शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

Coronavirus: संकटात सरसावले मदतीचे हात; अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2020 04:33 IST

35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत.

सूर्यकांत वाघमारे

नवी मुंबई : लॉकडाऊनच्या काळात गरजूंना मदतीसाठी हात पुढे करून नवी मुंबईकरांनी आदर्श निर्माण केला आहे. तर कोविड योद्ध्यांनीही बाधितांना धीर देऊन कोरोनावर मात करण्याचे बळ दिले. त्यामुळे अनेकांनी धाडसाने कोरोनावर मात केलेली आहे.२३ मार्चला लॉकडाऊन घोषित करण्यात आला. दुसऱ्याच दिवसापासून शहरातील वर्दळीचे रस्ते निर्मनुष्य झाले.

यादरम्यान एकट्या राहणाºया व्यक्तींसह चाकरमानी, झोपड्यांतील कुटुंबे अशा असंख्य व्यक्तींपुढे पोटाची खळगी भरवण्यासह इतरही गरजा निर्माण झाल्या होत्या. अशावेळी त्यांना मदतीचा हात देण्यासाठी पाहता पाहता शेकडो नागरिकांनी व सामाजिक संघटनांच्या सदस्यांनी घराबाहेर पाऊल टाकले. आलेल्या संकटावर मात करत त्यांच्याकडून गरजूंपर्यंत मदत पोचवली जात होती. त्यामध्ये अन्न धान्यासह कपडे व इतर जीवनावश्यक वस्तूंचा समावेश होता. त्याशिवाय रुग्णवाहिका व इतर वैद्यकीय मदत पुरवण्याचेही काम अनेकांनी केले. त्यात पोलीस व पालिकाही आग्रही होती. पालिकेकडून नियमाने दररोज सुमारे ३५ हजार जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. त्याकामी अनेक ठिकाणच्या गुरुद्वार व तिथल्या यंत्रणा उपयुक्त ठरली. तर काही संघटनांची मनुष्याप्रमाणेच प्राण्यांना जीवदान देण्याचे काम या लॉकडाऊनच्या कालावधीत प्रामाणिकपणे केले. लोकप्रनिधींनी, वैद्यकीय संघटनांनी देखील आर्सेनिक अल्बमच्या गोळ्या प्रभागात वाटून नागरिकांची रोगप्रतिकार शक्ती वाढण्याचा प्रयत्न केला. तर एपीएमसी मधील काही व्यापाऱ्यांनी पालिकेला उपयुक्त साहित्य पुरवून गरजूंना सुरु असलेल्या मदतीत खंड पडू दिला नाही.

लॉकडाऊन दरम्यान कुठेही नियमांचे उल्लंघन अथवा इतर अनुचित प्रकार घडू नये याकरिता सर्वत्र पोलिसांचा बंदोबस्त होता. एकीकडे कर्तव्य बजावत असतानाच दुसरीकडे गरजूंना मदतीचा हात दिला जात होता. रस्त्यावरील भिकारी, झोपडपट्या याठिकाणी तयार अन्न वाटताना खाकीतली माणुसकी दिसत होती. तर पालिकेचे सफाई कामगार, अग्निशमन दल व वैद्यकीय पथक हे खºया अर्थाने कोविड योद्धा बनले होते. कोरोनाबाबत गैरसमज असल्याने नागरिक भयभीत होत होते. अशावेळी दाखल रुग्णांना उपचारास धीर देण्याचे काम वैद्यकीय पथक करत होते. त्यामुळे उपचार घेऊन ३ हजार ६०० हून अधिक जण बरे झाले आहेत.35,000 जणांना दोन वेळचे जेवण घरपोच पुरवले जात होते. याकरिता स्वतंत्र यंत्रणा उभी करण्यात आली होती. 3,600 हुन अधिक जण बरे होऊन घरी परतले आहेत. तर घणसोलीतील कोरोना पॉझिटिव्ह गरोदर महिलेची यशस्वी प्रसूती झाली. 1,300 पैकी ११०० हून अधिक वृद्धांनी कोरोना विरोधातील लढाई जिंकली आहे.

टॅग्स :PoliceपोलिसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस