु पये खर्च करून राबविण्यात येणारी आयआयटीएस सुविधा पूर्ण क्षमतेने सुरू करण्याची मागणी प्रवासी करीत आहेत.आयआयटीएस प्रणालीमधील स्मार्ट कार्ड ही सुविधा येत्या १५ ते २0 दिवसात सुरू होणार आहे. मोबाइल अ‍ॅप आणि बस ट्रॅकर व्यवस्थितरीत्या काम करीत असून याबाबत अद्याप कोणत्याही तक्र ारी प्राप्त झालेल्या नाहीत. बस स्टॉपवर लावण्यात आलेल्या पीआयएस बोर्डची नासधूस करण्याच्या घटना घडत आहेत.- शिरीष आरदवाड, व्यवस्थापक, परिवहन उपक्र म 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईMobileमोबाइल