शहरं
Join us  
Trending Stories
1
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
2
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
3
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
4
'ते विधान राहुल गांधींचे नाही, मी परस्परच..."; वकिलाचा यू-टर्न, जिवाला धोका असल्याच्या वक्तव्याबद्दल काय बोलले?
5
Arjun Tendulkar Engagement :अर्जुन तेंडुलकरची होणारी बायको, साराची खास मैत्रिण; सानिया चांडोकचे फोटो पाहा
6
Arjun Tendulkar Engagement : चांडोकांची लेक होणार सचिन तेंडुलकरची सून; मुंबईत पार पडला अर्जुन सानियाचा साखरपुडा
7
पुण्यात वाहतूक पोलीस आणि कॅब चालक यांच्यात वाद; शिवीगाळ करत मारहाण केली; व्हिडीओ व्हायरल
8
अरे व्वा...! काही तासांत क्लिअर होणार चेक; ४ ऑक्टोबरपासून दोन टप्प्यांत अंमलबजावणी
9
कबुतरखाने प्रकरणात राज ठाकरेंना साकडे; पण बाळा नांदगावकर स्पष्टच बोलले, कुणाला सुनावले?
10
धक्कादायक! जमिनीच्या वादातून भर चौकात नवरा-बायकोला संपवले; कोयत्याने वार
11
महायुतीत समन्वय समितीच्या बैठका वेळेवर होत नाही, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे नी दिली कबुली
12
'आमचे कोणतेही लष्करी मित्र नाहीत, फक्त भारतीय नौदलाकडे धाडस'; फिलिपिन्सच्या राजदूतांची पाश्चात्य देशांवर टीका
13
Fatehpur Tomb Controversy: ज्यांच्या मकबऱ्यामध्ये मंदिर असल्याचा दावा, ते नवाब अब्दुल समद कोण?
14
RR नं संजूच्या बदल्यात जड्डू अन् ऋतुराजला मागितले! CSK ला ते अजिबात नाही पटलं; ट्रेड डील फिस्कटली
15
सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी 'ऑपरेशन सिंदूर' आणि 'स्वदेशी' विषयी जनजागृती करावी - CM देवेंद्र फडणवीस
16
Video: राहुल गांधींची 'मृत' लोकांसोबत 'चाय पे चर्चा', निवडणूक आयोगाने मारल्याचा आरोप...
17
गणेशोत्सवासाठी कोकणवासीयांना खुशखबर! मुंबई-गोवा महामार्गाबाबत धडक कारवाईचे आदेश
18
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
19
Trump's Tariff Policy : ट्रम्प यांचा डाव उलटला! टॅरिफमुळे भारत अन् चीन एकत्र आले; अमेरिकेने स्वतःच्या पायावर कुऱ्हाड मारली?
20
निशिकांत दुबेला भाजपा नेत्यानेच कशी दिली मात?; कॉन्स्टिट्यूशन क्लब निवडणुकीत तोंडावर पाडले

वाशीत परप्रांतीयांच्या नोंदणीवेळी गर्दी उसळली; नियोजनाचा अभावामुळे काम थांबविले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 2, 2020 15:28 IST

लॉकडाऊन मुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर व इतर व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठवले जाणार आहे.

नवी मुंबई - राज्याबाहेरील परप्रांतीयांना परत पाठवण्यासाठीची प्रक्रिया सुरु करण्यात आली असून प्रत्येक शहरात असे किती प्ररप्रांतीय आहेत याची चाचपणी सुरु आहे. त्याकरिता नाव नोंदणीसाठी वाशीतील भावे नाट्यगृहात परप्रांतीयांना बोलवण्यात आले होते. परंतु गर्दी वाढू लागल्याने काही वेळातच कामकाज बंद करून जमाव पांगवण्यात आला. 

लॉकडाऊन मुळे राज्यात अडकून पडलेल्या परप्रांतीय मजूर व इतर व्यक्तींना त्यांच्या राज्यात पाठवले जाणार आहे. त्यासाठी नवी मुंबईत विभागनिहाय किती परप्रांतीय आहेत हे तपासले जाणार आहे. त्याकरिता राज्याबाहेर जाऊ इच्छुक असलेले  परप्रांतीय व इतर व्यक्तींची नोंदणी केली जाणार आहे. पोलीस आयुक्त व पालिका आयुक्त यांच्या मार्फत त्यासंबंधीचा नियोजन केले जाणार आहे. तत्पूर्वीच अनेक ठिकाणी गर्दी जमवून परप्रांतीयांची नाव नोंदणी करण्याचे प्रकार घडत आहेत. अशाच प्रकारातून शुक्रवारी रबाळे एमआयडीसी पोलिसांनी तिघांवर गुन्हा देखील दाखल केला आहे. त्यानंतर शनिवारी वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहाबाहेर अचानक परप्रांतीयांची गर्दी जमली होती.

पालिकेच्या अधिकाऱ्यांनी नाव नोंदीसाठी त्यांना त्याठिकाणी जमवलं होतं असं सांगितलं जात होत. त्यानुसार सुरवातीच्या काही जणांची नोंदणी करून त्यांना फॉर्मचे वाटप करण्यात आले. परंतु याची माहिती सर्वत्र  पसरताच परप्रांतीयांनी मोठ्या संख्येने त्याठिकाणी गर्दी केली होती. रांगेत उभे असताना त्यांच्याकडून सोशल डिस्टंसिंग पाळलं जात नव्हतं. शिवाय काहीजण घोळक्यानेही जमत होते. अखेर पोलिसांनी हि प्रक्रिया थांबवून जमावाला पांगवले. तसेच प्रक्रिया कशा पद्धतीने राबवायची याबाबत ठोस निर्णय झाल्यानंतरच प्रक्रिया सुरु केली जाईल असेही सांगितले.

या प्रकारावरून पालिका आणि पोलीस यांच्यातील समन्वयाचा अभाव दिसून आला. दोषविरहित प्रक्रिया राबवण्यासाठी विभागनिहाय त्याच नियोजन होणे अपेक्षित आहे. लॉकडाऊन मुळे अडकलेल्या परप्रांतीयांबरोबरच मागील दीड महिन्यापासून गावांकडे जाण्यास इच्छुक असणारे देखील अनेकजण आहेत. त्यांच्याकडून देखील नोंदणीसाठी गर्दी होणार आहे. त्यामुळे पुढील काही दिवस ठिकठिकाणी अशा प्रकारे गर्दी जमण्याची शक्यता आहे. अशातच हि प्रक्रिया पोलिसांवर सोपवल्यास अगोदरच बंदोबस्त व इतर कामांचा ताण असलेल्या पोलिसांची डोकेदुखी वाढू शकते. त्यामुळे पालिकेमार्फतच संपूर्ण प्रक्रिया राबवली जाण्याचीही आवश्यकता व्यक्त होत आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या