शहरं
Join us  
Trending Stories
1
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
2
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
3
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
4
मंगळ ग्रह गायब झाला तर पृथ्वीचं काय होणार? संशोधनातून धक्कादायक माहिती आली समोर  
5
"गुलामाने प्रतिक्रिया द्यायची नसते हे त्यांना सांगा"; अधिवेशनात उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंवर घणाघात
6
विरोधी पक्षनेतेपदाबाबत उद्धव ठाकरे आक्रमक, सरकारची कोंडी करण्याची तयारी; स्पष्ट इशाराच दिला
7
“अधिवेशानाचे सत्ताधाऱ्यांना गांभीर्य नाही, ‘हम करे सो कायदा’ पद्धतीने…”: हर्षवर्धन सपकाळ
8
“संसदीय लोकशाहीत विविध पक्षांच्या संघटनेचे योगदान देखील महत्त्वाचे”: मंत्री चंद्रकांत पाटील
9
“बाबा आणि आत्याने आईला खूप मारलं'”; ढसाढसा रडत ४ वर्षांच्या लेकाचा धक्कादायक खुलासा
10
अक्षय खन्नाला आहेत दोन भाऊ, एक सख्खा अन् एक सावत्र, दोघांनीही बॉलिवूडमध्ये केलं काम
11
विराट कोहली, रोहित शर्माला कपिल देव यांचा अजब सल्ला, म्हणाले- "मला वाटतं की टीम इंडियात..."
12
कॅमेरा नसलेला 'आयफोन' बाजारात? खरेच असा फोन अस्तित्वात आहे का? ॲप्पलच बनविते...
13
या ठिकाणी अचानक पडले ७०० मोठे खड्डे, जमिनीत गाडला जातोय संपूर्ण परिसर, कारण काय?
14
“साधूसंत झाडावर राहणार का? एक दिवस लोक सरकारला ‘चले जाव’ म्हणतील”; अण्णा हजारे संतापले
15
मैत्रिणींचा सोनमला वाचवण्याचा प्रयत्न? राजा रघुवंशीच्या भावाचा खळबळजनक आरोप
16
राहुल गांधींसोबतच्या बैठकीला शशी थरूर अनुपस्थित, चर्चांना उधाण, पक्षाने दिली अशी माहिती 
17
टाटा-हिंडाल्कोसह 'या' शेअर्समध्ये बंपर तेजी! बाजारात सलग दुसऱ्या दिवशी गुंतवणूकदारांची चांदी
18
Numerology: एकसारखे नंबर वारंवार दिसणे केवळ योगायोग नाही, तर उज्ज्वल भविष्याचे शुभ संकेत!
19
अजबच! घटस्फोट झाला, पण पत्नीने ना पोटगी मागितली ना... , उलट लग्नातल्या बांगड्याही केल्या परत, कोर्टही अवाक्   
20
नवा सिक्सर किंग! १४ वर्षीय वैभव सूर्यवंशीचा कहर! १४ षटकार ठोकत मोडला १७ वर्षांपूर्वीचा जागतिक विक्रम
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 00:35 IST

CoronaVirus Navi Mumbai news: नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढतेय; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.कोरोनाला हरवण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. नागरिकही आपल्यासह कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या शरीरात कोरोनाला हरवणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याने कोरोना विरोधातील लढाई आता निणार्यक टप्प्यावर आली असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात समूह संसर्गाच्या दिशेने जाणारा जिल्हा आता ठरावीक टप्प्यावर विसावला आहे.जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला संशयित सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. आतापर्यंत एक लाख ६५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. दिवसाला सुमारे चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. ४७ हजार ६६४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ४१ हजार ९०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही आकडेवारी २ आॅगस्टची आहे.सद्यस्थितीमध्ये ८ टक्के म्हणजेच चार हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल एक हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ते प्रमाण तीन टक्के आहे. ज्यांना विविध आजार आहेत, त्यांनाच मृत्यूने कवटाळले असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाला धिराने सामोरे गेल्यास आपण त्याला हरवू शकतो. यासाठी आपणाला काही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्याने त्रास जास्त होतो. सकारात्मक विचार खूपच महत्त्वाचे आहेत, असे कोरोना विरोधातील लढाई जिंकलेले पत्रकार अ‍ॅड. रत्नाकर पाटील आणि भारत रांजणकर यांनी सांगितले.दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामागे त्यांच्यामधील अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांतच रुग्ण बरे होत असल्याचे दररोज रुग्णांच्या अभ्यासावरून दिसून येते, असे येथील डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. तापाचा रुग्ण औषधे घेऊन बरे होतात. त्याचप्रमाणे, या आजाराबाबतही ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.तारीख रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मृत्यू२ जुलै २,७७४ (५५ टक्के) १३०२(३ टक्के)३ आॅगस्ट १२,५७५(७७ टक्के) १३०२(३ टक्के)२ सप्टेंबर २३,९२९ (८३टक्के) १३०२(३ टक्के)२ आॅक्टोबर ४२,३५६ (८९ टक्के) १३०२(३ टक्के)सरकार आणि प्रशासनाने सातत्याने कोरोनाच्या विरोधातील उपाययोजना राबवल्या आहेत. नागरिकही सजग झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे खूपच चांगले आहे. नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचाच हा परिणाम आहे. ज्यांना काही आजार आहेत, त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे अथवा त्यांचा मृत्यू होत आहे.- डॉ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या