शहरं
Join us  
Trending Stories
1
‘अच्छे दिन’ आल्याने आम्हालाही काही मिळावे हा भाव सोडा; सरसंघचालक भागवतांनी टोचले कान
2
सिनेमाचं आमिष, पार्ट्यांचा बहाणा...;खेवलकरच्या मोबाईलमध्ये १७०० अश्लील फोटो अन् व्हिडिओ, महिलांची तस्करी उघड
3
शालार्थ आयडी घोटाळा: राज्य शासनाची ‘एसआयटी’ गठीत, पुणे विभागीय आयुक्तांच्या नेतृत्वात तीन सदस्यीय समिती करणार तपास
4
महाराष्ट्रातील गरजू आणि पात्र शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळणार; महसूलमंत्री बावनकुळे यांनी दिली महत्त्वाची माहिती
5
कपिल शर्माच्या कॅनडा कॅफेमध्ये पुन्हा गोळीबार, 'या' गुंडाने व्हिडीओ पोस्ट करून जबाबदारी घेतली
6
राज ठाकरे सोबत आले, तर शिवसेना (UBT) इंडिया आघाडीतून बाहेर पडणार का? उद्धव ठाकरे म्हणाले...
7
'तुमच्याकडे पुरावे आहेत, न्यायालयात का जात नाही?', राहुल गांधींच्या आरोपांवर भाजपचा पलटवार
8
राहुल गांधींनी उल्लेख केलेला आदित्य श्रीवास्तव खरोखरच ३ राज्यांत मतदार आहे? समोर आली अशी माहिती  
9
शुबमन गिलची आशिया कपसाठीच्या संघातून सुट्टी? Duleep Trophy स्पर्धेत लागलीये कॅप्टन्सीची ड्युटी
10
'त्यांच्या मेंदूची चीप चोरीला गेलीये, म्हणून ते...'; CM देवेंद्र फडणवीस राहुल गांधींच्या ECI वरील आरोपांवर भडकले
11
Asia Cup 2025 मध्ये IND vs PAK सामना रद्द होणार का? दुबईतून आली मोठी अपडेट
12
या पाच कारणांमुळे डोनाल्ड ट्रम्प भडकलेत; म्हणून भारतावर कर लावलेत
13
येसूबाई अन् 'शंभुराज'! प्राजक्ता गायकवाडचा झाला साखरपुडा; होणाऱ्या नवऱ्यासोबत फोटोशूट
14
VIDEO : सॉरी सॉरी...! वैभव सूर्यवंशीची पॉवर; गोळीच्या वेगानं मारला चेंडू; बचावासाठी कॅमेरामनची 'कसरत'
15
ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी सॅमसंगने आणलाय 5G फोन, किंमतही कमी!
16
रिक्षातून घरी जाणाऱ्या महिलेचं अपहरण, कारमध्ये नेऊन बलात्काराचा प्रयत्न, पाच जणांविरोधात गुन्हा दाखल
17
धुळ्यात ईव्हीएम स्ट्राँगरूम बाहेर ड्युटीवर असताना पोलिसाने स्वतःवरच झाडली गोळी
18
संजू सॅमसन राजस्थानची साथ सोडणार, मॅनेजमेंटकडे रिलीज करण्याची विनंती; पण नियम काय सांगतो?
19
"राहुल गांधी यांचा हा करंटेपणा, त्यांना..."; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे का संतापले?
20
मंदिरात आला, पिंडीवर जल अर्पण केले, हात जोडले आणि तिथली भांडी चोरली, सीसीटीव्हीमध्ये रेकॉर्ड झाली चोरी

बाजारभाव पडल्यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान, ५० टन माल कचऱ्यात

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2018 04:09 IST

५० टन माल कचऱ्यात : वांगी आणि कोबी खराब होण्याचे प्रमाण वाढले

नवी मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्याची आवक प्रचंड वाढली असल्यामुळे बाजारभाव घसरू लागले आहेत. गुजरातवरून आलेल्या वांग्याला उठाव नसल्यामुळे व माल खराब झाल्यामुळे मोठ्या प्रमाणात कचऱ्यात फेकून द्यावा लागला. ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला असून शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

पावसाळ्यात लागवड केलेला भाजीपाला विक्रीसाठी बाजारात येवू लागला आहे. मंगळवारी तब्बल ७८१ ट्रक व टेंपोची आवक झाली होती. १९५२ टन पालेभाज्यांचीही आवक झाली होती. आवक वाढू लागल्यामुळे बाजारभाव कोसळू लागले आहेत. सद्यस्थितीमध्ये वांग्याची आवकही प्रचंड वाढली आहे. पुणे, नाशिक परिसराबरोबर गुजरातवरून मोठ्या प्रमाणात माल विक्रीसाठी येत आहे. गुरुवारी तब्बल ३५३ क्विंटल वांगी विक्रीसाठी आली होती. त्यामध्ये खराब मालाची विक्री झाली नसल्यामुळे तो फेकून द्यायची वेळ आली. हलक्या दर्जाची वांगी ६ ते १० रुपये किलो दराने विकली गेली. चांगल्या दर्जाची वांगी १४ ते २० रुपये किलो दराने विकली गेली. टोमॅटोची आवकही वाढली आहे. सद्यस्थितीमध्ये ३२२ टन टोमॅटोची आवक होवू लागली आहे. ३ ते ६ रुपये किलो दराने टोमॅटो विकला जात आहे. घसरलेल्या भावामुळे शेतकºयांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होवू लागले आहे. १३१ टन कोबीचीही आवक झाली असून होलसेल मार्केटमध्ये कोबी ४ ते ८ रुपये किलो दराने विकण्यात आला. भोपळा, काकडी, सिमला मिरची, फ्लॉवर व पालेभाज्यांची आवक वाढली आहे. खराब मालाचे प्रमाणही वाढले असून मोठ्या प्रमाणात माल कचºयामध्ये फेकून द्यावा लागत आहे.

बाजार समितीच्या भाजी मार्केटमध्ये गुरुवारी खराब झाल्यामुळे ५० टनपेक्षा जास्त माल फेकून द्यावा लागला आहे. मार्केटमध्ये खराब मालाचे ढिगारे पाहावयास मिळत होते. मागणीपेक्षा आवक जास्त झाली असल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. हलक्या दर्जाचा माल खरेदीच केला जात नसून तो फेकून द्यावा लागत आहे. विक्री न झालेला माल दुसºया दिवशी कमी दराने विकावा लागत असून तो खराब होण्याचे प्रमाण वाढत आहे. मुंबईमध्ये चांगला बाजारभाव मिळेल या अपेक्षेने शेतकरी मुंबईत माल विक्रीसाठी पाठवत आहेत. गुजरात व इतर ठिकाणचे शेतकरी व व्यापारीही मुंबईत माल पाठवत आहेत. परंतु येथेही बाजारभाव मिळत नसल्यामुळे अनेकांची निराशा झाली आहे.या आठवड्यामध्ये भाजीपाल्याची आवक मोठ्या प्रमाणात होऊ लागली आहे. आवक वाढल्यामुळे बाजारभाव कमी झाले आहेत. खराब मालाचे प्रमाणही वाढत असून तो फेकून द्यावा लागत आहे.- शंकर पिंगळे,व्यापारी प्रतिनिधी, एपीएमसीबाजार समितीमधील आवक पुढीलप्रमाणेवस्तू आवक (क्विंटल)भोपळा १०६०फ्लॉवर १७७१गाजर १७२१कोबी १३१०टोमॅटो ३२२८वांगी ३६२कांदापात ७३७००कोथिंबीर १८२४००मेथी ९६८००पालक २६३००पुदिना ९५७०० 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईFarmerशेतकरी