शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:31 IST

वाशीतून अपहरण झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून, त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

नवी मुंबई : वाशीतून अपहरण झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून, त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना व्हिसेराची प्रतीक्षा असून तो मिळण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे.वाशी येथे राहणाºया शिलवंत सोनकटले (२६) या तरुणाचे अपहरण करून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या या तरुणाच्या मोबाइलवरून त्याच्या मित्राच्या मोबाइलवर आपले अपहरण झाल्याचा मेसेज आला होता. यानंतर त्या मित्राने व शिलवंतच्या कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो झाला नाही. यामुळे त्यांनी शिलवंत याचे अपहरण झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर चार दिवसात शिलवंत याचा मृतदेह आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील नदीमध्ये आढळून आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असता, त्याच्या शरीरावर कसलीही जखम आढळलेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच वाशी पोलिसांच्या पथकाने देखील त्याठिकाणी जावून पाहणी केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असा कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, शिलवंत याच्या मृत्यूचे कारण कळण्यासाठी आंध्रप्रदेश पोलिसांकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा व्हिसेरा अहवाल मिळण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळणार असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.>बेपत्ता झाल्याच्या दिवशी शिलवंत हा वाशी रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटा फिरत होता. त्याठिकाणी त्याने एका एटीएम मशिनमधून पैसे काढले असल्याचे त्याचे बँक व्यवहार व्यवहार तपासताना पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यानुसार पोलिसांनी त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्येही तो एकटाच दिसून आलेला आहे. मात्र यानंतर त्याने कोणाला संपर्क साधला व कुठे गेला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.