शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

CoronaVirus News : मृत्युदर रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:47 IST

सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४,९६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २,८५0 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरविणारा आहे. कारण सोमवारपर्यंत कोरोनाने १६८ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांतच ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून, मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिका मुख्यालयात कोविड १९ वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत, तेथे मास स्क्रीनिंग शिबिर भरविले जात आहेत. त्या माध्यमातून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत. या अंतर्गत आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचार पद्धतीचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,२00 खाटांचे अद्यावत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.सुविधा व उपाययोजना पुरेशा व सक्षम असतानासुद्धा नवी मुंबईत मृतांचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे. १४ ते २२ जून या कालावधीत तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे.शहरात आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे हे प्रमाण ३ टक्के इतके आहे, ही बाब शहरवासीयांच्या मनात धडकी भरविणारी व प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.>ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईचा दुसरा क्रमांकठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका व तीन नगरपालिकांसह ठाणे ग्रामीण भागात सोमवारपर्यंत ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात २३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्या पाठोपाठ नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनामुळे १६८ जण मृत्युमुखी पडले आहेत. मिरा-भार्इंदर महापालिका कार्यक्षेत्रात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.>पाच महापालिकांतील रूग्णांचा आढावामहापालिकेचे नाव एकूण रूग्ण बरे झालेल मृत्यूठाणे ६२११ ३२४१ २३२नवी मुंबई ४९६१ २८५0 १६८कल्याण-डोबिंवली ३६९० १५९८ ७७उल्हासनगर १0८९ ३२८ ३६मिरा-भार्इंदर २२७५ १२५३ ११२>मृतांची वाढणारी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील डॉक्टर्स आवश्यक तेथे वैद्यकीय सल्ला देणार आहेत, तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होतात की नाही, यावर निगराणी ठेवणार आहेत. प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सचाही अवलंब केला जाणार आहे.- अण्णासाहेब मिसाळ,आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या