रेल्वे अपघातांत दोघांचा मृत्यू
By Admin | Updated: May 12, 2014 05:51 IST2014-05-12T05:51:25+5:302014-05-12T05:51:25+5:30
नेरूळ ते पनवेल दरम्यान घडलेल्या रेल्वेच्या दोन वेगवेगळ््या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत नेरूळ रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत वृध्दाच्या मृत्यूची घटना घडली आहे.

रेल्वे अपघातांत दोघांचा मृत्यू
नवी मुंबई : नेरूळ ते पनवेल दरम्यान घडलेल्या रेल्वेच्या दोन वेगवेगळ््या अपघातात दोघांचा मृत्यू झाला आहे. पहिल्या घटनेत नेरूळ रेल्वे स्थानक येथे रेल्वेच्या धडकेत वृध्दाच्या मृत्यूची घटना घडली आहे. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. अशोककुमार अग्रवाल (६१) असे मयत व्यक्तीचे नाव आहे. ते नेरूळ सेक्टर १० येथील त्रिमूर्ती अपार्टमेंट मध्ये रहायचे. रविवारी सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास नेरूळ रेल्वे स्थानक येथे हा अपघात घडला. अशोककुमार हे रेल्वे रूळ ओलांडत असताना मुंबईकडे जाणार्या रेल्वेची त्यांना धडक बसली. या धडकेने डोक्याला गंभीर जखम होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी वाशी रेल्वे पोलिस ठाण्यात घटनेची नोंद करण्यात आली आहे. दुसरी घटना पनवेल ते खांदेश्वर रेल्वे स्थानकादरम्यान घडली. यात रुळ ओलांडत असताना लोकलची धडक लागून ३० वर्षीय इसमाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. या अपघाती घटनेची नोंद पनवेल लोहमार्ग पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे. उंची साडेसहा फुट, अंगाने सडपातळ व अंगात काळ्या पिवळ्या पट्ट्यांचा टी शर्ट व त्यावर लाईट ब्ल्यू रंगाची जीन्स पँट अशा वर्णनाच्या या तरुणाची अद्याप ओळख पटलेली नसून या तरुणाबाबत कोणाला काही माहिती असल्यास त्यांनी पनवेल लोहमार्ग पोलीस ठाणे येथे संपर्क साधावा. (प्रतिनिधी)