शहरं
Join us  
Trending Stories
1
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
2
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
3
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
4
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
5
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
6
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
7
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
8
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
9
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला
10
मुंबईची वर्षभराची तहान भागणार, मुसळधार पावसाने सातही जलाशये जवळपास फुल्ल
11
बेस्ट पतपेढीच्या निवडणुकीआधी मतदारांच्या घरी पोहोचले पैसे; महायुतीच्या पॅनलवर मनसेचा गंभीर आरोप
12
'जय मल्हार'मध्ये खंडोबाची भूमिका साकारली, आता जेजुरीच्या पायथ्याशी देवदत्त नागे बांधतोय घर
13
४२ वर्षांच्या लढ्यानंतर कोल्हापूर सर्किट बेंच झाले आता खंडपीठाचा प्रस्ताव द्या: सरन्यायाधीश
14
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळेल ₹१४,६६३ चं फिक्स्ड व्याज; पाहा कोणती आहे स्कीम
15
बेस्ट पतपेढी कोणाच्या ताब्यात? आज मतदान, उद्या फैसला! ठाकरे बंधूंच्या युतीची पहिली कसोटी
16
RTIच्या सराईतांचा खेळ आता खल्लास! १० हजार अपील फेटाळले; राज्य माहिती आयोगाचा चाप
17
लंडनमध्ये आज ‘लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन’! भारतीय अर्थव्यवस्थेच्या लक्ष्यावर मंथन
18
पुन्हा निळ्या ड्रमाची दहशत, ड्रममध्ये सापडला तरुणाचा मृतदेह, पत्नी आणि तीन मुले बेपत्ता  
19
PF मधून १, २ की ३, किती वेळा काढू शकता पैसे? सतत काढण्यापूर्वी पाहा हा महत्त्वाचा नियम
20
‘कबुतर आ आ...’ कधी करावे? दाणे टाकण्यासंदर्भात पालिकेने मागवल्या सूचना; ई-मेल आयडीही दिला

Coronavirus : नाकाकामगारांवर आली उपासमारीची वेळ, पनवेलसह नवी मुंबईतील नाके ओस

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2020 07:28 IST

नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात.

- अनंत पाटील, वैभव गायकर नवी मुंबई, पनवेल : कोरोनाचा सर्वाधिक फटका नाकाकामगारांना बसू लागला आहे. पनवेलसह नवी मुंबईमधील प्रमुख नाक्यांवरील कामगारांची संख्या रोडावली आहे. भीतीमुळे अनेकांनी कामावर येणेच थांबविले असून, जे नाक्यावर येतात त्यांच्या हातालाही रोजगार मिळेनासा झाला आहे. ‘आमच्या हातावर सॅनिटायझर नको, काम हवे, तोंडाला मास्क नको, पोटभर अन्न हवे,’ अशा प्रतिक्रिया कामगार व्यक्त करत आहेत.नवी मुंबईमध्ये जवळपास दहा प्रमुख नाके आहेत. यामध्ये वाशी, तुर्भे, नेरुळ, ऐरोली नाक्यांचा समावेश आहे. प्रत्येक नाक्यावर एक हजार ते दीड हजार कामगार प्रतिदिन कामाच्या अपेक्षेने उभे राहत असतात. काही वेळेला  कामगारांची संख्या वाढत असते. कोरोनाची साथ पसरू लागल्यापासून बांधकाम व्यवसायावर परिणाम झाला आहे. नागरिकांकडून सुरक्षेला प्राधान्य दिले जात आहे, यामुळे घरांची दुरुस्ती, रंगकाम व इतर कामे थांबविण्यात आली आहेत. मोठ्या बांधकामाच्या ठिकाणचीही अनेक कामे थांबविण्यात आली आहेत, यामुळे पहाटे ७ पासून दुपारी २ वाजेपर्यंत नाक्यावर थांबले तरी कामच मिळत नाही. अनेकांना दिवसभर काम केले, तरच घरखर्च चालविता येतो. काही कामगार पुलाखाली व झोपडपट्टीमध्ये राहतात. कामच नसल्यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. काम मिळत नसल्यामुळे नाक्यावर येणाऱ्यांची संख्याही रोडावली आहे. प्रमुख नाक्यावर दररोज एक हजार ते १५०० कामगार उभे असायचे, आता २० ते २५ कामगार काम मिळेल या आशेने बसतात. मात्र, काम न मिळाल्याने निराश होऊन त्यांना घरचा रस्ता पकडून रिकाम्या हाताने परत जावे लागत असल्याची खंत घणसोली येथील नाकाकामगार हरिभाऊ कांबळे यांनी व्यक्त केली.कोरोनामुळे मुंबई आणि नवी मुंबईतील बांधकाम व्यवसाय आर्थिक मंदीत आल्यामुळे आम्हाला कोणी काम देत नाही. सरकारने या विषाणूची लागण होऊ नये म्हणून गर्दी टाळण्याचे आवाहन केले आहे, त्याचे स्वागत करतो. मात्र, हातावर पोट असलेल्या कामगारांनी जायचे कुठे? अशी प्रतिक्रि या जनार्दन शिंदे या नाकाकामगाराने दिली.

शहरातील बांधकाम व्यवसायावरही झाला परिणामकोरोनाचा फटका बांधकाम व्यवसायाला बसला आहे. नवीन बांधकामे, दुरुस्ती व इतर कामे जवळपास ठप्प असून याचा फटका पनवेलमधील नाकाकामगारांनाही बसला आहे. पनवेल शहरात मिडलक्लास सोसायटी परिसरात रस्त्यावरच हे नाकाकामगार नेहमी थांबत असतात. पनवेल परिसरात कोणत्याही प्रकारची कामे असल्यास संबंधित कंत्राटदार या ठिकाणी येऊन संबंधित कामगारांना घेऊन जात असतात. नजीकच्या आठवडाभरात कंत्राटदारांनी या नाक्याकडे पाठ फिरविल्याचे म्हणणे आहे. सर्व साइट बंद असल्याने या नाक्यावरील कामगारांना ताटकळत उभे राहवे लागत आहे. कोरोनासारख्या घातक विषाणूच्या फैलावामुळे अनेकांनी आपली कामे बंद केली आहेत.आम्ही जायचे कुठे?गावाकडे हाताला रोजगार मिळत नसल्याने शहरात आलो. नाक्यावर उभे राहून मिळेल ते काम करत आहे. रोजच्या रोजंदारीवरच घरखर्च भागत असून पैसे साठवून गावाकडे पाठवावे लागत आहेत. येथेही काम मिळणे मुश्कील झाल्याचे जायचे कुठे, अशी प्रतिक्रिया रामचंद्र शिंदे यांनी व्यक्त केली आहे.कामच नाही तर खायचे काय?खारघर शहरातील सेक्टर १२ मधील नाक्यावरील कामगारांनाही काम मिळेनासे झाले आहे. आठवडाभरापासून कामावर मोट्या प्रमाणात फरक पडल्याचे रमेश राठोड या कामगाराने सांगितले. नाक्यावर महिलांना ५०० व पुरु षांना ७०० रुपये हजेरी मिळत असते. मात्र, कामच नसल्याने एखादा कंत्राटदार त्या ठिकाणी आलाच तर तोट्यात जाऊन आम्हाला काम करावे लागत आहे. सुशिक्षित नागरिक घरी बसून काम करू शकतात. मात्र, हातावर पोट असल्याने आम्ही काय करायचे, कामच नसेल तर खायचे काय? असा प्रश्न कामगार उपस्थित करत आहेत. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNavi Mumbaiनवी मुंबई