शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

‘त्या’ तरुणाच्या मृत्यूचे गूढ कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 15, 2017 02:31 IST

वाशीतून अपहरण झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून, त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे.

नवी मुंबई : वाशीतून अपहरण झालेल्या तरुणाच्या मृत्यूचे गूढ अद्याप कायम असून, त्याची हत्या की आत्महत्या असा प्रश्न पोलिसांनाही पडला आहे. त्यामुळे या प्रकरणाचा उलगडा करण्यासाठी पोलिसांना व्हिसेराची प्रतीक्षा असून तो मिळण्यासाठी किमान आठवडा लागण्याची शक्यता आहे.वाशी येथे राहणाºया शिलवंत सोनकटले (२६) या तरुणाचे अपहरण करून हत्या झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे. सॉफ्टवेअर इंजीनिअर असलेल्या या तरुणाच्या मोबाइलवरून त्याच्या मित्राच्या मोबाइलवर आपले अपहरण झाल्याचा मेसेज आला होता. यानंतर त्या मित्राने व शिलवंतच्या कुटुंबीयांनी त्याच्या मोबाइलवर संपर्क साधला असता तो झाला नाही. यामुळे त्यांनी शिलवंत याचे अपहरण झाल्याची तक्रार वाशी पोलिसांकडे केली होती. त्यानंतर चार दिवसात शिलवंत याचा मृतदेह आंध्रप्रदेशमधील विजयवाडा येथील नदीमध्ये आढळून आला. मृतदेह ताब्यात घेतल्यानंतर स्थानिक पोलिसांनी पाहणी केली असता, त्याच्या शरीरावर कसलीही जखम आढळलेली नाही. या प्रकरणाची माहिती मिळताच वाशी पोलिसांच्या पथकाने देखील त्याठिकाणी जावून पाहणी केली. मात्र त्याच्या मृत्यूचे नेमके कारण कळेल असा कोणताही ठोस पुरावा पोलिसांच्या हाती लागलेला नाही. दरम्यान, शिलवंत याच्या मृत्यूचे कारण कळण्यासाठी आंध्रप्रदेश पोलिसांकडून शवविच्छेदन करण्यात आले आहे. त्याचा व्हिसेरा अहवाल मिळण्यासाठी एक आठवड्याचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. हा अहवाल प्राप्त झाल्यानंतर तपासाला योग्य दिशा मिळणार असल्याचे वाशी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अजयकुमार लांडगे यांनी सांगितले.>बेपत्ता झाल्याच्या दिवशी शिलवंत हा वाशी रेल्वेस्थानकाच्या आवारात एकटा फिरत होता. त्याठिकाणी त्याने एका एटीएम मशिनमधून पैसे काढले असल्याचे त्याचे बँक व्यवहार व्यवहार तपासताना पोलिसांच्या निदर्शनास आले आहे. यानुसार पोलिसांनी त्याठिकाणचे सीसीटीव्ही तपासले असता त्यामध्येही तो एकटाच दिसून आलेला आहे. मात्र यानंतर त्याने कोणाला संपर्क साधला व कुठे गेला हे अद्यापही गुलदस्त्यात आहे.