शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
2
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
3
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
4
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
5
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
6
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
7
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
8
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
9
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
10
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
11
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...
12
"मी २७ वर्षांची असून बेकार, काहीच कमवत नाही", आमिरच्या लेकीची खंत; अभिनेता म्हणाला...
13
नाशिक: तो पळत गेला अन् उडी मारून स्कुटीवर बसला; पोलिसाच्या हाताला झटका देऊन आरोपी फरार
14
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
15
चपाती बनवताना तुम्हीही करता का 'ही' चूक? वाढू शकतो कॅन्सरचा धोका, वेळीच व्हा सावध
16
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
17
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
18
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
19
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
20
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 00:35 IST

CoronaVirus Navi Mumbai news: नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढतेय; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.कोरोनाला हरवण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. नागरिकही आपल्यासह कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या शरीरात कोरोनाला हरवणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याने कोरोना विरोधातील लढाई आता निणार्यक टप्प्यावर आली असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात समूह संसर्गाच्या दिशेने जाणारा जिल्हा आता ठरावीक टप्प्यावर विसावला आहे.जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला संशयित सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. आतापर्यंत एक लाख ६५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. दिवसाला सुमारे चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. ४७ हजार ६६४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ४१ हजार ९०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही आकडेवारी २ आॅगस्टची आहे.सद्यस्थितीमध्ये ८ टक्के म्हणजेच चार हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल एक हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ते प्रमाण तीन टक्के आहे. ज्यांना विविध आजार आहेत, त्यांनाच मृत्यूने कवटाळले असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाला धिराने सामोरे गेल्यास आपण त्याला हरवू शकतो. यासाठी आपणाला काही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्याने त्रास जास्त होतो. सकारात्मक विचार खूपच महत्त्वाचे आहेत, असे कोरोना विरोधातील लढाई जिंकलेले पत्रकार अ‍ॅड. रत्नाकर पाटील आणि भारत रांजणकर यांनी सांगितले.दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामागे त्यांच्यामधील अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांतच रुग्ण बरे होत असल्याचे दररोज रुग्णांच्या अभ्यासावरून दिसून येते, असे येथील डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. तापाचा रुग्ण औषधे घेऊन बरे होतात. त्याचप्रमाणे, या आजाराबाबतही ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.तारीख रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मृत्यू२ जुलै २,७७४ (५५ टक्के) १३०२(३ टक्के)३ आॅगस्ट १२,५७५(७७ टक्के) १३०२(३ टक्के)२ सप्टेंबर २३,९२९ (८३टक्के) १३०२(३ टक्के)२ आॅक्टोबर ४२,३५६ (८९ टक्के) १३०२(३ टक्के)सरकार आणि प्रशासनाने सातत्याने कोरोनाच्या विरोधातील उपाययोजना राबवल्या आहेत. नागरिकही सजग झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे खूपच चांगले आहे. नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचाच हा परिणाम आहे. ज्यांना काही आजार आहेत, त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे अथवा त्यांचा मृत्यू होत आहे.- डॉ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या