शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

CoronaVirus News : मृत्युदर रोखण्यासाठी टास्क फोर्सची स्थापना

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2020 23:47 IST

सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.

कमलाकर कांबळे नवी मुंबई : शहरात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे. दिवसागणिक रुग्णांची संख्या वाढत आहे. आतापर्यंत ४,९६१ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी २,८५0 रुग्ण बरे झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण दिलासादायक असले, तरी मृतांचा आकडा मात्र धडकी भरविणारा आहे. कारण सोमवारपर्यंत कोरोनाने १६८ बळी घेतले आहेत. विशेष म्हणजे, मागील आठ दिवसांतच ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. या पार्श्वभूमीवर प्रशासन आता अधिक सतर्क झाले असून, मृत्युदर कमी करण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश असलेल्या टास्क फोर्सची निर्मिती करण्यात आली आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स प्रत्यक्षरीत्या कार्यान्वित झाल्याची माहिती महापालिका आयुक्त अण्णासाहेब मिसाळ यांनी ‘लोकमत’ला दिली.कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून विविध स्तरांवर प्रयत्न सुरू आहेत. महापालिका मुख्यालयात कोविड १९ वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. त्या माध्यमातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जात आहेत. कोरोनाबाधितांचा शोध घेण्यासाठी ज्या भागात कोरोनाचे अधिक रुग्ण आढळले आहेत, तेथे मास स्क्रीनिंग शिबिर भरविले जात आहेत. त्या माध्यमातून संशयित रुग्णांचे स्वॅब घेऊन तपासणीसाठी पाठविले जात आहेत. या अंतर्गत आतापर्यंत ३५ हजारांपेक्षा अधिक नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे, तसेच कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी महापालिकेने त्रिस्तरीय उपचार पद्धतीचा अवलंब केला आहे. विशेष म्हणजे, अलीकडेच वाशी येथील सिडको एक्झिबिशन सेंटरमध्ये १,२00 खाटांचे अद्यावत कोविड रुग्णालय सुरू करण्यात आले आहे.सुविधा व उपाययोजना पुरेशा व सक्षम असतानासुद्धा नवी मुंबईत मृतांचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे. १४ ते २२ जून या कालावधीत तब्बल ५४ जणांचा मृत्यू झाला आहे. एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असतानाच, दुसरीकडे मृतांची संख्याही वाढत आहे.शहरात आतापर्यंत १६८ जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांचे हे प्रमाण ३ टक्के इतके आहे, ही बाब शहरवासीयांच्या मनात धडकी भरविणारी व प्रशासनाची चिंता वाढविणारी आहे.>ठाणे जिल्ह्यात नवी मुंबईचा दुसरा क्रमांकठाणे जिल्ह्यातील पाच महापालिका व तीन नगरपालिकांसह ठाणे ग्रामीण भागात सोमवारपर्यंत ७७१ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यात ठाणे महापालिका कार्यक्षेत्रात २३२ जणांचा कोरोनाने बळी घेतला आहे. त्या पाठोपाठ नवी मुंबई महापालिका कार्यक्षेत्रात कोरोनामुळे १६८ जण मृत्युमुखी पडले आहेत. मिरा-भार्इंदर महापालिका कार्यक्षेत्रात ११२ जणांचा मृत्यू झाला आहे.>पाच महापालिकांतील रूग्णांचा आढावामहापालिकेचे नाव एकूण रूग्ण बरे झालेल मृत्यूठाणे ६२११ ३२४१ २३२नवी मुंबई ४९६१ २८५0 १६८कल्याण-डोबिंवली ३६९० १५९८ ७७उल्हासनगर १0८९ ३२८ ३६मिरा-भार्इंदर २२७५ १२५३ ११२>मृतांची वाढणारी संख्या नक्कीच चिंताजनक आहे. हा मृत्युदर कमी करण्यासाठी टास्क फोर्स स्थापन करण्यात आली आहे. यात तज्ज्ञ डॉक्टरांचा समावेश करण्यात आला आहे. सोमवारपासून ही टास्क फोर्स कार्यान्वित करण्यात आली आहे. यातील डॉक्टर्स आवश्यक तेथे वैद्यकीय सल्ला देणार आहेत, तसेच रुग्णांवर योग्य पद्धतीने उपचार होतात की नाही, यावर निगराणी ठेवणार आहेत. प्रसंगी व्हिडीओ कॉन्फरन्सचाही अवलंब केला जाणार आहे.- अण्णासाहेब मिसाळ,आयुक्त, नवी मुंबई महापालिका

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्या