शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK Asia Cup Final : दुबईत विजयाचा जल्लोष झाला; पण टीम इंडियानं बहिष्कारानं केला शेवट; नेमकं काय घडलं?
2
IND vs PAK: आधी 'सिंदूर', आता विजय 'तिलक'! भारताने आशिया कप जिंकला, पाकिस्तान पराभूत
3
IND vs PAK: "खेळाच्या मैदानात 'ऑपरेशन सिंदूर' आणि..."; पंतप्रधान मोदींनी पाकिस्तानला डिवचलं
4
IND vs PAK : सिक्सर मारला तिलक वर्मानं अन् चर्चा गौतम गंभीरची; ड्रेसिंग रुममधील व्हिडिओ व्हायरल
5
IND vs PAK Final : अडचणीत आणणाऱ्या पाकला नडला! तिलक वर्माची कडक फिफ्टी!
6
VIDEO: हिशेब चुकता... हॅरिस रौफची दांडी गुल केल्यावर जसप्रीत बुमराहचं 'मिसाईल' सेलिब्रेशन
7
Suryakumar Yadav Out Or Not Out : सूर्याचा कॅच नीट पकडला की, पाक कॅप्टनकडून चिटींग? (VIDEO)
8
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या बाल व शिशू स्वयंसेवकांचा विजयादशमी उत्सव उत्साहात संपन्न
9
सांगलीत चारित्र्याच्या संशयातून पत्नीची गळा चिरून हत्या, मग पती स्वत:हून पोलिस ठाण्यात हजर
10
खेड: भीमा नदीपात्रात कार बुडून एकाचा मृत्यू; पाण्याचा अंदाज न आल्याने घटना घडल्याचा अंदाज
11
IND vs PAK Final : कुलदीपची कमाल! ओव्हर हॅटट्रिकसह मारला 'चौकार'; जोमात सुरुवात करून पाक कोमात
12
कर्तव्यनिष्ठ! वडिलांचे अंत्यसंस्कार झाले, दुसऱ्याच दिवशी धाराशिवचे 'सीईओ' मदतीसाठी बांधावर धावले!
13
तुमच्या कॅप्टनचं तुम्ही बघा, आमच्याच आम्ही बघतो! IND vs PAK Final मध्ये टॉस वेळी काय घडलं? (VIDEO)
14
“नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना महायुती सरकारने तत्काळ भरीव मदत द्यावी, अन्यथा...”: हर्षवर्धन सपकाळ
15
युवराज, उथप्पा, रैनाची मालमत्ता ED जप्त करणार? मनी लॉड्रिंग प्रकरणात आली महत्त्वाची अपडेट
16
“पाक लिंक खोटी, जेलमध्ये भेटायला दिले नाही, ते गांधीवादी...”; सोनम वांगचूकच्या पत्नीचा दावा
17
रेल्वे इंजिनमध्ये आता टँकरने डिझेल भरता येणार; शेडमध्ये जाण्याची गरज भासणार नाही!
18
जळगावमध्ये माजी महापौरांच्या फार्म हाऊसवर सुरू होतं धक्कादायक काम, पोलिसांची धाड, ८ जण अटकेत
19
IND vs PAK Final, Asia Cup 2025 : सूर्यानं टॉस जिंकला; हार्दिक पांड्या 'आउट'! रिंकूला संधी; कारण...
20
राज्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान, शरद पवार यांनी सरकारकडे केल्या पाच मागण्या

coronavirus: नवी मुंबईमध्येही आरोग्य विभागावरील ताण वाढला, ५०१ आरोग्य कर्मचाऱ्यांची गरज

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2021 02:50 IST

एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : एक महिन्यात नवी मुंबईमधील  सक्रिय रुग्णांच्या संख्येत तब्बल चारपट वाढ झाली आहे. प्रतिदिन ७००पेक्षा जास्त रुग्ण वाढत असून आरोग्य विभागावरील ताण वाढू लागला आहे. प्रमुख रुग्णालयांमध्ये बेड फुल झाले असून मनपाच्या केंद्रांमध्येही जागा अपुरी पडू लागली आहे. यामुळे बंद केलेली सर्व केंद्र पुन्हा सुरू करण्यात येणार आहेत. डॉक्टर व इतर आरोग्य कर्मचाऱ्यांचीही कमतरता असून तातडीने ५०१ कर्मचारी भरती करण्यासाठी कार्यवाही सुरू आहे.  (Stress on health department also increased in Navi Mumbai, 501 health workers needed)        नवी मुंबई पालिका कार्यक्षेत्रात एक महिन्यात ८३७४ नवीन रुग्ण वाढले असून रविवारी ७१७ रुग्ण वाढले आहेत. प्रादुर्भाव वाढू लाल्यामुळे आरोग्य विभागावरील ताणही वाढला आहे. बेड कमी पडू लागल्यामुळे यापूर्वी बंद केलेली सर्व कोरोना उपचार केंद्रे पुन्हा सुरू करण्यास सुरुवात झाली आहे. आतापर्यंत राधास्वामी सत्संग भवन, एपीएमसीमधील निर्यात भवन, एमजीएम सानपाडा व वाशीतील ईटीसी संस्थेमधील कोरोना उपचार केंद्र सुरू केली आहेत. उर्वरित केंद्रही लवकरच सुरू केली जाणार आहेत. नवीन केंद्र सुरू केल्यानंतर तेथे तज्ज्ञ डॉक्टर व इतर मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याचे आव्हान महानगरपालिकेसमोर उभे राहिले आहे. यापूर्वी तात्पुरत्या स्वरूपात भरती केलेल्या कर्मचाऱ्यांना रुग्ण कमी झाल्यानंतर कामावरून कमी केले होते. आता पुन्हा नवीन कर्मचारी वेळेत उपलब्ध करण्यासाठी महानगरपालिकेची धावपळ सुरू आहे. तब्बल ५०१ आरोग्य कर्मचारी भरती करण्यासाठीची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे. वेळेत नवीन कर्मचारी मिळाले नाहीत तर आहेत त्या कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताण वाढणार आहे.  

पालिका प्रशासनाची कसरतप्रमुख खासगी रुग्णालयांमधील बेड फुल होऊ लागले आहेत. रुग्णवाढ अशीच सुरू राहिली तर सर्वांना योग्य उपचार मिळवून देण्यासाठी महानगरपालिका प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. त्यामुळे कर्मचारी वाढवून भार हलका करण्याचा प्रयत्न असणार आहे.  

उपचारांविषयी तक्रारी वाढू लागल्याकोरोना रुग्णांच्या  उपचारांसह चाचण्यांच्या वैधतेविषयी तक्रारीही वाढू लागल्या आहेत. तुर्भे इंदिरानगरमधील एक व्यक्तीचा एकाच दिवशी एका ठिकाणी पॉझिटिव्ह व एका ठिकाणी निगेटिव्ह रिपोर्ट आला. नेरुळमध्येही एकाचा पहिल्या दिवशी पॉझिटिव्ह व लगेच दुसऱ्या दिवशी निगेटिव्ह रिपोर्ट आल्याचे निदर्शनास आले आहे. सानपाडामध्ये क्वारंटाइन सेंटरमधील एका मुलाच्या उपचारांकडे दुर्लक्ष झाल्याचा व्हिडीओही सोमवारी व्हायरल होऊ लागला होता. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई