शहरं
Join us  
Trending Stories
1
'ऑपरेशन सिंदूरमध्ये ८ विमाने पडली'; 'टॅरिफ'ने भारत-पाक युद्ध थांबवल्याचा ट्रम्प यांचा नवा गौप्यस्फोट
2
जगातील सर्वात महागडं पॅकेज; मस्क यांची कमाई सिंगापूर, UAE, स्वित्झर्लंडच्या GDP पेक्षाही अधिक, किती मिळणार सॅलरी?
3
आजचे राशीभविष्य,०७ नोव्हेंबर २०२५: नवे कार्य हाती घेऊ नका; मतभेद होणार नाहीत याची दक्षता घ्यावी
4
“शेतकऱ्यांना मोफत नको म्हणणाऱ्या अजित पवारांना फुकटात जमिनी लाटण्याचा भस्म्या”: काँग्रेस
5
घटस्फोटाची चर्चा असतानाच प्रसिद्ध अभिनेत्री रुग्णालयात दाखल, चाहत्यांना चिंता
6
एकनाथ शिंदेंचा अजितदादांना धक्का! २५ सरपंच, पदाधिकाऱ्यांसह बड्या नेत्याचा शिवसेनेत प्रवेश
7
राजस्थानमध्ये पकडला गेला 'ओसामा'; इंटरनेट कॉलिंगवर ४ वर्षांपासून होता अफगाणिस्तानातील दहशतवाद्यांच्या संपर्कात
8
राणेंच्या काॅलेजमध्ये MBBS प्रवेशासाठी मागितले ९ लाख रुपये, CETने दिले चाैकशीचे आदेश
9
३ राजयोगात कार्तिक संकष्ट चतुर्थी: ८ राशींवर बाप्पा-धनलक्ष्मी कृपा; पैसा-पदोन्नती-भाग्योदय!
10
अग्रलेख: लोकशाहीवरच प्रश्नचिन्ह! एच-फाईल्स अन् निवडणूक प्रक्रियेवरील विश्वासालाच तडा
11
गंगर कन्स्ट्रक्शनवर १०० कोटींच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल; एकच फ्लॅट दोघांना विकला!
12
हास्यास्पद खर्चमर्यादा अन् पैशांची उधळपट्टी... आगामी निवडणुकांमध्ये रंगणार वर्चस्वाची लढाई
13
२ अभियंत्यांना वाचवण्यासाठी रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाने घेतला २ निष्पाप प्रवाशांचा बळी
14
अजित पवारांचे पुत्र पार्थ यांचा जमीन घोटाळा; ३०० कोटींत खरेदी केली १८०० कोटींची जमीन
15
तोपर्यंत 'त्या' नागरिकाला मतदानाचा अधिकार नाही; युवतीच्या अर्जावर ६ आठवड्यांत निर्णय घ्या!
16
नेरळ-माथेरान मिनी ट्रेनचे इंजिन पुन्हा धडधडले; मोठ्यांसह बच्चेकंपनी खूश; वेळापत्रकही जाहीर
17
शिंदेसेनेला अंगावर घेणारे भाजपाचे आमदार संजय केळकर निवडणूक प्रमुख; महायुतीची शक्यता दुरावली
18
ठाणे, दिवा अन् कल्याणमध्येही प्रवाशांचे प्रचंड हाल; लोकल कर्जतकडे वळवल्याने प्रवासी संतप्त
19
शिंदेसेना-भाजपचे परस्परांना युती तोडून टाकण्याचे आव्हान; दोन्ही गटांची एकमेकांवर टीकास्त्र
20
मेट्रोची भाडेवाढ? समितीसाठी केंद्राकडे प्रस्ताव; अंधेरी, दहिसर मेट्रो भाडे वाढण्याची शक्यता

बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, ५० टन माल कचऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 04:09 IST

५० टन माल कचऱ्यात : वांगी आणि कोबी खराब होण्याचे प्रमाण वाढले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. गुजरातवरून आलेल्या वांग्याला उठाव नसल्यामुळे व माल खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्यात फेकून द्यावा लागला. ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येवू लागला आहे. मंगळवारी तब्बल ७८१ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. १९५२ टन पालेभाज्यांचीही आवक झाली होती. आवक वाढू लागल्यामुळे बाजारभाव कोसळू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये वांग्याची आवकही प्रचंड वाढली आहे. पुणे, नाशिक परिसराबरोबर गुजरातवरून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत आहे. गुरुवारी तब्बल ३५३ क्विंटल वांगी विक्रीसाठी आली होती. त्यामध्ये खराब मालाची विक्री झाली नसल्यामुळे तो फेकून द्यायची वेळ आली. हलक्या दर्जाची वांगी ६ ते १० रुपये किलो दराने विकली गेली. चांगल्या दर्जाची वांगी १४ ते २० रुपये किलो दराने विकली गेली. टोमॅटोची आवकही वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये ३२२ टन टोमॅटोची आवक होवू लागली आहे. ३ ते ६ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे. घसरलेल्या भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले आहे. १३१ टन कोबीचीही आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये कोबी ४ ते ८ रुपये किलो दराने विकण्यात आला. भोपळा, काकडी, सिमला मिरची, फ्लॉवर व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. खराब मालाचे प्रमाणही वाढले असून मोठ्या प्रमाणात माल कचºयामध्ये फेकून द्यावा लागत आहे.

बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी खराब झाल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला आहे. मार्केटमध्ये खराब मालाचे ढिगारे पाहावयास मिळत होते. मागणीपेक्षा आवक जास्त झाली असल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. हलक्या दर्जाचा माल खरेदीच केला जात नसून तो फेकून द्यावा लागत आहे. विक्री न झालेला माल दुसºया दिवशी कमी दराने विकावा लागत असून तो खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईमध्ये चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मुंबईत माल विक्रीसाठी पाठवत आहेत. गुजरात व इतर ठिकाणचे शेतकरी व व्यापारीही मुंबईत माल पाठवत आहेत. परंतु येथेही बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.या आठवड्यामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. खराब मालाचे प्रमाणही वाढत असून तो फेकून द्यावा लागत आहे.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसीबाजार समितीमधील आवक पुढीलप्रमाणेवस्तू आवक (क्विंटल)भोपळा १०६०फ्लॉवर १७७१गाजर १७२१कोबी १३१०टोमॅटो ३२२८वांगी ३६२कांदापात ७३७००कोथिंबीर १८२४००मेथी ९६८००पालक २६३००पुदिना ९५७०० 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी