शहरं
Join us  
Trending Stories
1
कुंडमळा-मावळ येथील पूल दुर्घटना अत्यंत दुर्दैवी;दोंषीवर कारवाई करणार : अजित पवार
2
महाराष्ट्रात ४ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या; पराग सोमण वर्धा झेडपीचे नवे CEO, सौम्या शर्मा अमरावती पालिकेच्या आयुक्त
3
आम्हाला माहितीय खामेनेई कुठे लपलेत! इराणच्या 'सुप्रीम लीडर'ला ट्रम्प यांच्याकडून अल्टीमेटम
4
"घरी कुणी नाही, तू ये"; दोन मुलांच्या आईनं बॉयफ्रेंडला बोलावलं, पण पुढे जे झालं ते ऐकून बसेल धक्का!
5
माऊलीच्या भक्ताचा अनोखा सन्मान! आळंदी मंदिरास नांदेडच्या भाविकाकडून एक किलो सोन्याचा मुकुट अर्पण
6
अहमदाबाद प्लेन क्रॅश : अपघातस्थळावरून किती तोळे सोनं अन् रोख रक्कम मिळाली? प्रत्यक्षदर्शीनं सांगितलं
7
इराणकडे थोडी थोडकी नव्हे, २०,००० मिसाईल, दिवसाला २०० जरी डागली...; धमकीने खळबळ
8
डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका पोस्टने तेहरानमध्ये भीषण गर्दी, लोक शहर सोडून काढतायत पळ! पाहा व्हिडीओ
9
राजावर पहिला वार कुणी केला...? कुठे उभी होती सोनम...? क्राइम सीनवरून परतलेल्या मेघालय पोलिसांनी सगळंच सांगितलं
10
लेडी डॉन अनुराधा चौधरीला आई व्हायचेय; गँगस्टरने तिहारमधून शुक्राणू पाठविले...
11
"तू नाही, तुझी वहिनी आवडली"; मेहुण्याच्या बायकोवर जडला नवऱ्याचा जीव, लग्नाच्या एका महिन्यातच बायकोला सोडून पसार!
12
"त्यांना केवळ प्रसिद्धी हवी आहे...!"; G7 समिट अर्ध्यावर सोडून अमेरिकेत पोहोचताच फ्रान्सच्या राष्ट्रपतींवर भडकले ट्रम्प, नेमकं काय घडलं?
13
आता केवळ रामलला नाही, तर श्रीराम दरबाराचेही करा दर्शन; १ दिवसात किती भाविकांना पाहता येणार?
14
'संधी-साधूपणाच्या राजकारणाला प्रोत्साहित करायचे नाही,भाजपसोबत..' शरद पवार स्पष्टच बोलले
15
सुधाकर बडगुजर भाजपात येताच नितेश राणेंचे सूर बदलले; दहशतवादाबाबत केले होते आरोप
16
५०, १०० नाही, तब्बल ‘इतकी’ विमाने रद्द! ‘असा’ आहे एअर इंडियाचा ३ वर्षांचा रेकॉर्ड, आकडे पाहाच
17
व्हिसा नाकारल्याचा राग, तरुणाने अमेरिकन दूतावासाला बॉम्बने उडवण्याची धमकी दिली! पोलिसांकडून अटक
18
पीएमजीपी वसाहतीमधील रहिवाशांना ४५० फुटांचे घर मिळणार! म्हाडामार्फत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रक्रिया सुरू
19
'हुकूमशहा-पाकिस्तानचा खुनी..', अमेरिकेत गेलेल्या असीम मुनीरच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
20
“सुधाकर बडगुजर यांच्या प्रवेशाने भाजपाची ताकद वाढली, आता महापालिका निवडणूक...”: गिरीश महाजन

CoronaVirus News: कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण झाले ८९ टक्के

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2020 00:35 IST

CoronaVirus Navi Mumbai news: नागरिकांमध्ये प्रतिकारशक्ती वाढतेय; रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर

- आविष्कार देसाई रायगड : जिल्ह्यात कोरोनाचा कहर आता कमी होताना दिसत आहे. कोरोना रुग्ण बरे होण्याचे प्रमाण तब्बल ८९ टक्क्यांवर जाऊन पोहोचले आहे. नागरिकांच्या शरीरात अँटीबॉडीज तयार झाल्याचा हा सकारात्मक परिणाम असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे.कोरोनाला हरवण्यासाठी सरकार आणि प्रशासन प्रयत्न करत आहेत. यासाठी विविध उपाययोजनाही आखण्यात आल्या आहेत. नागरिकही आपल्यासह कुटुंबाची काळजी घेत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने तोंडाला मास्क लावणे, सामाजिक अंतर पाळणे, सॅनिटायझरचा वापर करणे अशा उपाययोजना केल्या जात आहेत. नागरिकांच्या शरीरात कोरोनाला हरवणाऱ्या अँटीबॉडीज निर्माण झाल्याने कोरोना विरोधातील लढाई आता निणार्यक टप्प्यावर आली असल्याचे बोलले जाते. जिल्ह्यात रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधीही ३२ दिवसांवर आला आहे. त्यामुळे सप्टेंबर महिन्यात समूह संसर्गाच्या दिशेने जाणारा जिल्हा आता ठरावीक टप्प्यावर विसावला आहे.जिल्ह्यामध्ये ८ मार्च रोजी कोरोना संसर्गाचा पहिला संशयित सापडला होता. त्यानंतर जिल्ह्यात कोरोनाने चांगलाच धुमाकूळ घालायला सुरुवात केली होती. आतापर्यंत एक लाख ६५ हजार नागरिकांची चाचणी करण्यात आली आहे. दिवसाला सुमारे चार हजार कोरोना चाचण्या करण्यात येत आहेत. ४७ हजार ६६४ कोरोनाबाधित रुग्ण सापडले आहेत. पैकी ४१ हजार ९०७ रुग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे. ही आकडेवारी २ आॅगस्टची आहे.सद्यस्थितीमध्ये ८ टक्के म्हणजेच चार हजार १६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तब्बल एक हजार ३०२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ते प्रमाण तीन टक्के आहे. ज्यांना विविध आजार आहेत, त्यांनाच मृत्यूने कवटाळले असल्याचे आरोग्य विभागाचे म्हणणे आहे.कोरोनाला धिराने सामोरे गेल्यास आपण त्याला हरवू शकतो. यासाठी आपणाला काही त्रास झाल्यास तातडीने डॉक्टरांचा सल्ल्याने औषध उपचार घेणे आवश्यक आहे. आजार अंगावर काढल्याने त्रास जास्त होतो. सकारात्मक विचार खूपच महत्त्वाचे आहेत, असे कोरोना विरोधातील लढाई जिंकलेले पत्रकार अ‍ॅड. रत्नाकर पाटील आणि भारत रांजणकर यांनी सांगितले.दरम्यान, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढण्यामागे त्यांच्यामधील अँटीबॉडीज म्हणजेच प्रतिकारशक्ती वाढल्या आहेत. त्यामुळे तीन दिवसांतच रुग्ण बरे होत असल्याचे दररोज रुग्णांच्या अभ्यासावरून दिसून येते, असे येथील डॉ. संदीप केळकर यांनी सांगितले. तापाचा रुग्ण औषधे घेऊन बरे होतात. त्याचप्रमाणे, या आजाराबाबतही ठरू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.तारीख रुग्ण बरे होण्याचे प्रमाण मृत्यू२ जुलै २,७७४ (५५ टक्के) १३०२(३ टक्के)३ आॅगस्ट १२,५७५(७७ टक्के) १३०२(३ टक्के)२ सप्टेंबर २३,९२९ (८३टक्के) १३०२(३ टक्के)२ आॅक्टोबर ४२,३५६ (८९ टक्के) १३०२(३ टक्के)सरकार आणि प्रशासनाने सातत्याने कोरोनाच्या विरोधातील उपाययोजना राबवल्या आहेत. नागरिकही सजग झाले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे खूपच चांगले आहे. नागरिकांमध्ये अँटीबॉडीज तयार झाल्याचाच हा परिणाम आहे. ज्यांना काही आजार आहेत, त्यांना बरे होण्यास वेळ लागत आहे अथवा त्यांचा मृत्यू होत आहे.- डॉ. सुहास माने,जिल्हा शल्य चिकित्सक

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या