शहरं
Join us  
Trending Stories
1
Kolkata Knight Riders फायनलमध्ये, गौतम गंभीरचं भारी सेलिब्रेशन; SRH कडे आहे दुसरी संधी
2
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
3
अरेस्ट वॉरंटच्या मागणीविरोधात इस्राइलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू संतप्त, ICC ला दिला असा इशारा 
4
Reel बनवण्याच्या नादात तरुणाने शेकडो फूट उंच कड्यावरून पाण्यात मारली उडी, बुडून मृत्यू   
5
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
6
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
7
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
8
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
9
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
10
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
11
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
12
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
13
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
14
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
15
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
16
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
17
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
18
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
19
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
20
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता

धोकादायक पुलावरून वाहतूक, अपघाताचा धोका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 01, 2019 5:05 AM

पनवेलमधील प्रकार : अपघाताचा धोका; संबंधित प्राधिकरणाने सूचना फलक लावून हात झटकले

वैभव गायकरपनवेल : ऐतिहासिक शहर म्हणून ओळख असलेल्या पनवेल शहराची स्मार्ट सिटीकडे वाटचाल सुरू आहे. मुंबई-गोवा महामार्गाचे रुंदीकरण, नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे काम-पुनर्वसन, रेल्वेस्थानकाचे विस्तारीकरण आदी कामे सुरू आहेत. मात्र, अद्यापही शहरात काही धोकादायक पुलांवरून अवजड वाहतूक सुरू आहे. त्यामुळे अपघाताची शक्यता नाकारता येत नाही.

महाडच्या सावित्री नदीवरील धोकादायक ब्रिटिशकालीन पूल रातोरात कोसळल्याने संपूर्ण देशभरात या घटनेची चर्चा झाली होती. त्यानंतर राज्यातील सर्वच धोकादायक पुलांचे स्ट्रक्चरल आॅडिट करण्याचे आदेश प्रशासनाला देण्यात आले होते. दोन वर्षांत शेकडो पुलांचे आॅडिट करण्यात आले, तर काही पूल नव्याने उभारण्यात आले. मात्र, आजही पनवेल तालुक्यातील काही धोकादायक पुलावरून वाहतूक सुरू आहे. पनवेलमध्ये महापालिका, सिडको, एमआयडीसी, सार्वजनिक बांधकाम विभाग, एमएसआरडीसी आदी प्राधिकरणे कार्यरत आहेत. शहरातील काही पूल धोकादायक आहेत. मात्र, या पुलाजवळ धोकादायक असल्याचे फलक लावून संबंधित यंत्रणा मोकळ्या झाल्या आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी बिनदिक्कत पुलावरून वाहतूक सुरू आहे. खारघर, तळोजा, पनवेल आदी ठिकाणी हे धोकादायक पूल आहेत. खारघरमधून सायन-पनवेल महामार्ग गाठण्यासाठी कोपरा पुलावरून जावे लागते.अनेक वर्षांपासून सिडकोने हा पूल धोकादायक असल्याचे जाहीर केले आहे. या पुलाला पर्याय म्हणून समांतर नवीन पूल उभारण्यात आला आहे. तसेच जुना पूल केवळ पादचाऱ्यांसाठी असल्याचे फलकही याठिकाणी लावले आहे. मात्र, तरी देखील या ठिकाणाहून सर्रास वाहनांची ये-जा सुरूच असते.कळंबोली-मुंब्रा महामार्गावरील नावडे गावाजवळ कासाडी नदीवर ब्रिटिशांनी उभारलेला पूल जीर्णावस्थेत आहे, तरीही पुलावरून अद्याप वाहनांची ये-जा सुरू आहे. एमएसआरडीसीअंतर्गत असलेल्या या पुलाला शंभर वर्षांपेक्षा जास्त कालावधी लोटला आहे. अशाच प्रकारे कोळीवाडा येथील पूल धोकादायक असल्याचे सांगत वाहतुकीस बंद करण्यात आला आहे. मात्र तरीही पुलावरून वाहतूक होताना दिसते. धोकादायक पुलांच्या पुनर्बांधणीची आवश्यकता आहे. मात्र, तसे न होता केवळ सूचना फलक लावून संबंधित प्राधिकरणमोकळे झाल्याचे अनेक ठिकाणी दिसून येते.दोन वर्षांनंतर धोकादायक पूल वाहतुकीस बंदखारघर शहर ते तळोजा गावाला जोडणारा पूल दोन वर्षांपूर्वी सिडकोने धोकादायक असल्याचे जाहीर केले होते. मात्र, तरी पुलावरून वाहतूक सुरूच होती. ‘लोकमत’ने याबाबत सविस्तर वृत्त प्रसिद्ध केल्यावर संबंधित प्रशासनाने पूल वाहतुकीस बंद केला.पनवेलमधील ग्रामीण भागात सार्वजनिक बांधकाम खात्याअंतर्गत दोन गावांना जोडणारे अनेक लहान पूल उभारण्यात आले आहेत. यापैकी काही पूल धोकादायक असून त्यांच्या स्ट्रक्चरल आॅडिटची आवश्यकता आहे. 

टॅग्स :Navi Mumbaiनवी मुंबईTrafficवाहतूक कोंडी