शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदींना मिळाला त्रिनिदाद आणि टोबॅगोचा सर्वोच्च नागरी सन्मान; म्हणाले, "आपल्या नात्यात क्रिकेटचा रोमांच अन्..."
2
ENG vs IND 2nd Test Day 3 : 'त्या' दोघांनी दमवलं; तिसऱ्या दिवसाअखेर टीम इंडियानं १ विकेटही गमावली, पण...
3
"मी शेवटी 'जय गुजरात' म्हणालो कारण..."; एकनाथ शिंदे यांनी दिलं स्पष्टीकरण; ठाकरेंनाही डिवचलं...
4
मोठा दावा...! इराणवरील हल्ल्यानंतर कुठे गायब झाले अमेरिकेचे B-2 बॉम्बर विमान? एकाचे इमर्जन्सी लंडिंग अन्...
5
"मसूद अझहर कुठे? माहित नाही, भारतानं माहिती दिली तर..."; बिलावल भुट्टोंच्या विधानावर कुणाचाच विश्वास बसणार नाही
6
बेशुद्ध करणाऱ्या कोणत्याही स्प्रे चा वापर झाला नाही; कोंढवा अत्याचार प्रकरणात धक्कादायक खुलासा
7
"तीन दिवस एकच 'अंडरवेअर' अन्..."; पत्नीनं विचित्र कारणं सांगत पतीला पाठवलं 'डायव्हर्स लेटर', होतंय तुफान व्हायरल 
8
छोट्याखानी खेळीसह यशस्वी जैस्वालचा मोठा धमाका! द्रविड,सेहवाग अन् गंभीरच्या विक्रमाशी बरोबरी
9
कोंढवा बलात्कार प्रकरणात मोठा ट्विस्ट; ‘तो’ कुरिअर बॉय नसून तरुणीचा मित्र, अनेक धक्कादायक बाबी समोर
10
DSP सिराजचा 'सिक्सर' अन् आकाश दीपचा 'चौकार'! इंग्लंडचा संघ ४०७ धावांवर All Out
11
"कोण दुटप्पी? हे मराठी माणसाला लक्षात येतं...!"; ठाकरेंच्या विजयी मेळाव्यावर फडणवीसांची खरमरीत टीका, स्पष्टच बोलले
12
‘जय गुजरात’ म्हटलं म्हणजे शिंदेंचे महाराष्ट्रावरील प्रेम कमी झालं का? मुख्यमंत्र्यांचा विरोधकांना सवाल
13
"देशाला दिशा देणाऱ्या महाराष्ट्रात वाढत्या शेतकरी आत्महत्या भूषणावह नाहीत"; काँग्रेसचे टीकास्त्र
14
देशाच्या आरोग्याचे बजेट ३७ हजार कोटींवरून १ लाख कोटींवर नेण्याचे काम पंतप्रधान मोदींनी केले - अमित शाह
15
“नोंदणीचा ‘एक टक्का’ निधी थेट स्थानिक स्वराज्य संस्थांना देण्याचा विचार”: चंद्रशेखर बावनकुळे
16
'पंत तूने क्या किया!' कॅच नव्हे त्यानं टीम इंडियाला टेन्शन फ्री करण्याची संधी सोडली
17
"ते नेमकं काय म्हणाले माहित नाही, मी..."; एकनाथ शिंदेंच्या 'जय गुजरात'वर अजित दादांची पहिली प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
18
नीचभंग दशांक योग: ८ राशींना पद-पैसा-लाभ, ४ ग्रहांची साथ; विठ्ठलाचे वरदान, शुभ-कल्याणच होईल!
19
‘जय गुजरात’वरून टीका; शिंदे गटाच्या नेत्यांनी उद्धव ठाकरेंचा ‘तो’ व्हिडिओच दाखवला, दिले उत्तर
20
महाराष्ट्रात मराठी शिकण्याचा आग्रह करू शकतो, पण दुराग्रह करू शकत नाही- CM देवेंद्र फडणवीस

CoronaVirus Lockdown News: ‘गर्दीची ठिकाणे’ वगळता ‘कडकडीत बंद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 01:20 IST

फेरीवाल्यांना अभय : अधिकाऱ्यांच्या नाकर्तेपणामुळे वाढले हॉटस्पॉट

- सूर्यकांत वाघमारेनवी मुंबई : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाकडून कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामध्ये कोरोना प्रसाराचा हॉट स्पॉट ठरू शकतील, अशी गर्दीची ठिकाणे दुर्लक्षित झाली आहेत. परिणामी, अनेक ठिकाणी रस्त्यांवर अलोट गर्दी, तर लगतची दुकाने बंद असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्याने ३० एप्रिलपर्यंत कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, नवी मुंबईत गर्दीच्या ठिकाणांना सर्व काही माफ असल्याचे चित्र आहे. ज्या व्यावसायिकांकडे एकावेळी ३ ते ४ ग्राहक असतात, अशी दुकाने सक्तीने बंद केली आहेत. त्यांच्याकडून आदेशाचे उल्लंघन झाल्यास गुन्हे दाखल केले जात आहेत. मात्र, त्याच दुकानांच्या बाहेर रस्त्यावर अलोट गर्दीला कारणीभूत ठरणारे बाजार मात्र पोलीस व पालिका अधिकाऱ्यांकडून दुर्लक्षित होत आहेत. त्यामुळे अशी ठिकाणे भविष्यात कोरोना प्रसाराची हॉट स्पॉट ठरू शकतात. कोपरखैरणे, घणसोली, नेरूळ, ऐरोली, वाशी यासह इतरही विभागांत हे चित्र पाहायला मिळत आहे. या विभागांमध्ये अनेक ठिकाणी संध्याकाळच्या सुमारास रस्त्यांवर बाजार भरत आहेत, तर काही ठिकाणी अद्यापही आठवडे बाजार भरवण्यास मुभा दिली जात आहे. कठोर निर्बंधांतून अत्यावश्यक सुविधांना वगळण्यात आले आहे. याचाच आधार घेत भाजी, मांस विक्रेत्यांकडून जागोजागी बाजार मांडला जात आहे. त्यापैकी नेरूळ रेल्वेस्थानकाच्या दुतर्फा भरणारा बाजार, ऐरोली सेक्टर ५ व ८ येथील बाजार, तसेच कोपरखैरणे सेक्टर १५ येथील बाजार याठिकाणची गर्दी काळजात धडकी भरवणारी आहे. मात्र, त्याठिकाणी पालिका अथवा पोलिसांचे पथक कारवाईसाठी फिरकत नसल्याचे आश्चर्य व्यक्त होत आहे. घणसोली रेल्वेस्थानकासमोरील मार्गावर तर दिवस-रात्र फेरीवाले बस्तान मांडून बसत आहेत. ही सर्व ठिकाणे दुर्लक्षित करून इतर व्यावसायिक व नियमांचे उल्लंघन करणारे नागरिक यांच्यावर कारवाया करून स्वतःची पाठ थोपटून घेण्याचे काम पालिका अधिकारी करत आहेत.अधिकाऱ्यांच्या अपयशामुळे कोरोनाचा वाढतोय प्रसारकोरोनाला आळा घालण्यासाठी अद्यापही गर्दीच्या ठिकाणांवर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. प्रत्यक्षात तसे होत नसल्याने नेरूळ, कोपरखैरणे, ऐरोली व वाशी याठिकाणी अद्यापही रस्त्यांवर बाजार भरून मोठी गर्दी होत आहे. परिणामी, याच विभागांमध्ये प्रतिदिन शंभरहून अधिक कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. यावरून कोरोनाच्या प्रसाराला अधिकाऱ्यांचा नाकर्तेपणा कारणीभूत असल्याचे दिसून येत असतानाही, त्याचे खापर नागरिकांच्या माथी फोडले जात आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या