शहरं
Join us  
Trending Stories
1
"पंतप्रधानांचा उपदेश की अपयशाचा पुरावा? देश चालवणं आता तुमच्या..." राहुल गांधींचा मोदींवर निशाणा
2
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
3
हार्दिक पांड्या आणि मुंबई इंडियन्समध्ये बिनसलं? इन्स्टावर अनफॉलो केलं, MI च्या गोटात काल रात्री असं काही घडलं
4
महामुंबई: मुंबई महापालिका निधी वाटपातील गटबाजीने भाजपमध्येच अस्वस्थता 
5
Chandranath Rath : मोठी कारवाई! सुवेंदू अधिकारींचे PA चंद्रनाथ यांच्या हत्येप्रकरणी हिस्ट्रीशीटरसह ३ जणांना अटक
6
हंटाव्हायरसचा विळखा! ३ जणांचा मृत्यू झालेल्या क्रूझवरून भारतीय नागरिकांची सुखरूप सुटका; पुढे काय होणार?
7
केवळ पगारवाढीवर अवलंबून आहात का?; 'ही' ३ कारणे आहेत तुम्ही श्रीमंत होण्यातील अडथळा!
8
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
9
Post Office मध्ये ३६ महिन्यांच्या एफडीमध्ये ₹२,००,००० जमा कराल तर किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
10
Adhik Maas 2026: अधिक मसात का लावली जाते वेणीमाधव वात? काय आहे वैशिष्ट्य, महत्त्व आणि लाभ? वाचा
11
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
12
रील बनवण्याचे वेड अन् दोन प्रियकरांचे लफडे; भरल्या घरात बेसबॉल बॅटने नव्या बॉयफ्रेंडचा खेळ खलास
13
विजयच्या शपथविधी सोहळ्याकडे पत्नी अन् मुलांनी फिरवली पाठ, लेकाने हटवलं वडिलांचं नाव
14
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
15
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
16
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
17
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
18
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
19
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
20
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
Daily Top 2Weekly Top 5

CoronaVirus Lockdown News: नवी मुंबईतील हॉटेलबंदीने महिलांची भाजी-भाकरी थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 01:30 IST

अनेक कुटुंबांचे स्थलांतर ; शासनाने मदत करण्याची मागणी

- योगेश पिंगळे

नवी मुंबई : कोरोनामुळे अनेकांचे रोजगार बंद तर झालेच परंतु हॉटेल, कॅटरर्स बंद असल्याने या ठिकाणी पोळी भाकरी पुरविणाऱ्या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. उदर्निवाहाचा बिकट प्रश्न निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे शहरातून मूळगावी स्थलांतरित झाली असून उपासमार थांबण्यासाठी शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

कोरोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढला असून विषाणूची साखळी खंडित करण्यासाठी शासनाने काही कडक निर्बंध लादले आहेत. नवी मुंबई शहरात गेल्या वर्षी मार्च महिन्यात कोरोनाचा शिरकाव झाला त्यानंतर अनेक महिने लॉकडाऊन घेण्यात आला होता. या काळात अनेकांचे रोजगार बंद झाले. शहरातील हॉटेल, कँटिन आणि कॅटरर्सला पोळी भाकरी पुरविणाऱ्या महिलांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. लॉकडाऊन काळात हॉटेल, पोळी भाजी केंद्र, बंद होते. तसेच लग्न, वाढदिवसासारख्या कार्यक्रमांवर देखील निर्बंध आणण्यात आले होते, त्यामुळे कॅटरर्स सुविधा देखील बंद होती. याकाळात यासर्व ठिकाणी पोळी, भाकरी पुरविणाऱ्या महिलांना कुटुंबाचा उदरनिर्वाह करणेदेखील जिकिरीचे झाले होते. नोव्हेंबर महिन्यापासून लॉकडाऊनच्या नियमात काही प्रमाणात शिथिलता देण्यात आल्यावर हळूहळू परिस्थिती सुधारत असताना मार्च २०२१ पासून पुन्हा कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली त्यामुळे एप्रिल महिन्यापासून पुन्हा कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा विविध समस्या निर्माण होऊ लागल्या असून या महिलांची भाजी भाकरीदेखील थांबली आहे. रोजगार बंद असल्याने वर्षभर थकलेले घरभाडे, वीज बिल, मुलांचे शिक्षण, औषोपचार आदी समस्या निर्माण झाल्याने अनेक कुटुंबे मूळ गावी स्थलांतरित झाली आहेत. शासनाने मदत करण्याची मागणी केली जात आहे.

वर्ष कसे काढले आमचे 
आम्हालाच ठाऊक
गेल्यावर्षी लॉकडाऊन घेण्यात आला त्यावेळी आर्थिक परिस्थिती नाजूक झालेली होती. परंतु कोरोनाबाबत मनात खूप भीती असल्याने ओळखीच्या काही लोकांकडून उसने पैसे घेऊन उदरनिर्वाह केला.
कोरोनामुळे लॉकडाऊनसारखी परिस्थिती पहिल्यांदाच उद्भवल्याने काही समाजसेवकांकडून अन्न धान्याचे किट मिळाले. या काळात खूप हलाखीचे दिवस काढले तरी कर्जाचा डोंगर झाला असून वर्षभरापासून घरभाडेदेखील थकले आहे.
नोव्हेंबर महिन्यापासून काही प्रमाणात व्यवसाय सुरु झाल्याने मागील लॉकडाऊन काळात घेतलेले कर्ज डिसेंबर महिन्यात दागिने विकून फेडले आहे. कोरोनाचा संसर्ग वाढल्याने आता पुन्हा निर्बंध आणले असून हॉटेल, कँटिन बंद आहेत त्यामुळे उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे.

गेल्या वर्षभरापासून हॉटेल, कॅटरर्स बंद असल्याने काम नाही. मिस्टरांचा रोजगार देखील बंद आहे. डिसेंबर महिन्यापासून काही प्रमाणात काम सुरू झाले होते. परंतु एप्रिल महिन्यापासून पुन्हा बंद झालं आहे. घरभाडे, मुलांचा शिक्षण आदी समस्या गेल्या वर्षभरापासून निर्माण झाल्या असून विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. 
- सुवर्णा महाजन

गेले वर्षभर हॉटेल बंद असल्याने रोजगार पूर्णपणे बंद आहे. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न निर्माण झाला आहे.
- रुक्मिणी भगत 

कोरोनाच्या प्रादुर्भाव वाढल्याने घेण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे पोळी पुरविण्याचा व्यवसाय जवळपास पूर्णपणे ठप्प आहे. अनेक महिला इतर कामासाठी देखील प्रयत्न करत आहेत परंतु याकाळात काम मिळत नाहीत. त्यामुळे उदरनिर्वाह करणे जिकिरीचे झाले आहे.
- संध्या सोनावणे 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्या