शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

वाशीत परप्रांतीयांच्या नोंदणीवेळी गर्दी उसळली; नियोजनाचा अभावामुळे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:28 IST

लॉकडाऊन मुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर व इतर व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठवले जाणार आहे.

नवी मुंबई - राज्याबाहेरील परप्रांतीयांना परत पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून प्रत्येक शहरात असे किती प्ररप्रांतीय आहेत याची चाचपणी सुरु आहे. त्याकरिता नाव नोंदणीसाठी वाशीतील भावे नाट्यगृहात परप्रांतीयांना बोलवण्यात आले होते. परंतु गर्दी वाढू लागल्याने काही वेळातच कामकाज बंद करून जमाव पांगवण्यात आला. 

लॉकडाऊन मुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर व इतर व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठवले जाणार आहे. त्यासाठी नवी मुंबईत विभागनिहाय किती परप्रांतीय आहेत हे तपासले जाणार आहे. त्याकरिता राज्याबाहेर जाऊ इच्छुक असलेले  परप्रांतीय व इतर व्यक्तींची नोंदणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्त व पालिका आयुक्त यांच्या मार्फत त्यासंबंधीचा नियोजन केले जाणार आहे. तत्पूर्वीच अनेक ठिकाणी गर्दी जमवून परप्रांतीयांची नाव नोंदणी करण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारातून शुक्रवारी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यानंतर शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेर अचानक परप्रांतीयांची गर्दी जमली होती.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव नोंदीसाठी त्यांना त्याठिकाणी जमवलं होतं असं सांगितलं जात होत. त्यानुसार सुरवातीच्या काही जणांची नोंदणी करून त्यांना फॉर्मचे वाटप करण्यात आले. परंतु याची माहिती सर्वत्र  पसरताच परप्रांतीयांनी मोठ्या संख्येने त्याठिकाणी गर्दी केली होती. रांगेत उभे असताना त्यांच्याकडून सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नव्हतं. शिवाय काहीजण घोळक्यानेही जमत होते. अखेर पोलिसांनी हि प्रक्रिया थांबवून जमावाला पांगवले. तसेच प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची याबाबत ठोस निर्णय झाल्यानंतरच प्रक्रिया सुरु केली जाईल असेही सांगितले.

या प्रकारावरून पालिका आणि पोलीस यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. दोषविरहित प्रक्रिया राबवण्यासाठी विभागनिहाय त्याच नियोजन होणे अपेक्षित आहे. लॉकडाऊन मुळे अडकलेल्या परप्रांतीयांबरोबरच मागील दीड महिन्यापासून गावांकडे जाण्यास इच्छुक असणारे देखील अनेकजण आहेत. त्यांच्याकडून देखील नोंदणीसाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ठिकठिकाणी अशा प्रकारे गर्दी जमण्याची शक्यता आहे. अशातच हि प्रक्रिया पोलिसांवर सोपवल्यास अगोदरच बंदोबस्त व इतर कामांचा ताण असलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पालिकेमार्फतच संपूर्ण प्रक्रिया राबवली जाण्याचीही आवश्यकता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या