शहरं
Join us  
Trending Stories
1
गुवाहाटीची खरी कथा मला विचारूनच लिहावी लागेल- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे
2
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
3
अमिताभ बच्चन यांनी विकले २ लक्झरी फ्लॅट्स; ‘बिग बीं’ची प्रॅापर्टीमधून बंपर कमाई, कितीमध्ये झाली ही ‘सुपर डील’?
4
"आम्ही कार्यक्रम वेळेत सुरु केलेला, पण..."; माधुरी दीक्षितच्या उशीरा येण्यामागचं खरं कारण आयोजकांनी सांगितलं
5
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
6
१३,००० कोटींचे कोकेन प्रकरण: डॉन वीरूच्या मुलाला पकडण्यासाठी १८० देशांची फौज; इंटरपोलची रेड नोटीस जारी
7
पालघरमधील तीन नगरपरिषदा, एका नगरपंचायतीत रणधुमाळी; यंदा कोण मारणार बाजी?
8
“निवडणूक आयोगाचा कारभार ‘दस नंबरी’, दुबार तिबार नावांची जबाबदारी कोणाची?”: हर्षवर्धन सपकाळ
9
२०२६ला डबल धमाका, ७ राशींवर असीम शनि कृपा; उत्पन्नात लक्षणीय वाढ, घर खरेदीचे स्वप्न पूर्ण!
10
'चिप'ची भीती दाखवून मुलीवर अत्याचार; जन्मदात्या आईचे हादरवणारं कृत्य, कोर्टाने दिली १८० वर्षांची शिक्षा!
11
बदलापुरात युतीत लढाई? तर अंबरनाथमध्ये मविआत तडजोड? निवडणुकांमध्ये चुरशीची लढाई
12
“मतदार याद्यांमध्ये घोळ, सत्ताधाऱ्यांकडून कबूल, दुबार मतदानावर आयोग गप्प का?”: सुप्रिया सुळे
13
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
14
रायगडमध्ये १० नगरपरिषदांमध्ये धूम युतीची की आघाडीची..? सर्व राजकीय पक्षांकडून हालचाली
15
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
16
चेंबूरमधील मेंदी प्रकरणाला नवी कलाटणी; शाळा प्रशासनाने सर्व आरोप फेटाळून लावले
17
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
18
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
19
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
20
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय

coronavirus: लॉकडाऊनमुळे रिक्षा चालकांवर आर्थिक संकट, उपासमारीची वेळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2020 01:00 IST

नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले ...

नवी मुंबई : लॉकडाऊनचा परिणाम रिक्षा आणि टॅक्सी चालकांवर मोठ्या प्रमाणात झाला असून, उपजीविका बंद असल्याने आर्थिक संकट कोसळले असून, उपासमारीची वेळ आली आहे. रिक्षा चालकांना सावरण्यासाठी शासनाने उपयोजना राबविण्याची मागणी रिक्षा, टॅक्सी चालक मालक संघटनांनी केली आहे.नवी मुंबई शहरात गेल्या काही वर्षांत रिक्षांचे प्रमाण मोठ्या संख्येने वाढले असून, रिक्षा व्यवसाय हे उदरनिर्वाहाचे साधन बनले आहे. अनेकांनी रिक्षाचा परवाना काढून रिक्षाच्या खरेदीसाठी बँकांकडून कर्ज घेऊन रिक्षा खरेदी केल्या आहेत, तर अनेक जण रिक्षा भाड्याने घेऊन व्यवसाय करीत आहेत. या व्यवसायावर त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह, घरभाडे, औषधोपचार, मुलांचे शिक्षण आदी सर्वच अवलंबून आहे. यामुळे कर्जाचे हप्ते, कुटुंबाचा उदरनिर्वाह, मुलांचे शिक्षण, घरभाडे, विद्युत बिल, औषधोपचार असे अनेक प्रश्न रिक्षा चालकांपुढे निर्माण झाले आहेत. सुरुवातीला घेण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या काळात अनेक सामाजिक संघटना, समाजसेवकांच्या वतीने अन्नधान्य आणि आवश्यक वस्तूंचे वाटप करण्यात आले होते. त्यामुळे हातावर पोट अवलंबून असलेल्या नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला होता. शासनाच्या माध्यमातून काही उपायोजना करून आर्थिक संकटात सापडलेल्या रिक्षा आणि टॅक्सी चालकांना दिलासा देण्यात यावा, अशी मागणी केली जात आहे.यामध्ये प्रामुख्याने थकलेल्या कर्जाच्या हप्त्याचे व्याज माफ करून थकीत हप्ते इन्शुरन्स कंपन्यांकडून घेण्यात यावेत, तसेच पुढील काळातील हप्ते भरण्यासाठी वाढीव मुदत देण्यात यावी, तसेच रिक्षा, टॅक्सीची पासिंग करण्यासाठी मुदतवाढ देण्यात यावी, अशा मागण्या संघटनांच्या वतीने करण्यात येत आहेत.लॉकडाऊनमुळे रिक्षा व टॅक्सी चालकांचे उत्पन्न पूर्ण बंद असल्याने थकीत हप्ते भरणे शक्य होणार नाही. यासाठी या थकीत हप्त्यांचे व्याज माफ करून इन्शुरन्स कंपन्यांपासून हप्त्यांचा भरणा करण्यात यावा, पुढील हप्ते भरण्यासाठी, तसेच पासिंगसाठीही मुदतवाढ मिळावी, यासाठी शासनाने आदेश काढावेत, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संबंधित विभागांच्या प्रमुख नेत्यांकडे निवेदनाद्वारे केली आहे.दिलीप आमले, (अध्यक्ष नवी मुंबई रिक्षा चालक मालक सेवाभावी संस्था)

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसauto rickshawऑटो रिक्षाbusinessव्यवसाय