शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन व्होटर आयडींच्या आपल्याच दाव्यामुळे तेजस्वी अडचणीत, निवडणूक आयोगाची नोटीस; तपशील मागितला
2
"युक्रेनविरुद्धच्या युद्धासाठी भारत रशियाला निधी पुरवतोय"; डोनाल्ड ट्रम्पच्या जवळच्या सहकाऱ्याचा मोठा आरोप!
3
मनसे, उद्धवसेना, शेकाप, राष्ट्रवादी एकत्र आले म्हणजे..?
4
विमान उड्डाण करणारच होतं अन् केबिन तापलं; एअर इंडियाची 'ही' फ्लाइट झाली रद्द 
5
‘झोपु’ योजनेत ८० कोटींचा घोटाळा; विकासकांवर गुन्हा; आशापुरा ग्रुपच्या ७ जणांविरोधात टिळक नगर पोलिसांकडून तपास सुरू
6
आजचे राशीभविष्य, ०४ ऑगस्ट २०२५: ६ राशींना शुभ फलदायी दिवस, अचानक धनलाभ योग; कार्यात यश
7
पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचे खळ्ळखट्याक, १५ ते २० कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल
8
अजेंटिक AI : ते काम करेलच, विचारही स्वत:च करेल!
9
भारतावर ट्रम्प इतके नाराज का आहेत?
10
स्पाइसजेट कर्मचाऱ्यांवर लष्करी अधिकाऱ्याचा हल्ला; मणका मोडला, जबडा तोडला, ४ जखमी 
11
एकाच कुटुंबातील तीन पिढ्या जपतायत गोविंदाची परंपरा, लालबागच्या पथकातील ६ जणांचा प्रेरणादायी प्रवास
12
पीयूसीसाठी लवकरच नवीन दर, विविध राज्यांच्या अभ्यासासाठी परिवहन विभागाकडून समिती स्थापन
13
Pune Crime: 'किती मुलांसोबत झोपलात?', कोथरुडमधील प्रकरण; रोहित पवार 'त्या' तरुणींसह पोलीस आयुक्तालयात, काय घडलं?
14
IND vs ENG 5th Test Day 4 Stumps : कोण जिंकणार? 'दिल अन् दिमाग' यांची 'टेस्ट' घेणाऱ्या प्रश्नासह थांबला खेळ
15
भगवा दहशतवादी असेल, तर तुम्ही त्याची पूजा करणार का?; शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांचा सवाल
16
IND vs ENG : टेस्टमध्ये ट्विस्ट; खांदा बांधून बसलेला क्रिस वोक्स एका हाताने बॅटिंग करण्याच्या तयारीत
17
मुलींवर हात टाकणाऱ्यांना हातपाय तोडून पोलिसांकडे दिले पाहिजे; अमित ठाकरे यांचे विधान
18
हा दरोडा भारतातील सर्वात मोठा होता; एका रात्रीत ८० किलो सोने गेले होते चोरीला
19
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
20
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन

विनोबानगरमधील शासकीय वास्तूंचे खंडरात रूपांतर, माहिती केंद्रही बंद, गागोदेमधील आदिवासी पाड्याकडेही शासनाचे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 15, 2017 06:29 IST

आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी येथील विनोबांच्या जीवनाची माहिती देणारे छायाचित्र दालन अनेक वर्षांपासून बंदच आहे.

- नामदेव मोरे नवी मुंबई : आचार्य विनोबा भावे यांच्या गागोदे बुद्रुक गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याकडेही सरकारने दुर्लक्षच केले आहे. १९९२मध्ये या वस्तीचे विनोबानगर असे नामकरण करण्यात आले; परंतु येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी फारसे प्रयत्न झालेले नाहीत. सामाजिक संस्थेच्या वतीने विविध उपक्रम राबविण्यात येत असले, तरी येथील विनोबांच्या जीवनाची माहिती देणारे छायाचित्र दालन अनेक वर्षांपासून बंदच आहे. शाळा व समाजमंदिराच्या वास्तूंचीही प्रचंड दुरवस्था झाली आहे.गागोदे बुद्रुक गावाला ११ सप्टेंबर १९९२मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री सुधाकरराव नाईक यांनी भेट दिली होती. या भेटीमध्ये पाच प्रमुख घोषणा करण्यात आल्या होत्या. यामध्ये गावामध्ये सभागृह व विनोबाजींचे आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारणे. विनोबाजींच्या वाड्यापासून जवळच असलेल्या तलावाचे सुशोभीकरण करणे. गावामध्ये येण्यासाठीच्या रोडला शिवाजीराव भावे पथ नामकरण, जिल्हा परिषदेच्या शाळेचे नामकरण व बाळकोबा उद्यानाची घोषणा करण्यात आली होती. गावचा भाग असलेल्या आदिवासी पाड्याचे नावही विनोबानगर करण्यात आले होते. आदिवासी पाड्यामध्ये १९९२मध्ये लावलेली पाटी अजूनही जशीच्या तशी आहे. भारतरत्न विनोबाजींचे नाव आदिवासी पाड्याला दिले असले, तरी मागील २५ वर्षांमध्ये येथील आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी सरकारचे फारसे प्रयत्न झालेले नाहीत. गावामध्ये शाळा, समाजमंदिर व इतर कामांसाठी सरकारच्या निधीमधून इमारती बांधण्यात आल्या आहेत; परंतु त्या इमारतींचा योग्य वापर केला जात नाही. यामुळे अनेक वास्तूंचे खंडरात रूपांतर झाले आहे. आदिवासी पाड्यावर चौथीपर्यंत शिक्षणाची सोय आहे. या शाळेचा दर्जा चांगला व्हावा, यासाठीही ठोस काहीही करण्यात आलेले नाही.विनोबानगरमध्ये विनोबा सेवा संस्था या सामाजिक संस्थेच्या वतीने आदिवासींचे जीवनमान उंचाविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. दोन दशकांपेक्षा जास्त काळ शिक्षण, लोकजागृतीची कामे केली जात आहेत. आदिवासी पाड्यामधील बालविवाह थांबविण्यात यश मिळविले आहे. येथील मुले पदवीपर्यंत शिक्षण घेऊ लागली आहेत. आर्थिक स्तर वाढू लागला आहे. गतवर्षी गावातील मुलांनी स्वकष्टातून २६ मोटारसायकल खरेदी केल्या आहेत. मुलांच्या आरोग्यासाठीही संस्थेच्या वतीने प्रयत्न सुरू असल्याची माहिती विनोबा सेवा संस्थेचे सचिव राजीव गागोदेकर यांनी दिली. यापूर्वी विनोबानगरमध्ये महाविद्यालयीन मुलांसाठी श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन केले जात होते; परंतु मुलांमध्ये विनोबाजींचे विचार शिकण्यापेक्षा सहलीला आल्यासारखे वर्तन होऊ लागल्याने शिबिरे बंद केली आहेत. या ठिकाणी विनोबाजींच्या जीवनाविषयी माहिती देणारे कायमस्वरूपी केंद्र उभारण्यात आले आहे; परंतु विनोबानगरमध्येभेट देण्यासाठी नागरिकच येत नसल्याने ते केंद्र बंद पडले आहे. वास्तूची प्रचंड दुरवस्था झाली आहे. ते माहिती केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत.नामफलकांच्या पाट्याआदिवासी पाड्याचे १९९२ मध्ये सुधाकर नाईक यांच्या हस्ते विनोबानगर असे नामकरण केले. पाड्याच्या सुरवातीला नामफलकाची पाटील दिमाखात उभी आहे. याशिवाय समाजमंदिर, शाळा व इतर वास्तूंवरही कोणत्या निधीमधून इमारत बांधण्यात आल्या. त्याच्या पाट्या लावण्यात आल्या आहेत. पाट्या सुस्थितीमध्ये असल्या तरी इमारतींची अवस्था मात्र बिकट झाली आहे. या इमारतींची डागडुजी करून त्यांचा योग्य वापर करण्याकडे दुर्लक्ष होत आहे.माहिती केंद्र सुरू व्हावे1विनोबानगरमध्ये पूर्वी विद्यार्थ्यांसाठी श्रमसंस्कार शिबिरांचे आयोजन करण्यात येत होते. येथील प्रदर्शनामधून विनोबाजींच्या जीवनाविषयी माहिती युवा पिढीला होत होती; परंतु विद्यार्थ्यांमध्ये विनोबाजींचे विचार शिकण्याची मानसिकता राहिली नसल्याने येथील शिबिरे बंद झाली असली तरी ती पुन्हा सुरू व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.सरकारी इमारतींचे खुराडे2विनोबानगरमधील समाजमंदिर, जुनी शाळा व इतर वास्तूंची प्रचंड दुरवस्था झाली आहे. अनेक इमारती मोडकळीस आल्या आहेत. वास्तविक या ठिकाणी विनोबाजींच्या कार्याची माहिती देणारे स्मारक असणे आवश्यक आहे. गावामध्ये व आदिवासी पाड्यामध्येही दोन टप्प्यांत आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक उभारले तर देशभरातील नागरिकांमध्ये विनोबाजींचे विचार रुजविणे सहज शक्य होणार आहे.

टॅग्स :Governmentसरकार